शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

महापालिका वार्ड आरक्षण सोडतीवर येणार आक्षेपांचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:34 IST

पहिल्याच दिवशी मनपाच्या निवडणूक विभागात सहा आक्षेप दाखल

औरंगाबाद : महापालिकेने सोमवारी वॉर्ड आरक्षणासाठी सोडत घेतली. याचवेळी ११५ वॉर्डांची नवीन रचना जाहीर केली. अत्यंत मनमानी पद्धतीने वॉर्ड फोडण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मोजक्याच राजकीय मंडळींचे हित जोपासण्यासाठी हा सर्व खटाटोप केल्याचा आरोप उघडपणे होत आहे. मनपा प्रशासनाने वॉर्ड रचना, सोडतीवर आक्षेप स्वीकारण्यास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी सहा आक्षेप दाखल झाले.

महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे ११ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप स्वीकारले जाणार आहेत. पुढील सात दिवसांमध्ये निवडणूक विभागाकडे आक्षेपांचा महापूर येणार आहे. या सर्व आक्षेपांवर राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी सुनावणी घेणार आहेत. महापालिकेने प्रकाशित केलेले नकाशे आणि प्रत्यक्षात वॉर्डाची चतु:सीमा यात बराच फरक पडत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. भौगोलिक रचनेचा कुठेही विचार करण्यात आलेला नाही. संजयनगर सी या भागात एकाच अंतर्गत रोडवर तीन वॉर्डांचा समावेश केल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. संजयनगर हा जुना वॉर्डच गायब करण्यात आला आहे. या वॉर्डाचे मतदार तीन इतर वॉर्डांमध्ये टाकण्यात आले आहेत. रस्ता ओलांडून वॉर्ड तोडू नये असे निकष निवडणूक आयोगानेच ठरवून दिलेले आहेत.

या सर्व निकषांची पायमल्ली वॉर्ड रचनेत झाली आहे. त्याचप्रमाणे वॉर्ड आरक्षण सोडतीवर आक्षेप नोंदविण्यात येत आहेत. सोमवारी पहिल्याच दिवशी मनपाच्या निवडणूक विभागाकडे ६ आक्षेप प्राप्त झाले. याशिवाय आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी अनेकांनी या विभागात भेट देऊन चौकशी केली. आक्षेप आणि हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत ११ फेब्रुवारी आहे. या मुदतीत शेकडो आक्षेप, हरकती दाखल होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक