शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पुंडलिकनगर परिसरात आधी सुविधांसाठी संघर्ष, आता असुरक्षित वातावरण

By विकास राऊत | Updated: February 1, 2024 19:29 IST

नागरिक आंदोलनाच्या तयारीत : पुंडलिकनगर परिसरात गुन्हेगारीचा आलेख चढता

छत्रपती संभाजीनगर : १९९० च्या दशकात उदयास आलेली पुंडलिकनगर या वसाहत व परिसराला सुमारे दीड ते दोन दशक नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागला. वसाहतीच्या स्थापनेला रक्तरंजित इतिहास आहे. संघर्षाचा लढा संपून काही काळ लोटत नाही तोवरच आता या परिसरात वाढत्या गुन्हेगारी आणि नशेखोरांमुळे असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे.

वाटमारी, महिलांची छेड काढणे, टवाळखोरांचे टोळके मोकळ्या जागेत बसणे, गल्लीच्या तोंडावरील पान टपऱ्यांवर रहिवाशांसोबत वाद घालणे. किरकोळ वादातून हत्याराने हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. शून्य पोलिसिंगमुळे हा सगळा प्रकार फोफावत असून बाहेरच्या परिसरातून येणाऱ्या टवाळखोरांमुळे परिसर असुरक्षित झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या मालमत्ता विक्रीस काढल्या आहेत. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, कंपनी कामगारांसह हातावर पोट असणाऱ्यांचा हा परिसर आहे. परिसरात पुंडलिकनगरसह न्यू हनुमाननगर, न्यायनगर, हुसेन कॉलनी, गजाननगनर, मातोश्रीनगर, भारतनगर, अलंकार हाउसिंग सोसायटी आदी वसाहती आहेत. गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर मार्गे जयभवानीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मद्य विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत.

नागरी आंदोलन उभारणारपोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहे. हनुमान चौक परिसरात रिक्षा स्टॅण्ड, पाण्याच्या टाकीखाली मद्यपान खुलेआम केले जाते. महिलांना बाहेर फिरणे अवघड झाले आहे. नागरी आंदोलन उभारण्याविना पर्याय नाही.-अशोक दामले, भाजप पदाधिकारी

असुरक्षिततेची भावनापोलिसांची गस्त वाढणे गरजेचे आहे. नशेखाेरांवर कारवाई करणे गरजेचे आहे. सगळ्या पुंडलिकनगर परिसरात बाहेरच्या वसाहतींमधून येणाऱ्यांमुळे वातावरण असुरक्षित होत आहे. परिणामी गुन्हेगारीचा आलेख वाढला असून महिलांसह नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.-मीना गायके, माजी नगरसेविका

पोलिसांचा वचक नाहीबटन, अवैध दारू, गांजाची विक्री वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी तलवार घेऊन बाहेरच्या वसाहतीतून टवाळखोर आले होते. किरकोळ वादातून हल्ला, खून करण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नशेमध्ये हाणामारी होत आहे. पोलिसांचा वचक नसल्यामुळे हे प्रकार होत आहेत.-दिग्विजय शेरखाने, माजी नगरसेवक

स्त्यावर  फिरणे अवघडव्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. अनधिकृत रिक्षा स्टॅण्डची संख्या वाढली आहे. हनुमान चौकासह पूर्ण रस्त्यावर सामान्यांना फिरणे अवघड झाले आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.-बापू कवळे, ठाकरे गट पदाधिकारी

गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेपुंडलिकनगर रोडवर स्पीड ब्रेकर्स टाकण्याच्या मागणीकडेदेखील दुर्लक्ष केले जात आहे. तसेच, रात्री उशिरापर्यंत पोलिसांची गस्त वाढली पाहिजे. अलीकडच्या काळात पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.- सोनू अहिले, युवा सेना पदाधिकारी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका