शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची माघार! अंतर्गत तणावानंतर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास सहमती; गहलोत-लालू भेटीने जुळले समीकरण
2
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
3
केवळ ₹२७ लाखांना पडेल ₹५० लाखांचं घर; Home Loan घेताना फक्त ही छोटी ट्रिक वापरा आणि जादू पाहा
4
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
5
IND vs AUS : फक्त मैदान बदलले! टॉसवेळी टीम इंडियाच्या बाबतीत पुन्हा तेच घडलं
6
भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..
7
आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
8
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
9
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
10
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
11
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
13
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
14
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
15
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
16
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
17
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
18
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
19
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
20
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'

पहिली नोकरी आणि थेट खात्यात १५ हजार जमा, तेही पगाराव्यतिरिक्त; जाणून घ्या योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 14:55 IST

इएलआय योजनेत देशातील साडेतीन कोटी तरुणांना रोजगाराची संधी

छत्रपती संभाजीनगर : पहिली नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकार वर्षभरात दोन हप्त्यात थेट १५ हजार रुपये जमा करणार आहे. तेही पगाराव्यतिरिक्त, हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. होय! हे सत्य आहे. देशात नवीन रोजगार निर्माण होऊन बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि सामाजिक सुरक्षा वाढविण्याकरिता ‘केंद्रीय एम्लॉयमेंट लिंक्ड इन्सेटिव्ह (इएलआय) ही नवीन योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे. याअंतर्गत देशात सुमारे साडेतीन कोटी युवकांना नवीन रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

कोण पात्र आणि कसा मिळणार लाभ?- ही योजना फक्त पहिली नोकरी करणाऱ्यांसाठीच आहे, जे इपीएफओअंतर्गत प्रथमच नोंदणी करत आहेत.- ६ महिने नोकरी केल्यावर पहिला हप्ता- १२ महिने पूर्ण झाल्यावर दुसरा हप्ता- यासाठी ‘वित्तीय साक्षरता कार्यक्रम’ पूर्ण करणे आवश्यक आहे.- ही रक्कम ठराविक काळासाठी ठेव म्हणून जमा राहील आणि नंतर काढता येईल, जेणेकरून बचतीची सवय लागेल.

कंपन्यांनाही प्रोत्साहन, पण अटींसह!- इएलआय योजनेचा दुसरा भाग कंपन्यांना उद्देशून आहे. - ४९ किंवा त्यापेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपन्यांनी कमीत कमी २ नवीन कामगार भरती केल्यास त्यांनाही लाभ मिळेल.- ५० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांनी कमीत कमी ५ नवीन नियुक्ती केल्यास लाभ.

पगाराच्या आधारावर कंपन्यांना मिळणारा लाभः- यात पहिल्यांदा काम करणाऱ्या प्रतिकर्मचाऱ्याचा पगार १० हजार रुपयांपर्यंत असेल, तर कंपनीला प्रतिमहिना १ हजार रुपये लाभ, १० हजार ते २० हजार रुपयांपर्यंत पगार असेल, तर २ हजार रुपये व २० हजार ते १ लाखापर्यंत पगार असेल तर ३ हजार रुपये लाभ कंपनीला होणार आहे.- ही रक्कम कंपन्यांच्या पॅन लिंक बँक खात्यात जमा होणार आहे.- लाभ मिळण्यासाठी कामगारांनी सलग ६ महिने कामावर असणे बंधनकारक आहे.

योजना कधीपासून लागू?- दि. १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ या कालावधीत जे रोजगार निर्माण होतील, त्यांनाच ही योजना लागू असेल.- फक्त इपीएफओमध्ये नोंद असलेल्या कर्मचाऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे.- सर्व क्षेत्रांसाठी ही योजना २ वर्षे, तर उत्पादन क्षेत्रासाठी ४ वर्षांपर्यंत लागू राहील.

नवीन रोजगार निर्मिती व उत्पादनक्षमता वाढेलएक सर्वेक्षण सांगते की, नवीन भरतीतील ४५ टक्के कर्मचाऱ्यांचे रोजगार ६ महिन्यांच्या आत संपतात. यामुळे स्थिर नोकरी आणि सामाजिक सुरक्षा देणे, हाच केंद्र सरकारचा उद्देश आहे. इएलआयअंतर्गत कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांपूर्वी कामावरून कमी करता येणार नाही.

इएलआय योजना तरुणांसाठी आशेचा किरण आहे. या योजनेमुळे तरुणांना केवळ आर्थिक आधार नाही तर बचतीचीही सवय लागेल. कंपन्यांना भरतीस प्रोत्साहन मिळून उत्पादनक्षमता वाढेल.- रवी यादव, विभागीय भविष्यनिधी आयुक्त

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरbusinessव्यवसाय