शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

शिळ्या पोळ्यांची ५ रुपये किलोने विक्री; पशुखाद्य निर्मिती उद्योगाने ७० कुटुंबांना रोजगार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 18:34 IST

औरंगाबादमध्ये आठवड्याला जमा होतात २० टन पोळ्या; पशुखाद्य तयार करण्यासाठी होतोय वापर 

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : शहरात दर आठवड्याला २० टनांपेक्षा अधिक शिळ्या पोळ्या कचऱ्यात फेकून दिल्या जातात. या पोळ्यांना चक्क किलोमागे ५ रुपयांचा भाव मिळतोय... जमा झालेल्या या पोळ्यांचेच नंतर पशुखाद्य तयार केले जाते. हे वाचून प्रत्येकाला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.

मागील काही महिन्यांत शहरात शिल्लक पोळ्या कचऱ्यात फेकून देण्याचे प्रमाण वाढले आहे. शिळ्या कडक पोळ्या कुत्रेही खात नाहीत. त्यांनाही माणसाप्रमाणे ताज्या पोळ्या लागतात, असे बोलले जाते. अनेकजण शिल्लक राहिलेल्या पोळ्या जनावरे खातील म्हणून रस्त्यावर ठेवतात, तर काहीजण त्या अक्षरश: कचराकुंडीत फेकून देतात. अनेकजण त्या घंटागाडीत टाकतात. कचरावेचक तसेच घंटागाडीवाले या शिळ्या पोळ्या वेचून ५ रुपये किलो दराने विकतात. यावरच शहरातील काही परिवारांचा उदरनिर्वाह चालतो.

या जमा केलेल्या पोळ्या नारेगावातील पशुखाद्य बनविणाऱ्यांना ६ रुपये किलो दराने विकले जाते. नारेगावमध्ये ४ परिवार या शिळ्या पोळ्यांना चांगले वाळवितात. त्यानंतर त्यांना स्वच्छ करून मशीनद्वारे त्याचा भरडा तयार केला जातो. या भरड्यात गिरणीतील शिल्लक पीठ, दुकानात कचऱ्यात आलेली ज्वारी, गहू, डाळीं, खराब बिस्कीट, पाव, टोस्ट याचाही समावेश असतो. या भरड्याचेच पशुखाद्य तयार करून ते गोशाळा, म्हशी, गाईचे गोठ्यांना १२ रुपये किलोने विकले जाते. दररोज नारेगावातच ५० टनापर्यंत पशुखाद्य तयार होते. शिळ्या पोळ्यांवर प्रक्रिया करून पशुखाद्य बनविण्याच्या या व्यवसायात शहरात ७० पेक्षा अधिक कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे.

पोळ्या कचऱ्यात फेकून देऊ नयेआपण एवढे कष्ट करतो ते अन्नासाठीच. शक्यतो पोळ्या शिल्लक राहू नये. जर शिळ्या पोळ्या राहिल्या, तर त्या कचऱ्यात फेकून देऊ नका. घंटागाडीत द्या. कारण, त्या पोळ्याचे पशुखाद्य तयार करून जनावरांच्या कामी येतात.- शेख नसीफ, शिळ्या पोळ्या खरेदीदार

गोठ्यावाल्यांना विकतात पशुखाद्यमागील वर्षभरात शिळ्या पोळ्या येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांचे मशीनवर भरड तयार केली जाते. हे पशुखाद्य गोठ्यावाले खरेदी करतात. खल्लीपेक्षाही हे पशुखाद्य स्वस्त पडते. आठवडाभरात ४० टनांपेक्षा अधिक पशुखाद्य विक्री होते.- शेख सईद, पशुखाद्य विक्रेता

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादfoodअन्न