शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

समिती स्थापन करून बीड बायपासवर शून्य अपघात धोरणासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:04 IST

बीड बायपासवरील अपघातांची वाढती संख्या रोखण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांवर बंदी घातली. तरीही अपघात घडले. यावर मात करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांची आवश्यकता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिकांनी, शैक्षणिक संस्थांनी उपाय सुचवावेत, यासाठी नागरिकांची समिती स्थापन करून शून्य अपघात धोरणासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त : राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी अपघातमुक्तीसाठी नागरिकांनी उपाय सुचविण्याचे आवाहन

औरंगाबाद : बीड बायपासवरील अपघातांची वाढती संख्या रोखण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांवर बंदी घातली. तरीही अपघात घडले. यावर मात करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांची आवश्यकता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिकांनी, शैक्षणिक संस्थांनी उपाय सुचवावेत, यासाठी नागरिकांची समिती स्थापन करून शून्य अपघात धोरणासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले.आरटीओ कार्यालयातर्फे आयोजित राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी छत्रपती शाहू महाराज शिक्षणसंस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महापौर नंदकुमार घोडेले अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता के. टी. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, ‘सीएसएमएसएस’चे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, डॉ. डी. के. शेळके, डॉ. जी. बी. डोंगरे, अशोक आहेर यांची उपस्थिती होती.यावेळी चिरंजीव प्रसाद म्हणाले, नागरिकांचे सहकार्य मिळत असल्याने परदेशात अपघातांचे प्रमाण कमी आहे. याच सहकार्याची अपेक्षा आपल्याकडेही आहे. महामार्गावर अधिक गतिरोधक टाकता येत नाही. परंतु बीड बायपास जवळजवळ शहरात आला आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी काही पर्याय करावे लागतील. ध्वनिक्षेपकावरून सूचना, बॅरिकेटस् टाकून वाहनांची गती कमी करता येईल. अपघात कमी करण्यासाठी पुरेशा विश्रांतीबरोबर वाहनांची गती कमी ठेवली पाहिजे. ४० कि.मी. गतीचे बंधन केले आहे. ५० कि.मी.च्या वर गती गेल्यास कारवाई केली जाईल. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळाले पाहिजे. बीड बायपास परिसरातील कार्यालय, शाळा, महाविद्यालय आणि नागरिकांनी समितीच्या माध्यमातून अपघात कमी करण्यासाठी उपाय सांगावेत. त्याची आठवडाभरात अंमलबजावणी केली जाईल.महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, माझ्या कर्मभूमीतील पैठण रोड मृत्यूचा सापळा झाला, याचा खेद वाटतो. बीड बायपास व पैठण रोडवरून जीव मुठीत घेऊन जावे लागते. याप्रसंगी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे, श्रीकृष्ण नकाते, स्वप्नील माने, शैलेश लाहोटी, मोटार वाहन निरीक्षक धनंजय थोरे, रवींद्र यादव, एस. एस. सुत्रावे, मंगेश गुरव आदी उपस्थित होते. मोटार वाहन निरीक्षक शाहेद जमादार यांनी सूत्रसंचालन केले.रायडर फे्रंडली हेल्मेटहेल्मेटसंदर्भात तक्रारी केल्या जातात. परंतु रायडर फ्रेंडली हेल्मेट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही प्रवास टाळू शकता का, याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक देशांत आंतरराष्ट्रीय मानके आहेत. परदेशांत तुम्ही सलग चार तास वाहन चालविल्यानंतर वाहन सुरूच होत नाही. चालकाने तासभर विश्रांती घेतल्याशिवाय वाहन सुरूच होणार नाही, असे सॉफ्टवेअर, हार्डवेअर आहे, असेही पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबाद