शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

नोव्हेंबर अखेरीस येणार पाच शहर बस; शहरवासीयांची प्रतीक्षा संपणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 7:20 PM

नोव्हेंबरअखेरपर्यंत शहरात पाच बसेस दाखल होणार आहेत. डिसेंबरअखेरीस आणखी ५० बसेस प्राप्त होतील.

ठळक मुद्देडिसेंबरअखेरीस ५० बस येणारमात्र तयारीचा आहे अभाव

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत महापालिका शहर बससेवा सुरू करणार आहे. दिवाळीत ही बससेवा सुरू व्हावी यासाठी मनपा प्रशासन, पदाधिकाऱ्यांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. महापालिकेला बस बांधणी करून देणाऱ्या कंपनीने दिवाळीपर्यंत काम पूर्ण होणार नसल्याचे सांगितले. नोव्हेंबरअखेरपर्यंत शहरात पाच बसेस दाखल होणार आहेत. डिसेंबरअखेरीस आणखी ५० बसेस प्राप्त होतील.

महापालिका एका बसवर तब्बल ३६ ते ४० लाख रुपये खर्च करीत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बसेसही अत्यंत लक्झरी असाव्यात, अशी अपेक्षा टाटा कंपनीकडे व्यक्त करण्यात आली आहे. बसेसची बांधणी कशा पद्धतीने सुरू आहे, याची पाहणी करण्यासाठी बुधवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी धारवाड येथे भेट दिली. शहरात धावणाऱ्या बसेस कशा असतील याची माहिती त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिली.

प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना घोडेले यांनी सांगितले की, नोव्हेंबरअखेरीस शहरात पाच बसेस दाखल होणार आहेत. बसेसवर ऐतिहासिक विविध पर्यटनस्थळांचे चित्र आहे. अत्यंत लक्झरी स्वरुपाच्या या गाड्या आहेत. डिसेंबरअखेरीस आणखी ५० बसेस मनपाला मिळतील. या बसेस चालविण्यासाठी महापालिकेने एस.टी. महामंडळासोबत करार केला आहे. महामंडळ कर्मचारी, डेपो, सर्व्हिसिंग सेटर उपलब्ध करून देणार आहे.

तयारीचा अभावयेणाऱ्या दीड महिन्यात ५५ बसेस प्राप्त होतील. या बसेस कोणत्या रूटवर धावतील हे निश्चित केलेले नाही. त्यासाठी मनपाने परिवहन समितीही तयार केलेली नाही. तिकिटाचे दर निश्चित करून प्रादेशिक परिवहन विभागाची मंजुरी घेतलेली नाही. शहरात १०० पेक्षा अधिक अत्याधुनिक बसथांबे मनपाला उभे करावे लागतील. जुन्या बसस्थानकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मनपाने अद्याप तयारीसाठी लागणारी कामेच सुरू केलेली नाहीत. मागील काही दिवसांपासून निव्वळ बस खरेदीची घाई करण्यात येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाstate transportएसटी