शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका वार्ड आरक्षण सोडतीवर येणार आक्षेपांचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 21:34 IST

पहिल्याच दिवशी मनपाच्या निवडणूक विभागात सहा आक्षेप दाखल

औरंगाबाद : महापालिकेने सोमवारी वॉर्ड आरक्षणासाठी सोडत घेतली. याचवेळी ११५ वॉर्डांची नवीन रचना जाहीर केली. अत्यंत मनमानी पद्धतीने वॉर्ड फोडण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मोजक्याच राजकीय मंडळींचे हित जोपासण्यासाठी हा सर्व खटाटोप केल्याचा आरोप उघडपणे होत आहे. मनपा प्रशासनाने वॉर्ड रचना, सोडतीवर आक्षेप स्वीकारण्यास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी सहा आक्षेप दाखल झाले.

महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे ११ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप स्वीकारले जाणार आहेत. पुढील सात दिवसांमध्ये निवडणूक विभागाकडे आक्षेपांचा महापूर येणार आहे. या सर्व आक्षेपांवर राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी सुनावणी घेणार आहेत. महापालिकेने प्रकाशित केलेले नकाशे आणि प्रत्यक्षात वॉर्डाची चतु:सीमा यात बराच फरक पडत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. भौगोलिक रचनेचा कुठेही विचार करण्यात आलेला नाही. संजयनगर सी या भागात एकाच अंतर्गत रोडवर तीन वॉर्डांचा समावेश केल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. संजयनगर हा जुना वॉर्डच गायब करण्यात आला आहे. या वॉर्डाचे मतदार तीन इतर वॉर्डांमध्ये टाकण्यात आले आहेत. रस्ता ओलांडून वॉर्ड तोडू नये असे निकष निवडणूक आयोगानेच ठरवून दिलेले आहेत.

या सर्व निकषांची पायमल्ली वॉर्ड रचनेत झाली आहे. त्याचप्रमाणे वॉर्ड आरक्षण सोडतीवर आक्षेप नोंदविण्यात येत आहेत. सोमवारी पहिल्याच दिवशी मनपाच्या निवडणूक विभागाकडे ६ आक्षेप प्राप्त झाले. याशिवाय आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी अनेकांनी या विभागात भेट देऊन चौकशी केली. आक्षेप आणि हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत ११ फेब्रुवारी आहे. या मुदतीत शेकडो आक्षेप, हरकती दाखल होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूक