शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
5
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
6
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
7
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
8
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
9
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
10
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
11
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
12
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
13
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
14
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
15
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
16
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
17
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
18
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

औरंगाबाद जिल्ह्यातील संभाव्य पूरग्रस्त गावे निश्चित; शीघ्र प्रतिसाद पथकही सज्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 6:30 PM

पावसाळा तोंडावर आला आहे. संभाव्य जलजन्य आजार, साथरोग व पूर परिस्थितीमध्ये नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे

ठळक मुद्देजिल्हास्तरीय पथकांमध्ये ८ तज्ज्ञ डॉक्टर्स सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असतील. प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रांमध्ये औषधांच्या कीट ठेवण्यात आल्या आहेत.

औरंगाबाद : पावसाळा तोंडावर आला आहे. संभाव्य जलजन्य आजार, साथरोग व पूर परिस्थितीमध्ये नागरिकांचा बचाव व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून, पुढील चार महिन्यांत नागरिकांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी दिली. 

यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर म्हणाले की, पावसाळ्यात उद्भवणारे साथरोग, जलजन्य आजार आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या नागरिकांवर त्वरित उपचार करण्यासाठी जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणी नियंत्रण कक्ष सुरू केले आहेत. दुर्दैवाने एखाद्या वेळी पूर परिस्थिती उद्भवली किंवा कुठे साथ पसरली, तर नियंत्रण कक्षातून तात्काळ उपाययोजना केल्या जातील. यासाठी मुबलक औषधी साठाही ठेवण्यात आला आहे. जिल्हास्तरीय व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांमध्ये शीघ्र प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत. 

जिल्हास्तरीय पथकांमध्ये ८ तज्ज्ञ डॉक्टर्स सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असतील. प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच उपकेंद्रांमध्ये औषधांच्या कीट ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातही औषधांचे कीट राखीव ठेवण्यात आले आहेत. कीटमध्ये सलाईन, जलक्षार संजीवनीची पाकिटे, प्रतिजैविके, ताप, सर्दी, खोकला, साथरोग, अतिसारावरील औषधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यात पैठण, वैजापूर आणि गंगापूर या तीन तालुक्यांतील ३९ गावे पूर परिस्थितीने बाधित होतील. याशिवाय पावसाळ्यात उद्भवणारे जलजन्य आजार व साथरोगांमुळे बाधित होणारी औरंगाबाद तालुक्यातील ६ गावे, पैठण तालुक्यातील २२ गावे, गंगापूर तालुक्यातील १९ गावे, वैजापूर तालुक्यातील २७ गावे, सिल्लोड तालुक्यातील १५ गावे, खुलताबाद तालुक्यातील ८ गावे, कन्नड तालुक्यातील २० गावे, सोयगाव तालुक्यातील ४ गावे आणि फुलंब्री तालुक्यातील ८ गावे, अशी एकूण १२९ गावे निश्चित केली असून, या गावांंतील बाधित नागरिकांना तात्काळ औषधोपचार करण्यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणा सतर्क राहील. 

डॉक्टरांचे नाव व मोबाईल नंबरया संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर यांनी सांगितले की, आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कार्यरत डॉक्टरांसोबत संवाद साधण्यासाठी शीघ्र प्रतिसाद पथकांतील डॉक्टरांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंतची नावे व मोबाईल नंबर असलेल्या याद्या ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे, तसेच या आरोग्य केंद्रांतर्गत सर्व उपकेंद्रांच्या ठिकाणी लावल्या जाणार आहेत. फोनवर माहिती मिळताच डॉक्टरांचे पथक त्या ठिकाणी तात्काळ पोहोचू शकेल. 

टॅग्स :Aurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदfloodपूरRainपाऊसdoctorडॉक्टर