शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

नोव्हेंबर अखेरीस येणार पाच शहर बस; शहरवासीयांची प्रतीक्षा संपणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 19:24 IST

नोव्हेंबरअखेरपर्यंत शहरात पाच बसेस दाखल होणार आहेत. डिसेंबरअखेरीस आणखी ५० बसेस प्राप्त होतील.

ठळक मुद्देडिसेंबरअखेरीस ५० बस येणारमात्र तयारीचा आहे अभाव

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेत महापालिका शहर बससेवा सुरू करणार आहे. दिवाळीत ही बससेवा सुरू व्हावी यासाठी मनपा प्रशासन, पदाधिकाऱ्यांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. महापालिकेला बस बांधणी करून देणाऱ्या कंपनीने दिवाळीपर्यंत काम पूर्ण होणार नसल्याचे सांगितले. नोव्हेंबरअखेरपर्यंत शहरात पाच बसेस दाखल होणार आहेत. डिसेंबरअखेरीस आणखी ५० बसेस प्राप्त होतील.

महापालिका एका बसवर तब्बल ३६ ते ४० लाख रुपये खर्च करीत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून बसेसही अत्यंत लक्झरी असाव्यात, अशी अपेक्षा टाटा कंपनीकडे व्यक्त करण्यात आली आहे. बसेसची बांधणी कशा पद्धतीने सुरू आहे, याची पाहणी करण्यासाठी बुधवारी मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी धारवाड येथे भेट दिली. शहरात धावणाऱ्या बसेस कशा असतील याची माहिती त्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांना दिली.

प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना घोडेले यांनी सांगितले की, नोव्हेंबरअखेरीस शहरात पाच बसेस दाखल होणार आहेत. बसेसवर ऐतिहासिक विविध पर्यटनस्थळांचे चित्र आहे. अत्यंत लक्झरी स्वरुपाच्या या गाड्या आहेत. डिसेंबरअखेरीस आणखी ५० बसेस मनपाला मिळतील. या बसेस चालविण्यासाठी महापालिकेने एस.टी. महामंडळासोबत करार केला आहे. महामंडळ कर्मचारी, डेपो, सर्व्हिसिंग सेटर उपलब्ध करून देणार आहे.

तयारीचा अभावयेणाऱ्या दीड महिन्यात ५५ बसेस प्राप्त होतील. या बसेस कोणत्या रूटवर धावतील हे निश्चित केलेले नाही. त्यासाठी मनपाने परिवहन समितीही तयार केलेली नाही. तिकिटाचे दर निश्चित करून प्रादेशिक परिवहन विभागाची मंजुरी घेतलेली नाही. शहरात १०० पेक्षा अधिक अत्याधुनिक बसथांबे मनपाला उभे करावे लागतील. जुन्या बसस्थानकांची अवस्था अत्यंत वाईट आहे. मनपाने अद्याप तयारीसाठी लागणारी कामेच सुरू केलेली नाहीत. मागील काही दिवसांपासून निव्वळ बस खरेदीची घाई करण्यात येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाstate transportएसटी