शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पुढे जायच की मागे; हे अगोदर ठरवा; ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा 'डार्विनचा सिद्धांत' वादावर टोला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 18:13 IST

आपणास पुढे जायचे आहे की मागे, हे अगोदर ठरवून घेतले पाहिजे. डार्विनचा सिद्धांत थेअरी नाही. त्यात वैज्ञानिक तथ्य आहे. त्याच्या आधारावर लोकांनी अंदाज बांधले. ते अंदाज खरे ठरले आहेत. माझ्याकडे काही जुनं आहे, त्याला याचा काही आधार सापडत नाही म्हणून ते चुक आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे केंद्रीय मनुुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंग यांनी  डार्विनचा सिद्धांत चुकीचा असल्याचा दावा औरंगाबादेतील वैदिक संमेलनात बोलताना केला होता. याबाबत डॉ. काकोडकर यांना विचारले असता ते म्हणाले, आपणाला पुढे जायचे की मागे जायचे हे ठरवून घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले

औरंगाबाद : आपणास पुढे जायचे आहे की मागे, हे अगोदर ठरवून घेतले पाहिजे. डार्विनचा सिद्धांत थेअरी नाही. त्यात वैज्ञानिक तथ्य आहे. त्याच्या आधारावर लोकांनी अंदाज बांधले. ते अंदाज खरे ठरले आहेत. माझ्याकडे काही जुनं आहे, त्याला याचा काही आधार सापडत नाही म्हणून ते चुक आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद येथील छत्रपती शाहु महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘इंडस्ट्री अकॅडेमिया एन्गेजमेंट समिट-२०१८’चे पारितोषिक वितरण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर डॉ. काकोडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय मनुुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंग यांनी  डार्विनचा सिद्धांत चुकीचा असल्याचा दावा औरंगाबादेतील वैदिक संमेलनात बोलताना केला होता. याविषयी आणि सध्या सर्वत्र धर्माच्या नावावरच सिद्धांत नाकारण्याचे प्रकार घडत असल्याबाबत डॉ. काकोडकर यांना विचारले असता ते म्हणाले, आपणाला पुढे जायचे की मागे जायचे हे ठरवून घेतले पाहिजे. भारताकडे पारंपरिक ज्ञान मोठे आहे. ‘वुई हॅव गे्रट सिट आॅफ नॉलेज’. ते पारंपरिक ज्ञान विविध प्रकारात आहे. हे ज्ञान तावूनसुलाखून बघितले पाहिजे. तसे न करता तुम्ही मला सांगितले म्हणून मी त्यावर विश्वास ठेवणे याला ज्ञानाचा मार्ग म्हणत नाहीत. हे लक्षात ठेवले पाहिजे. सांगायचा मुद्दा म्हणजे आपणाला पुढे जायचे की नाही हे ठरविलं पाहिजे. डार्विनचा सिद्धांत थेअरी नाही. त्यात वैज्ञानिक तथ्य आहे. त्याच्या आधारावर लोकांनी अंदाज बांधले. ते अंदाज खरे ठरले आहेत. माझ्याकडे काही जुनं आहे, त्याला याचा काही आधार सापडत नाही म्हणून ते चुक... अशा म्हणण्याला कोणताही आधार नाही, असे परखड मत डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केले.

जैतापूरला वेळ लागण्याची शक्यताकोकणातील जैतापूर येथे फ्र ान्सच्या मदतीने अणुप्रकल्प उभारण्यात येत आहे. या अणुप्रकल्पाच्या मदतीसाठी भारताने फ्र ान्सच्या ‘आरेवा’ कंपनीसोबत आतापर्यंत बोलणी केली होती. मात्र या कंपनीची विभागणी होऊन ‘इडिएफ’ कंपनी तयार झाली आहे. भारताला आता ‘इडिएफ’सोबत बोलणी करावी लागेल. यात काही कालावधी जाणार असल्याचेही डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट केले.

व्हिडीओ पहा :

https://www.youtube.com/embed/uLhZ0n8xHsE

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगscienceविज्ञानAurangabadऔरंगाबाद