शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

माजी न्यायमूर्ती बी.एन.देशमुख यांचे औरंगाबादमध्ये निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 10:31 IST

शेतकरी, कष्टकरी कामगार तसेच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय 'ऐतिहासिक' ठरले होते

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती,माजी आमदार बॅ.बलभिमराव नरसिंगराव देशमुख ( बी.एन.) देशमुख काटीकर (८५वर्षे) यांचे मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी सकाळी १० वाजता औरंगाबाद येथेच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

न्यायमूर्ती बी एन देशमुख यांचे मूळगाव तुळजापूर तालुक्यातील काठी होते .त्यांचे वडील उस्मानाबाद येथे वकिली व्यवसाय करीत असत. त्यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण सोलापूर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण इंग्लंड येथे घेऊन मुबई उच्च न्यायालयात रामराव आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली वकिलीस सुरवात केली. 

औरंगाबाद खंडपीठ उभारण्यात मोलाची भूमिकाऔरंगाबाद येथे  मुंबई उच्च न्यायालयाचे  खंडपीठ व्हावे अशी  त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांनी तेथील वकील संघात केलेल्या भाषणात औरंगाबादला खंडपीठाची का आवश्यकता आहे हे पटवून दिले. औरंगाबाद येथे खंडपीठ सुरु झाल्याबरोबर त्यांनी औरंगाबाद येथे वकीलीला प्रारंभ केला. त्यानंतर १९८६ मध्ये त्यांची न्यायमूर्तीपदी नेमणूक झाली. शेतकरी, कष्टकरी कामगार  तसेच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय 'ऐतिहासिक' ठरले होते. १९९७ साली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून ते निवृत्त झाले .

निवृत्तीनंतर औरंगाबाद येथे स्थायी झालेनिवृत्तीनंतर त्यांनी शासनाचे कोणतेही पद स्वीकारले नाही. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात  आपल्या वकीलीस प्रारंभ केला.त्यांच्या वयाला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील वकिली व्यवसाय बंद केला आणि दिल्लीवरून ते औरंगाबादला स्थायी झाले.

विधानपरिषदेचे आमदार म्हणून कारकीर्द गाजली

विशेष म्हणजे सुरुवातीच्या काळात ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. ते विधान परिषदेचे ६ वर्ष सदस्यही होते. त्यांनी विधान परिषदेचे सदस्य असताना शासनाला अनेक प्रश्नांवर धारेवर धरले होते. ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी राज्यसभा सदस्य अँड.नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र, माजी खासदार उध्दवराव पाटील यांचे भाच्चे होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, दोन नातवंडे असा परिवार आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ