शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
13
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
14
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
15
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
16
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
17
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
18
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
19
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
20
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

पाच वर्षे गेली हायस्पीड रेल्वेच्या चर्चेत; २०१६ मध्येच स्पेनच्या तज्ज्ञांनी केली होती पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 16:21 IST

Mumbai-Aurangabad-Nagpur Highspeed Railway : हायस्पीड रेल्वेमुळे औरंगाबादहून मुंबईपर्यंतचा प्रवास अवघ्या दोन तासांत शक्य होणार आहे; मात्र हे दिवास्वप्नच ठरत आहे.

ठळक मुद्देकधी हायस्पीड तर कधी बुलेट ट्रेनचा विषय कधी औरंगाबाद वगळले, कधी समावेश

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : मुंबई ते नागपूर (व्हाया औरंगाबाद) हायस्पीड रेल्वेचा ( High Speed Railway ) विषय पुन्हा एकदा समोर आला असला तरी या रेल्वेच्या चर्चेतच मागची पाच वर्षे गेली आहेत. कधी हायस्पीड तर कधी बुलेट ट्रेन ( Bullet Train ) धावणार असल्याचे सांगितले जाते; मात्र जिथे दुहेरीकरणाच्या प्रतीक्षेत २० वर्षे लोटली, तिथे बुलेट ट्रेन प्रत्यक्षात कधी धावणार, असा सवाल उपस्थित होत आहे. (Five years have passed in the discussion of high-speed railways; In 2016, a survey was conducted by Spanish experts in Aurangabad ) 

हायस्पीड रेल्वेमुळे औरंगाबादहून मुंबईपर्यंतचा प्रवास अवघ्या दोन तासांत शक्य होणार आहे; मात्र हे दिवास्वप्नच ठरत आहे. भारतीय रेल्वे आणि स्पेन रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे काॅरिडाॅर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १० मार्च २०१६ रोजी स्पेनमधील अधिकारी जे. जे. ओटोरिओ, एफ. जे. डी. साॅब्रोनो, अल्बट्रो ओट्रेगा माॅस्टिरिओ आणि कार्लोस ॲपॅरिशियो यांनी औरंगाबाद रेल्वेस्टेशनला भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी काॅरिडाॅरमध्ये औरंगाबादचा समावेश होण्यासाठी सर्व बाबी अनुकूल असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे आगामी काही वर्षात औरंगाबादमार्गे २०० ते ३०० कि.मी. वेगाने अतिजलद रेल्वे धावण्याचा मार्ग मोकळा झाला आणि औरंगाबादहून नागपूर, मुंबई अवघ्या दोन तासात गाठणे लवकरच शक्य होईल, असे म्हटले गेले. पण पाच वर्षे लाेटली तरी अजूनही हीच बाब वारंवार सांगितली जात आहे.

'मुंबई-औरंगाबाद-नागपूर' बुलेट ट्रेन ड्रीम प्रोजेक्ट : रावसाहेब दानवे

कधी औरंगाबाद वगळले, कधी समावेशहायस्पीड रेल्वे प्रकल्पातून औरंगाबाद वगळण्यात आल्याचा गतवर्षी मुद्दा समोर आला. तेव्हा सप्टेंबर २०२० मध्ये खा. इम्तियाज जलील ( Imtiaz jalil ) यांनी रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांची भेट घेतली. तेव्हा पर्यटन आणि उद्योगांचे प्रमुख केंद्र म्हणून रेल्वेला औरंगाबादचे महत्त्व माहीत आहे. त्यामुळे मुंबई - नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्पातून औरंगाबाद वगळले जाणार नाही, अशी माहिती रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी खा. जलील यांना दिली.

गेल्या २० वर्षांपासून प्रतीक्षारेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाची गेल्या २० वर्षांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे. पण अजूनही काम झालेले नाही. मग हायस्पीड किंवा बुलेट ट्रेन कधी धावणार, असा प्रश्न आहे. मुंबईत दीड तासांत पोहोचू तेव्हा पोहोचू, पण आजघडीला प्रवाशांसाठी साध्या पॅसेंजर रेल्वेही सुरु नाहीत.- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादraosaheb danveरावसाहेब दानवेrailwayरेल्वेtourismपर्यटन