शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात बैल धुताना पाच मुलांचा बुडून मृत्यू, दोन सख्ख्या भावांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 20:28 IST

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी वेगवेगळ्या चार गावांत  पोळा सणानिमित्त बैल धूत असताना पाच मुलांचा जलसाठ्यांमध्ये बुडून मृत्यू झाला

 औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी वेगवेगळ्या चार गावांत  पोळा सणानिमित्त बैल धूत असताना पाच मुलांचा जलसाठ्यांमध्ये बुडून मृत्यू झाला. मृतात दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. या घटनांमुळे चारही गावांतील पोळा सणावर शोककळा पसरली आहे.

खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगीनजीक कनकशीळ येथील घटनेत राहुल आबाराव म्हस्के (१४) हा मुलगा बैल धुण्यासाठी पाझर तलावात गेला असता तलावातील विहिरीचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तो सकाळी ३-४ मित्रांसह कनकशीळ येथील गट नं.२३५ मधील विश्वास काशीनाथ कामठे यांच्या शेतातील पाझर तलावात बैल धुण्यासाठी गेला होता. राहुल बुडाल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील म्हस्के वस्तीवरील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरु केले. सकाळी आठ वाजता पाण्यात बुडालेल्या राहुलला ११ वाजता प्रकाश गायकवाड यांनी पाण्याबाहेर काढला. यानंतर राहुलच्या शरीराची हालचाल झाल्याचे जाणवल्याने जमलेल्या नागरिकांना  व नातेवाईकांना आनंद झाला. नागरिकांनी त्यास लगेच पुढील उपचारासाठी एका खाजगी जीपने औरंगाबादच्या  घाटी रुग्णालयात हलविले, परंतु तेथे वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून राहुलला मृत घोषित केले. घाटी रुग्णालयात दुपारी उशिराने शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. राहुल हा बाजारसावंगी येथील जि.प. प्रशालेचा इयत्ता नववीचा विद्यार्थी होता.

दुसरी घटना कन्नड तालुक्यात घडली. अंबाडी धरणात बैल धूत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने अंधानेर येथील कैलास भावराव बाविस्कर (२४) हा रविवारी सकाळी बुडून मरण पावला. कन्नड शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.हे. कॉ.रामचंद्र बोंदरे करीत आहेत.

तिसरी घटना देवगाव रंगारीनजीक माटेगाव शिवारातील छोट्या तलावात घडली. नवनाथ गवळी (१४, रा. चांभारवाडी ) हा वडील ज्ञानेश्वर व आजोबासोबत सकाळी तलावात गुरे धुण्यासाठी गेला होता.काही जनावरे धुणे झाल्यानंतर ज्ञानेश्वर गवळी हे बाजूला बैल बांधण्यासाठी गेले असता त्याच वेळेस नवनाथच्या हातात असलेल्या बैलाने हाताला झटका दिल्याने नवनाथ पाण्यात पडला आणि बुडाला. माजी सरपंच अर्जुन साबळे, अर्जुन गवळी, रामदास गवळी आदींनी त्याला पाण्याबाहेर काढून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. आठवीत शिकणारा नवनाथ हा ज्ञानेश्वर गवळी यांचा एकुलता एक मुलगा होता. ऐन सणाच्या दिवशी एकुलता एक मुलगा गेल्याने गावावर शोककळा पसरली.

सख्या भावांचाअंत

चौथी घटना वैजापूर तालुक्यातील वीरगावनजीक घडली. अमोल रमेश रायते (१७) व ऋषिकेश रमेश रायते ( २० ) हे दोघे सख्खे भाऊ दुपारी ३ वाजता कापूस वाडगाव रस्त्यावरील मुर्शिदापूर शिवारातील तलावात बैल धुण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. दोघेही एक दुस-याला वाचविण्याच्या प्रयत्नात गतप्राण झाले. ग्रामस्थांनी दोघांचे मृतदेह  पाण्याबाहेर काढले. या घटनेची वीरगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.   

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबाद