शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

पहिले यश ! वंचित आघाडीचा प्रयोग यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 20:43 IST

आंबेडकरी अनुयायांचा जलील यांना भक्कम पाठिंबा

औरंगाबाद : मतमोजणीत पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत किरकोळ आघाडी राखलेल्या वंचित बहुजन आघाडी, एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शेवटी शिवसेनेचा गड पाडला. वंचित बहुजन आघाडीला राज्यात मिळालेले हे एकमेव यश. गेल्या आठ महिन्यांपासून शहरात झपाटल्यागत नि:स्वार्थ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तळमळीचे हे यश आहे. 

औरंगाबाद हे तसे आंबेडकरी चळवळीचे केंद्र. कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर शहरात उमटलेल्या प्रतिक्रियेनंतर येथे आंबेडकरी चळवळ, विचारधारेतील राजकीय कार्यकर्ते व अनुयायांच्या ध्रुवीकरणास वेग आला होता. या वेगाला बळ व गती दिली ती अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर व बॅ. असदोद्दीन ओवेसी यांच्या गत वर्षी नोव्हेंबरमध्ये जबिंदा मैदानावर झालेल्या टोलेजंग सभेने. या सभेपासूनच वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक विलक्षण उत्साह संचारलेला होता. तो उत्साह व विश्वास कार्यकर्त्यांनी विजयात परावर्तित करेपर्यंत कायम राखला, हे विशेष. 

लोकसभेचे पडघम वाजू लागले, तसे वंचित आघाडी व एमआयएमच्या कार्यकर्त्यांसह जनतेनेही व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुकसारख्या समाजमाध्यमातून प्रचाराची राळ उठविली होती. अ‍ॅड. आंबेडकर व बॅ. ओवेसी यांच्या प्रचंड गर्दी खेचणाऱ्या संयुक्त सभा राज्यभरात झाल्या. या सभा व वेळोवेळी होणाऱ्या निर्णयाची सकारात्मक प्रसिद्धी या समाजमाध्यमातून कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे करून जनमत आपल्या बाजूने जोडण्याचे काम केले. सोबतच गेली चार टर्म औरंगाबादचे खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यांना विकासकामे करण्यात आलेले अपयश, शहराच्या झालेल्या दुर्दशेच्या पोस्टही फिरवून मतदारांत रोष निर्माण करण्यातही ही मंडळी अग्रेसर होती. वंचित आघाडीचा उमेदवार निवडीतून झालेला संभ्रम दूर करीत आ. इम्तियाज जलील यांचा नवा व समंजस चेहरा घराघरांत पोहोचविण्याचे कामही याच नेटकरी मंडळीने लीलया पार पाडले. 

कमावलेला विश्वास व मत हस्तांतरणमुस्लिम व आंबेडकरी अनुयायी या निवडणुकीत एकत्र आले. त्यांनी जलील यांना भक्कम पाठिंबा दिला. दोन्ही समाजांनी एकमेकांविषयी यानिमित्ताने कमालीचा विश्वास निर्माण केल्याचे दिसले. तो शेवटपर्यंत टिकला. जलील यांची उमेदवारी दाखल करताना निघालेल्या रॅलीने या दोन्ही समाजाच्या ऐक्याचे संकेत दिले होते. आंबेडकरी अनुयायांची मते मुस्लिम उमेदवाराला हस्तांतरित होतील का, अशी उपस्थित केली जाणारी शंकाही यानिमित्ताने फोल ठरली आहे. 

मतदारांना अपील करणारा चेहराआ. इम्तियाज जलील यांचा सर्वसमावेशक चेहराही मतदारांना अपील करणारा ठरला. आ. जलील यांनी वेळोवेळी घेतलेली समंजस भूमिकाही शहरातील संभाव्य तणाव निवळण्याच कारणीभूत ठरली. त्यामुळेच प्रत्येक मतदारसंघातून व समाजातील बहुतांश सर्वच स्तरांतून जलील यांना काहीना काही मतदान मिळाले. खैरे यांच्याविरुद्ध तयार झालेले जनमत व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा फॅक्टरचा खुबीने वापर करून केलेल्या मतविभाजनाने इम्तियाज जलील यांचा विजयाचा मार्ग प्रशस्त केला, हे खरेच.  

प्रत्येकाने जमेल तसा प्रचार केला

श्रमिक, कामगार वसाहतींमधून इम्तियाज जलील यांना मतदान करण्यात आले. त्यापूर्वी आर्थिक मदतही करण्यात आली. प्रत्यक्ष उमेदवार किंवा कुणी नेता वसाहतीत येण्याची वाट कुणीच पाहिली नाही. प्रत्येकाने जमेल तसा प्रचार केला. विशेषत: घराघरांतून, नातेवाईकांना भेटून आपला उमेदवार व त्याची निशाणी आवर्जून सांगण्यात येत होती. आंबेडकरी अनुयायी व मुस्लिम वसाहतींमधून मतदानाच्या दिवशी प्रचंड उत्साह होता. या दोन्ही समाजांनी भरभरून व उत्स्फूर्त मतदान केले. त्यांच्या वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीने निसटता विजय इम्तियाज जलील यांना नोंदविता आला. 

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019