औरंगाबाद : रविवारी लग्नमुहूर्तावर मंगलाष्टक सुरूझाले आणि शुभमंगल सावधान म्हणताच ५ जोडपी विवाहबद्ध झाले... या सामूहिक लग्नसोहळ्यात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी खंडेलवाल मारवाडी समाजातील हजारो लोक आले होते. सामूहिक विवाह लावून देण्याची ही प्रथा मागील २८ वर्षांपासून सुरू ठेवून खंडेलवाल समाजाने आदर्श निर्माण केला आहे. सिडको एन-६ परिसरातील कुलस्वामिनी मंगल कार्यालयात खंडेलवाल विकास मंच व खंडेलवाल समाज महिला मंडळाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून महासभेचे उपाध्यक्ष मदनलाल दुसाद, सुरेश रावत, हुकुमीचंद पितलिया, ज्येष्ठ पत्रकार शामकुमार भुखमारिया, लक्ष्मीनारायण कुलवाल, गोविंद सिरोया, अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलनाच्या प्रांताध्यक्षा रेखा राठी, उपाध्यक्षा प्रमिला दुसाद, पुष्पा खुटेटा, वनिता नाटानी यांची प्रमुख उपस्थिती होती. विवाह सोहळा यशस्वीतेसाठी नरेंद्र तांबी, कैलास नाटानी, विलास भुखमारिया, संजय माठा, आशिष मेहता, राजेंद्र कासलीवाल, किशोर खुटेटा, प्रदीपकुमार कुलवाल, सोमनाथ तांबी, नितीन जंघीनिया आदींनी परिश्रम घेतले.
हजारोंच्या साक्षीने ५ जोडपी विवाहबद्ध
By admin | Updated: April 18, 2016 00:53 IST