शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जॅकवेलच्या पहिल्या टप्प्याचे काम संपविण्यावर भर; मार्चअखेरपर्यंत २०० एमएलडी पाण्याचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 14:55 IST

२७४० कोटी रुपये खर्च करून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीनगर : जायकवाडी धरणात जॅकवेल (पाणी उपसा केंद्र) उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जॅकवेलच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण मार्चअखेरपर्यंत संपविण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने डाेळ्यांसमोर ठेवले आहे.

२७४० कोटी रुपये खर्च करून शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम आतापर्यंत ७० टक्के पूर्ण झाले. या योजनेचा आत्मा म्हणजे जॅकवेल आहे. धरण तुडुंब भरलेले असतानाही कॉफर डॅम्प उभारून रात्रं-दिवस काम सुरू आहे. जॅकवेल १०० मीटर लांब, ३४ मीटर रुंद, खोल १९ मीटर आहे. ११ मीटरपर्यंतचे काम पूर्ण झाले. संपूर्ण काम मार्चअखेरपर्यंत होणे शक्य नाही. त्यामुळे जॅकवेलचा एक टप्पा पूर्ण केला तरी २०० एमएलडी पाण्याचा उपसा करणे सहज शक्य आहे. जायकवाडी ते नक्षत्रवाडी हे अंतर ३९ किमी असून, आतापर्यंत ३४ किमी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले. उर्वरित ४ किमीसाठी दररोज काम सुरू आहे. नॅशनल हायवेने जलवाहिनीवर रस्ता तयार केला. त्यामुळे कामावर कोणताही परिणाम नाही. मजीप्रा कोणत्याही जुगाड पद्धतीचा अवलंब न करता एअर व्हॉल्व्ह नियमानुसारच उभारणार आहे.

जॅकवेलला फुटला पाझरजायकवाडी धरण तुडुंब भरलेले आहे. जॅकवेलमध्ये २४ तासात २०० एमएलडी पाणी पाझरून येते. हे पाणी बाहेर काढण्यासाठी दहा पंप २४ तास सुरू ठेवावे लागते. एकही मोटार बंद ठेवली तर जॅकवेलमध्ये कामच करता येत नाही.

मुख्य अभियंत्यांचे मतमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितले की, जॅकवेलच्या एका बाजूचे काम पूर्ण करून दोन पंप बसवता येतील. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणाहून २०० एमएलडी पाणी उपसा करता येईल.

नक्षत्रवाडीत ३ फिल्टर तयारनक्षत्रवाडीच्या डोंगरावर जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे. सहा फिल्टर टँकपैकी तीन टँक तयार झाले आहेत. त्यामुळे मार्चपर्यंत जलवाहिनीचे व जॅकवेलचे काम पूर्ण करण्याचे आव्हान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणसमोर आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरWaterपाणी