शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जनजागृतीवर भर देणार

By admin | Updated: September 28, 2014 00:42 IST

लातूर : जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे़ लोकसभा निवडणुकीत ६२ टक्के मतदान झाले़ अनेक बुथवर

लातूर : जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे़ लोकसभा निवडणुकीत ६२ टक्के मतदान झाले़ अनेक बुथवर ५० टक्केपेक्षा कमी मतदान झाल्याने आता प्रशासनाकडून अशा बुथवर मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत़ विधानसभा निवडणुकीत किमान ८० टक्के मतदान होईल, असे उद्द्ष्टि असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी सांगितले़ शाळा- महाविद्यालयाच्या माध्यमातून जनजागरण केले जाणार आहे़ तसेच महिला बचत गटांचा मेळावा, शाळांमध्ये पालक मेळावा, निबंध स्पर्धा, सर्वाधिक मतदान झालेल्या बुथवरील मतदान केंद्र अधिकाऱ्यांचा गौरव आदी उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पोले म्हणाले़ लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावायला हवा़ ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मतदानाची टक्केवारी कमी आहे़शहरी भागात सुशिक्षित मतदार असले ते बऱ्याचदा घराबाहेर पडत नाहीत़ त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यात माहितीपत्रकाचे वाटप केले जाणार आहे़ लातूर शहरात मागील निवडणुकीत जिल्ह्यात सर्वात कमी मतदान झाले आहे, लातूर शहर व उदगीर तालुक्यात मतदानाचे एकूण प्रमाण वाढायला हवे, यासाठी जनजागरण करण्यात येणार आहे़ तशी तयारी प्रशासनाकडून करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी पोले यांनी सांगितले़ जिल्हा पुरवठा अधिकारी अनंत गव्हाणे यांची उपस्थिती होती़ (प्रतिनिधी)