शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

रोटेगाव-पुणतांबा रेल्वेमार्ग आता विसरूनच जा; मनमाडमार्गे प्रवासाने १२६ कि.मी. चा पडतोय फेरा

By संतोष हिरेमठ | Updated: February 26, 2024 19:31 IST

रोटेगाव-कोपरगाव मार्गही कागदावरच : पुणतांबा, शिर्डीसाठी मनमाडमार्गे प्रवास, १२६ कि.मी. चा फेरा

छत्रपती संभाजीनगर : रोटेगाव-पुणतांबा हा २७ किलोमीटरचा प्रस्तावित रेल्वेमार्ग आता विसरूनच जा, असेच म्हणण्याची वेळ येत आहे. तर या रेल्वे मार्गाला पर्याय म्हणून मांडलेला रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्गही कागदावरच आहे. त्यामुळेच मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना अवघ्या काही अंतरासाठी मनमाडमार्गे १२६ किलोमीटर अंतर प्रवास करून पुणतांबा, शिर्डी गाठावे लागते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी रोजी देशभरातील ५५४ अमृत स्टेशन आणि १,५०० उड्डाण पूल , भुयारी पुलांचे भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण सोहळा होणार आहे. यामध्ये ‘दमरे’च्या नांदेड विभागातील भोकर, हिमायतनगर, मानवत रोड आणि रोटेगाव रेल्वेस्थानकासह ४८ भुयारी मार्ग, तसेच उड्डाणपुलांचा समावेश आहे. रोटेगाव रेल्वेस्टेशनचा पुनर्विकास होत आहे. मात्र, कागदावरील रेल्वे मार्गांचे काय, असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.

मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या रोटेगाव-पुणतांबा या रेल्वेमार्गासाठी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ, दिवंगत कामगार नेते विजयेंद्र काबरा, शालिग्राम बसैये, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनीही प्रयत्न केले. आजघडीला पुणतांबा, शिर्डीसाठी मनमाडमार्गे जावे लागते. त्यामुळे रोटेगाव ते पुणतांबा हे अंतर १२६ किलोमीटर पडते. त्यामुळे हा प्रवास करताना अधिक वेळ लागतो. त्यामुळे रोटेगाव-पुणतांबा हा २७ किलोमीटरचा रेल्वेमार्ग करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या २५ वर्षांपासून मागणी होत असलेल्या या रेल्वे मार्गात गोदावरी नदी येते. त्यामुळे हा रेल्वे मार्ग तयार करणे रेल्वेसाठी खर्चीक ठरत आहे. यावर पर्याय म्हणून काही वर्षांपूर्वी रोटेगाव-कोपरगाव असा ३५ किलोमीटरचा कॉडलाइनचा पर्याय मांडण्यात आला. या पर्यायी मार्गामुळे रोटेगाव ते पुणतांबा हे अंतर ६९ किलोमीटरने कमी होणार आहे. या नव्या पर्यायाचा प्रस्ताव रेल्वेला पाठविण्यातही आला; परंतु अजूनही हे दोन्ही मार्ग कागदावरच आहेत.

२००९ मध्ये सर्वेक्षणरेल्वे प्रवाशांना मनमाडचा फेरा होऊ नये, या फेऱ्यामुळे लागणारे अधिकचे डिझेल वाचावे व प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी रोटेगाव-पुणतांबा या रेल्वे मार्गाची मागणी करण्यात आली. संघटनांच्या पाठपुराव्यामुळे या मार्गाचे सर्वेक्षण २१ सप्टेंबर २००९ ला पूर्ण करण्यात आले. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ९७ कोटी होती. त्यानंतरही वेळोवेळी रेल्वे प्रशासनाने सर्वेक्षण, पाहणी केली.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन