शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

समिती स्थापन करून बीड बायपासवर शून्य अपघात धोरणासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:04 IST

बीड बायपासवरील अपघातांची वाढती संख्या रोखण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांवर बंदी घातली. तरीही अपघात घडले. यावर मात करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांची आवश्यकता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिकांनी, शैक्षणिक संस्थांनी उपाय सुचवावेत, यासाठी नागरिकांची समिती स्थापन करून शून्य अपघात धोरणासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले.

ठळक मुद्देपोलीस आयुक्त : राज्य रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी अपघातमुक्तीसाठी नागरिकांनी उपाय सुचविण्याचे आवाहन

औरंगाबाद : बीड बायपासवरील अपघातांची वाढती संख्या रोखण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी अवजड वाहनांवर बंदी घातली. तरीही अपघात घडले. यावर मात करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांची आवश्यकता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, व्यावसायिकांनी, शैक्षणिक संस्थांनी उपाय सुचवावेत, यासाठी नागरिकांची समिती स्थापन करून शून्य अपघात धोरणासाठी प्रयत्न केले जातील, असे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले.आरटीओ कार्यालयातर्फे आयोजित राज्य रस्ता सुरक्षा अभियानाचे सोमवारी छत्रपती शाहू महाराज शिक्षणसंस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महापौर नंदकुमार घोडेले अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता के. टी. पाटील, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, ‘सीएसएमएसएस’चे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे, डॉ. डी. के. शेळके, डॉ. जी. बी. डोंगरे, अशोक आहेर यांची उपस्थिती होती.यावेळी चिरंजीव प्रसाद म्हणाले, नागरिकांचे सहकार्य मिळत असल्याने परदेशात अपघातांचे प्रमाण कमी आहे. याच सहकार्याची अपेक्षा आपल्याकडेही आहे. महामार्गावर अधिक गतिरोधक टाकता येत नाही. परंतु बीड बायपास जवळजवळ शहरात आला आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी काही पर्याय करावे लागतील. ध्वनिक्षेपकावरून सूचना, बॅरिकेटस् टाकून वाहनांची गती कमी करता येईल. अपघात कमी करण्यासाठी पुरेशा विश्रांतीबरोबर वाहनांची गती कमी ठेवली पाहिजे. ४० कि.मी. गतीचे बंधन केले आहे. ५० कि.मी.च्या वर गती गेल्यास कारवाई केली जाईल. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळाले पाहिजे. बीड बायपास परिसरातील कार्यालय, शाळा, महाविद्यालय आणि नागरिकांनी समितीच्या माध्यमातून अपघात कमी करण्यासाठी उपाय सांगावेत. त्याची आठवडाभरात अंमलबजावणी केली जाईल.महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, माझ्या कर्मभूमीतील पैठण रोड मृत्यूचा सापळा झाला, याचा खेद वाटतो. बीड बायपास व पैठण रोडवरून जीव मुठीत घेऊन जावे लागते. याप्रसंगी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे, श्रीकृष्ण नकाते, स्वप्नील माने, शैलेश लाहोटी, मोटार वाहन निरीक्षक धनंजय थोरे, रवींद्र यादव, एस. एस. सुत्रावे, मंगेश गुरव आदी उपस्थित होते. मोटार वाहन निरीक्षक शाहेद जमादार यांनी सूत्रसंचालन केले.रायडर फे्रंडली हेल्मेटहेल्मेटसंदर्भात तक्रारी केल्या जातात. परंतु रायडर फ्रेंडली हेल्मेट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही प्रवास टाळू शकता का, याचा विचार केला पाहिजे. प्रत्येक देशांत आंतरराष्ट्रीय मानके आहेत. परदेशांत तुम्ही सलग चार तास वाहन चालविल्यानंतर वाहन सुरूच होत नाही. चालकाने तासभर विश्रांती घेतल्याशिवाय वाहन सुरूच होणार नाही, असे सॉफ्टवेअर, हार्डवेअर आहे, असेही पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाAurangabadऔरंगाबाद