शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

पुढे जायच की मागे; हे अगोदर ठरवा; ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांचा 'डार्विनचा सिद्धांत' वादावर टोला  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 18:13 IST

आपणास पुढे जायचे आहे की मागे, हे अगोदर ठरवून घेतले पाहिजे. डार्विनचा सिद्धांत थेअरी नाही. त्यात वैज्ञानिक तथ्य आहे. त्याच्या आधारावर लोकांनी अंदाज बांधले. ते अंदाज खरे ठरले आहेत. माझ्याकडे काही जुनं आहे, त्याला याचा काही आधार सापडत नाही म्हणून ते चुक आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे केंद्रीय मनुुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंग यांनी  डार्विनचा सिद्धांत चुकीचा असल्याचा दावा औरंगाबादेतील वैदिक संमेलनात बोलताना केला होता. याबाबत डॉ. काकोडकर यांना विचारले असता ते म्हणाले, आपणाला पुढे जायचे की मागे जायचे हे ठरवून घेतले पाहिजे असे मत व्यक्त केले

औरंगाबाद : आपणास पुढे जायचे आहे की मागे, हे अगोदर ठरवून घेतले पाहिजे. डार्विनचा सिद्धांत थेअरी नाही. त्यात वैज्ञानिक तथ्य आहे. त्याच्या आधारावर लोकांनी अंदाज बांधले. ते अंदाज खरे ठरले आहेत. माझ्याकडे काही जुनं आहे, त्याला याचा काही आधार सापडत नाही म्हणून ते चुक आहे, असे म्हणणे चुकीचे असल्याचे परखड मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ व पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद येथील छत्रपती शाहु महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘इंडस्ट्री अकॅडेमिया एन्गेजमेंट समिट-२०१८’चे पारितोषिक वितरण अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमानंतर डॉ. काकोडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केंद्रीय मनुुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपालसिंग यांनी  डार्विनचा सिद्धांत चुकीचा असल्याचा दावा औरंगाबादेतील वैदिक संमेलनात बोलताना केला होता. याविषयी आणि सध्या सर्वत्र धर्माच्या नावावरच सिद्धांत नाकारण्याचे प्रकार घडत असल्याबाबत डॉ. काकोडकर यांना विचारले असता ते म्हणाले, आपणाला पुढे जायचे की मागे जायचे हे ठरवून घेतले पाहिजे. भारताकडे पारंपरिक ज्ञान मोठे आहे. ‘वुई हॅव गे्रट सिट आॅफ नॉलेज’. ते पारंपरिक ज्ञान विविध प्रकारात आहे. हे ज्ञान तावूनसुलाखून बघितले पाहिजे. तसे न करता तुम्ही मला सांगितले म्हणून मी त्यावर विश्वास ठेवणे याला ज्ञानाचा मार्ग म्हणत नाहीत. हे लक्षात ठेवले पाहिजे. सांगायचा मुद्दा म्हणजे आपणाला पुढे जायचे की नाही हे ठरविलं पाहिजे. डार्विनचा सिद्धांत थेअरी नाही. त्यात वैज्ञानिक तथ्य आहे. त्याच्या आधारावर लोकांनी अंदाज बांधले. ते अंदाज खरे ठरले आहेत. माझ्याकडे काही जुनं आहे, त्याला याचा काही आधार सापडत नाही म्हणून ते चुक... अशा म्हणण्याला कोणताही आधार नाही, असे परखड मत डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केले.

जैतापूरला वेळ लागण्याची शक्यताकोकणातील जैतापूर येथे फ्र ान्सच्या मदतीने अणुप्रकल्प उभारण्यात येत आहे. या अणुप्रकल्पाच्या मदतीसाठी भारताने फ्र ान्सच्या ‘आरेवा’ कंपनीसोबत आतापर्यंत बोलणी केली होती. मात्र या कंपनीची विभागणी होऊन ‘इडिएफ’ कंपनी तयार झाली आहे. भारताला आता ‘इडिएफ’सोबत बोलणी करावी लागेल. यात काही कालावधी जाणार असल्याचेही डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट केले.

व्हिडीओ पहा :

https://www.youtube.com/embed/uLhZ0n8xHsE

टॅग्स :Satyapal Singhसत्यपाल सिंगscienceविज्ञानAurangabadऔरंगाबाद