शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

food poisoning: उपवासाची भगर बाधली; वैजापूर तालुक्यात ५२४ जण रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2022 11:36 IST

मळमळ, उलट्या होत असल्याने रुग्ण मोठ्या प्रमाणात दवाखान्यात दाखल झाले. सर्वांनी भगर खाल्ल्याचे सांगितले.

वैजापूर (औरंगाबाद) : उपवासाची भगर खाल्ल्याने तालुक्यातील जवळपास ५२४ नागरिकांना बुधवारी विषबाधा झाली असून, त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालये रुग्णांनी खचाखच भरली आहेत.

लासूर स्टेशन येथे मंगळवारी भगर खाल्ल्याने १३ जणांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली होती. बुधवारी वैजापूर तालुक्यात सकाळपासून भगरने विषबाधा झालेले रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल होण्यास सुरुवात झाली. मळमळ, उलट्या होत असल्याने रुग्ण मोठ्या प्रमाणात दवाखान्यात दाखल झाले. सर्वांनी भगर खाल्ल्याचे सांगितले. वांजरगाव, डवाळा, नगिना पिंपळगाव, आलापूरवाडी, आघूर आदी अनेक गावांतील ग्रामस्थांना विषबाधा झाली. शहरात १०६ रुग्णांची नोंद अधिकृत नोंद झाली असली तरी विविध शासकीय व खासगी रुग्णालयात जवळपास ५२४ च्या वर रुग्ण उपचार घेत आहेत.

अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधव, पोलीस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत यांनी विविध रुग्णालयांना भेट दिली. अन्न सुरक्षा अधिकारी जाधव यांनी भगरीचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. याबाबत येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे म्हणाले, सध्या उपजिल्हा रुग्णालयात १२० रुग्ण उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालयात व ग्रामीण भागातही दवाखान्यात रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी शक्यतो भगर खाण्याचे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले.

कन्नड तालुक्यात १२ जणांना विषबाधाउपवासाची भगर खाल्ल्याने तालुक्यातील १२ जणांना बुधवारी विषबाधा झाली. उलट्या आणि मळमळ होऊ लागल्याने त्यांना कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यापैकी आठ जणांना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आले. मुंडवाडी तांडा व बोलटेक तांडा प्रत्येकी २, नांदगीर वाडी, चिंचखेडा, चापानेर व बनशेंद्रा येथील प्रत्येकी एकावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर जैतापूर येथील २ व बिपखेडा आणि कारखाना येथील प्रत्येकी एका रुग्णावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साध्या पँकिंगमधील भगरीच्या पिठाचा फराळात वापर केल्याने विषबाधा झाली, असे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfood poisoningअन्नातून विषबाधाHealthआरोग्य