शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

विद्यापीठातर्फे पाच जणांना ‘जीवनगौरव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 1:22 AM

विद्यापीठातर्फे प्रशासन, विधि, पत्रकारिता, समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील पाच मान्यवरांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यापीठातर्फे प्रशासन, विधि, पत्रकारिता, समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातील पाच मान्यवरांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट संशोधन करणाºया प्राध्यापकांच्या नावांची घोषणाही यावेळी करण्यात आली.विद्यापीठाच्या वर्धापन दिनाला विविध क्षेत्रातील पाच मान्यवरांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्याची परंपरा कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी सुरू केली आहे. यावर्षी प्रशासनातील दीर्घ अनुभवी सेवानिवृत्त भुजंगराव कुलकर्णी, विधि क्षेत्रातील न्यायमूर्ती सी. एल. थुल, सामाजिक कार्यातील डॉ. विश्वनाथ कराड, पत्रकारितेतील ज्येष्ठ पत्रकार मुरलीधर शिंगोटे आणि शिक्षण क्षेत्रातील डॉ. जगन्नाथ पाटील यांना कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या हस्ते सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.प्रास्ताविक करताना कुलगुरू म्हणाले, विविध क्षेत्रात मोलाचे कार्य करणाºया मान्यवरांचा गौरव विद्यापीठातर्फे करण्यात येत आहे. हा ज्ञानवंतांचा सत्कार आहे. पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या सन्मानपत्राचे लेखन डॉ. दासू वैद्य, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. क्रांती व्यवहारे, डॉ. उत्तम अंभोरे, डॉ. भारती गोरे, संजय शिंदे यांनी केले. तर सन्मानपत्राचे वाचन प्रा. पराग हासे, डॉ. मुस्तजिब खान, डॉ. अपर्णा अष्टपुत्रे, डॉ. सोनाली क्षीरसागर यांनी केले. डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे यांनी आभार मानले. यावेळी परीक्षा मंडळाचे संचालक डॉ.राजेश रगडे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तसेच अरविंद भालेराव, सचिन चव्हाण, यशपाल साळवे, दिनेश कोलते, दिवाकर पाठक, प्रा. सचिन भालशंकर यांना उत्कृष्ट कार्याबद्दल गौरविण्यात आले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विभागप्रमुख, विद्यार्थी मोठ्य संख्येने उपस्थित होते.