शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पाण्याची 'तारीख पे तारीख'; उन्हाळा संपण्यापूर्वी छत्रपती संभाजीनगरला वाढीव पाणी मिळेल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 18:45 IST

पाण्याची नवीन ‘डेडलाईन’ आता एप्रिलअखेर; विभागीय आयुक्तांच्या बैठकीतील निर्णय

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी ३१ मार्चपर्यंत येईल, अशी घोषणा करण्यात आली होती. एवढ्या कमी वेळेत विविध कामे होणे शक्य नाही. त्यामुळे बुधवारी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत ३० एप्रिलची नवीन डेडलाईन ठरविण्यात आली. उन्हाळा संपण्यापूर्वी तरी शहराला वाढीव स्वरूपात पाणी मिळेल का, असा प्रश्न आहे.

पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यासाठी खंडपीठाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नियमित आढावा बैठक घेण्यात आली. बुधवारी घेण्यात आलेल्या बैठकीत मनपा प्रशासक जी. श्रीकांत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांच्यासह नॅशनल हायवे, मनपा अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पाणीपुरवठा योजनेत येणारे नेमके अडथळे कोणते, यावर चर्चा करण्यात आली. त्यावर उपायसुद्धा शोधून अंतिम निर्णयही घेण्यात आले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने यापूर्वी ३१ मार्चपर्यंत शहरात २०० एमएलडी पाणी येईल, असा दावा केला होता. हा दावा फोल ठरला. पुढील २६ दिवसांत विविध कामे होणे शक्य नसल्याचे मजीप्रा अधिकाऱ्यांनी सांगितले.

३० एप्रिल नवीन तारीख३० एप्रिलपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण करणे, जायकवाडी धरणात जॅकवेलचे काम पूर्ण करावे, त्यावर पंपिंगची यंत्रणा बसविणे, आदी कामे पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त, मनपा प्रशासक यांनी दिले. ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील जलशुद्धिकरण केंद्राच्या कामावरही चर्चा करण्यात आली. यासाठीही मजीप्राने ३० एप्रिलची मुदत दिली. फारोळ्यातील २६ एमएलडीचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण झाले, तर शहराला तूर्त ५० ते ५५ एमएलडी वाढीव पाणी मिळेल. १ मेनंतर हे पाणी मिळण्याची शक्यता आहे.

‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तबपैठण रोडवर २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली. या जलवाहिनीवर नॅशनल हायवेने रस्ता तयार केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने उघडकीस आणले. त्यानंतर जलवाहिनीवर वाहतूक सुरू राहिली आणि दुर्दैवाने कधी जलवाहिनी फुटली तर वाहने किमान १०० ते दीडशे फूट हवेत उडतील, असे वृत्तात म्हटले होते. त्यामुळे जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत रस्त्याच्या एका बाजूने जलवाहिनीला वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून एका बाजूने लोखंडी बॅरिकेटिंगचा निर्णय झाला. हा खर्च तूर्त मजीप्रा देईल, असे ठरले.

कोणती कामे शिल्लक ?जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ३९ कि.मी.त २५०० मिमी व्यासाची जलवाहिनी ३७ किमी टाकली. दोन किमी जलवाहिनी टाकणे, ठिकठिकाणी एअर व्हॉल्व्ह बसविणे, चार ठिकाणी सर्ज टँक, पंपिंगची यंत्रणा आदी कामे बाकी आहेत. ही कामे पुढील ५५ दिवसांत पूर्ण होतील का, हा मोठा प्रश्न आहे.

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका