शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

जॅकवेलच्या पहिल्या टप्प्याचे काम संपविण्यावर भर; मार्चअखेरपर्यंत २०० एमएलडी पाण्याचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:55 IST

२७४० कोटी रुपये खर्च करून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणात जॅकवेल (पाणी उपसा केंद्र) उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जॅकवेलच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण मार्चअखेरपर्यंत संपविण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने डाेळ्यांसमोर ठेवले आहे.

२७४० कोटी रुपये खर्च करून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम आतापर्यंत ७० टक्के पूर्ण झाले. या योजनेचा आत्मा म्हणजे जॅकवेल आहे. धरण तुडुंब भरलेले असतानाही कॉफर डॅम्प उभारून रात्रं-दिवस काम सुरू आहे. जॅकवेल १०० मीटर लांब, ३४ मीटर रुंद, खोल १९ मीटर आहे. ११ मीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले. संपूर्ण काम मार्चअखेरपर्यंत होणे शक्य नाही. त्यामुळे जॅकवेलचा एक टप्पा पूर्ण केला तरी २०० एमएलडी पाण्याचा उपसा करणे सहज शक्य आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी हे अंतर ३९ किमी असून, आतापर्यंत ३४ किमी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले. उर्वरित ४ किमीसाठी दररोज काम सुरू आहे. नॅशनल हायवेने जलवाहिनीवर रस्ता तयार केला. त्यामुळे कामावर कोणताही परिणाम नाही. मजीप्रा कोणत्याही जुगाड पद्धतीचा अवलंब न करता एअर व्हॉल्व्ह नियमानुसारच उभारणार आहे.

जॅकवेलला फुटला पाझरजायकवाडी धरण तुडुंब भरलेले आहे. जॅकवेलमध्ये २४ तासात २०० एमएलडी पाणी पाझरून येते. हे पाणी बाहेर काढण्यासाठी दहा पंप २४ तास सुरू ठेवावे लागते. एकही मोटार बंद ठेवली तर जॅकवेलमध्ये कामच करता येत नाही.

मुख्य अभियंत्यांचे मतमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितले की, जॅकवेलच्या एका बाजूचे काम पूर्ण करून दोन पंप बसवता येतील. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणाहून २०० एमएलडी पाणी उपसा करता येईल.

नक्षत्रवाडीत ३ फिल्टर तयारनक्षत्रवाडीच्या डोंगरावर जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे. सहा फिल्टर टँकपैकी तीन टँक तयार झाले आहेत. त्यामुळे मार्चपर्यंत जलवाहिनीचे व जॅकवेलचे काम पूर्ण करण्याचे आव्हान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणसमोर आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणी