शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

पहिले यश ! वंचित आघाडीचा प्रयोग यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 20:43 IST

आंबेडकरी अनुयायांचा जलील यांना भक्कम पाठिंबा

औरंगाबाद : मतमोजणीत पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत किरकोळ आघाडी राखलेल्या वंचित बहुजन आघाडी, एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शेवटी शिवसेनेचा गड पाडला. वंचित बहुजन आघाडीला राज्यात मिळालेले हे एकमेव यश. गेल्या आठ महिन्यांपासून शहरात झपाटल्यागत नि:स्वार्थ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तळमळीचे हे यश आहे. 

औरंगाबाद हे तसे आंबेडकरी चळवळीचे केंद्र. कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर शहरात उमटलेल्या प्रतिक्रियेनंतर येथे आंबेडकरी चळवळ, विचारधारेतील राजकीय कार्यकर्ते व अनुयायांच्या ध्रुवीकरणास वेग आला होता. या वेगाला बळ व गती दिली ती अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व बॅ. असदोद्दीन ओवेसी यांच्या गत वर्षी नोव्हेंबरमध्ये जबिंदा मैदानावर झालेल्या टोलेजंग सभेने. या सभेपासूनच वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक विलक्षण उत्साह संचारलेला होता. तो उत्साह व विश्वास कार्यकर्त्यांनी विजयात परावर्तित करेपर्यंत कायम राखला, हे विशेष. 

लोकसभेचे पडघम वाजू लागले, तसे वंचित आघाडी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांसह जनतेनेही व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमातून प्रचाराची राळ उठविली होती. अ‍ॅड. आंबेडकर व बॅ. ओवेसी यांच्या प्रचंड गर्दी खेचणाऱ्या संयुक्त सभा राज्यभरात झाल्या. या सभा व वेळोवेळी होणाऱ्या निर्णयाची सकारात्मक प्रसिद्धी या समाजमाध्यमातून कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे करून जनमत आपल्या बाजूने जोडण्याचे काम केले. सोबतच गेली चार टर्म औरंगाबादचे खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांना विकासकामे करण्यात आलेले अपयश, शहराच्या झालेल्या दुर्दशेच्या पोस्टही फिरवून मतदारांत रोष निर्माण करण्यातही ही मंडळी अग्रेसर होती. वंचित आघाडीचा उमेदवार निवडीतून झालेला संभ्रम दूर करीत आ. इम्तियाज जलील यांचा नवा व समंजस चेहरा घराघरांत पोहोचविण्याचे कामही याच नेटकरी मंडळीने लीलया पार पाडले. 

कमावलेला विश्वास व मत हस्तांतरणमुस्लिम व आंबेडकरी अनुयायी या निवडणुकीत एकत्र आले. त्यांनी जलील यांना भक्कम पाठिंबा दिला. दोन्ही समाजांनी एकमेकांविषयी यानिमित्ताने कमालीचा विश्वास निर्माण केल्याचे दिसले. तो शेवटपर्यंत टिकला. जलील यांची उमेदवारी दाखल करताना निघालेल्या रॅलीने या दोन्ही समाजाच्या ऐक्याचे संकेत दिले होते. आंबेडकरी अनुयायांची मते मुस्लिम उमेदवाराला हस्तांतरित होतील का, अशी उपस्थित केली जाणारी शंकाही यानिमित्ताने फोल ठरली आहे. 

मतदारांना अपील करणारा चेहराआ. इम्तियाज जलील यांचा सर्वसमावेशक चेहराही मतदारांना अपील करणारा ठरला. आ. जलील यांनी वेळोवेळी घेतलेली समंजस भूमिकाही शहरातील संभाव्य तणाव निवळण्याच कारणीभूत ठरली. त्यामुळेच प्रत्येक मतदारसंघातून व समाजातील बहुतांश सर्वच स्तरांतून जलील यांना काहीना काही मतदान मिळाले. खैरे यांच्याविरुद्ध तयार झालेले जनमत व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा फॅक्टरचा खुबीने वापर करून केलेल्या मतविभाजनाने इम्तियाज जलील यांचा विजयाचा मार्ग प्रशस्त केला, हे खरेच.  

प्रत्येकाने जमेल तसा प्रचार केला

श्रमिक, कामगार वसाहतींमधून इम्तियाज जलील यांना मतदान करण्यात आले. त्यापूर्वी आर्थिक मदतही करण्यात आली. प्रत्यक्ष उमेदवार किंवा कुणी नेता वसाहतीत येण्याची वाट कुणीच पाहिली नाही. प्रत्येकाने जमेल तसा प्रचार केला. विशेषत: घराघरांतून, नातेवाईकांना भेटून आपला उमेदवार व त्याची निशाणी आवर्जून सांगण्यात येत होती. आंबेडकरी अनुयायी व मुस्लिम वसाहतींमधून मतदानाच्या दिवशी प्रचंड उत्साह होता. या दोन्ही समाजांनी भरभरून व उत्स्फूर्त मतदान केले. त्यांच्या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीने निसटता विजय इम्तियाज जलील यांना नोंदविता आला. 

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019