शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
4
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
5
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
6
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
7
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
8
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
9
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
11
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
12
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
13
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
14
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
15
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
16
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
17
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
18
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
19
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
20
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?

food poisoning: उपवासाची भगर बाधली; वैजापूर तालुक्यात ५२४ जण रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 11:36 IST

मळमळ, उलट्या होत असल्याने रुग्ण मोठ्या प्रमाणात दवाखान्यात दाखल झाले. सर्वांनी भगर खाल्ल्याचे सांगितले.

वैजापूर (औरंगाबाद) : उपवासाची भगर खाल्ल्याने तालुक्यातील जवळपास ५२४ नागरिकांना बुधवारी विषबाधा झाली असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत.

लासूर स्टेशन येथे मंगळवारी भगर खाल्ल्याने १३ जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. बुधवारी वैजापूर तालुक्यात सकाळपासून भगरने विषबाधा झालेले रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल होण्यास सुरुवात झाली. मळमळ, उलट्या होत असल्याने रुग्ण मोठ्या प्रमाणात दवाखान्यात दाखल झाले. सर्वांनी भगर खाल्ल्याचे सांगितले. वांजरगाव, डवाळा, नगिना पिंपळगाव, आलापूरवाडी, आघूर आदी अनेक गावांतील ग्रामस्थांना विषबाधा झाली. शहरात १०६ रुग्णांची नोंद अधिकृत नोंद झाली असली तरी विविध शासकीय व खासगी रुग्णालयात जवळपास ५२४ च्या वर रुग्ण उपचार घेत आहेत.

अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधव, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी विविध रुग्णालयांना भेट दिली. अन्न सुरक्षा अधिकारी जाधव यांनी भगरीचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. याबाबत येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे म्हणाले, सध्या उपजिल्हा रुग्णालयात १२० रुग्ण उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालयात व ग्रामीण भागातही दवाखान्यात रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी शक्यतो भगर खाण्याचे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.

कन्नड तालुक्यात १२ जणांना विषबाधाउपवासाची भगर खाल्ल्याने तालुक्यातील १२ जणांना बुधवारी विषबाधा झाली. उलट्या आणि मळमळ होऊ लागल्याने त्यांना कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी आठ जणांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले. मुंडवाडी तांडा व बोलटेक तांडा प्रत्येकी २, नांदगीर वाडी, चिंचखेडा, चापानेर व बनशेंद्रा येथील प्रत्येकी एकावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर जैतापूर येथील २ व बिपखेडा आणि कारखाना येथील प्रत्येकी एका रुग्णावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साध्या पँकिंगमधील भगरीच्या पिठाचा फराळात वापर केल्याने विषबाधा झाली, असे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfood poisoningअन्नातून विषबाधाHealthआरोग्य