शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

रोटेगाव-पुणतांबा रेल्वेमार्ग आता विसरूनच जा; मनमाडमार्गे प्रवासाने १२६ कि.मी. चा पडतोय फेरा

By संतोष हिरेमठ | Updated: February 26, 2024 19:31 IST

रोटेगाव-कोपरगाव मार्गही कागदावरच : पुणतांबा, शिर्डीसाठी मनमाडमार्गे प्रवास, १२६ कि.मी. चा फेरा

छत्रपती संभाजीनगर : रोटेगाव-पुणतांबा हा २७ किलोमीटरचा प्रस्तावित रेल्वेमार्ग आता विसरूनच जा, असेच म्हणण्याची वेळ येत आहे. तर या रेल्वे मार्गाला पर्याय म्हणून मांडलेला रोटेगाव-कोपरगाव रेल्वे मार्गही कागदावरच आहे. त्यामुळेच मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना अवघ्या काही अंतरासाठी मनमाडमार्गे १२६ किलोमीटर अंतर प्रवास करून पुणतांबा, शिर्डी गाठावे लागते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी रोजी देशभरातील ५५४ अमृत स्टेशन आणि १,५०० उड्डाण पूल , भुयारी पुलांचे भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण सोहळा होणार आहे. यामध्ये ‘दमरे’च्या नांदेड विभागातील भोकर, हिमायतनगर, मानवत रोड आणि रोटेगाव रेल्वेस्थानकासह ४८ भुयारी मार्ग, तसेच उड्डाणपुलांचा समावेश आहे. रोटेगाव रेल्वेस्टेशनचा पुनर्विकास होत आहे. मात्र, कागदावरील रेल्वे मार्गांचे काय, असा सवाल प्रवाशांमधून उपस्थित होत आहे.

मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या रोटेगाव-पुणतांबा या रेल्वेमार्गासाठी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ, दिवंगत कामगार नेते विजयेंद्र काबरा, शालिग्राम बसैये, मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनीही प्रयत्न केले. आजघडीला पुणतांबा, शिर्डीसाठी मनमाडमार्गे जावे लागते. त्यामुळे रोटेगाव ते पुणतांबा हे अंतर १२६ किलोमीटर पडते. त्यामुळे हा प्रवास करताना अधिक वेळ लागतो. त्यामुळे रोटेगाव-पुणतांबा हा २७ किलोमीटरचा रेल्वेमार्ग करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या २५ वर्षांपासून मागणी होत असलेल्या या रेल्वे मार्गात गोदावरी नदी येते. त्यामुळे हा रेल्वे मार्ग तयार करणे रेल्वेसाठी खर्चीक ठरत आहे. यावर पर्याय म्हणून काही वर्षांपूर्वी रोटेगाव-कोपरगाव असा ३५ किलोमीटरचा कॉडलाइनचा पर्याय मांडण्यात आला. या पर्यायी मार्गामुळे रोटेगाव ते पुणतांबा हे अंतर ६९ किलोमीटरने कमी होणार आहे. या नव्या पर्यायाचा प्रस्ताव रेल्वेला पाठविण्यातही आला; परंतु अजूनही हे दोन्ही मार्ग कागदावरच आहेत.

२००९ मध्ये सर्वेक्षणरेल्वे प्रवाशांना मनमाडचा फेरा होऊ नये, या फेऱ्यामुळे लागणारे अधिकचे डिझेल वाचावे व प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी रोटेगाव-पुणतांबा या रेल्वे मार्गाची मागणी करण्यात आली. संघटनांच्या पाठपुराव्यामुळे या मार्गाचे सर्वेक्षण २१ सप्टेंबर २००९ ला पूर्ण करण्यात आले. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत ९७ कोटी होती. त्यानंतरही वेळोवेळी रेल्वे प्रशासनाने सर्वेक्षण, पाहणी केली.

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन