शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कचऱ्यात ‘अग्नि’परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:59 IST

कचराकोंडीला १०७ दिवस झाले तरी महापालिकेने कोणत्याच ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी महापालिकेचीही इच्छा नाही. मागील तीन महिन्यांपासून महापालिकाच कचºयाला ठिकठिकाणी ‘आग’ लावत होती.

ठळक मुद्देऔरंगाबाद महापालिका : पावसाला सुरुवात झाल्याने साथरोग पसरण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचराकोंडीला १०७ दिवस झाले तरी महापालिकेने कोणत्याच ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी महापालिकेचीही इच्छा नाही. मागील तीन महिन्यांपासून महापालिकाच कचºयाला ठिकठिकाणी ‘आग’ लावत होती. शहरात कचराच दिसू नये म्हणून ही नामी शक्कल लढविण्यात आली होती. मागील एक महिन्यापासून ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. शनिवारी सायंकाळी अचानक वादळी वाºयासह पावसाला सुरुवात झाली. आता महापालिकेला कचरा प्रश्नात ‘अग्नि’परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.१६ फेबु्रवारी ते आजपर्यंत उन्हाळा होता. महापालिकेने किमान ८० टक्के कचºयाला आग लावण्याचे काम केले. सकाळी आणि रात्री मनपाचे कर्मचारीच कचºयाला आग लावत होते. जुना मोंढा येथे तर कचºयामुळे एक दुकानही जळून खाक झाले होते.सीसीटीव्ही फुटेजमधील पुराव्यांवरून मनपाची चोरी चव्हाट्यावर आली. या घटनेतूनही महापालिकेने बोध घेतला नाही. उलट महापालिकेच्या विविध इमारती, चौकाचौकांतील कचºयाच्या ढिगाºयांना आग लावण्याचे काम सुरूच होते. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. औरंगपुरा, जुनाबाजार, सिटीचौक, मसाप, पैठणगेट, क्रांतीचौक, रोशनगेट आदी अनेक वसाहतींमध्ये कचºयाचे डोंगर साचले आहेत. पावसामुळे कचरा पूर्णपणे ओला झाला आहे. महापालिकेला आता कचºयाला अजिबात आग लावता येणार नाही. आग लावली तरी कचरा अजिबात जळणार नाही, निव्वळ धूर होईल. घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार कचरा जाळता येत नाही. याच नियमांचे उल्लंघन मागील तीन महिन्यांपासून मनपाकडून करण्यात येत होते.प्रक्रिया करणेही अशक्यप्रायसिडको-हडकोसह शहरातील विविध वॉर्डांमध्ये ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यात येत आहे. आता पावसाळ्यात ही प्रक्रिया करणेही अवघड आहे.मनपाने ५ कोटी रुपये खर्च करून ठिकठिकाणी कंपोस्ट पीट तयार केले आहेत. या पीटचा वापर पावसाळ्यात अजिबात होणार नाही. एका पीटमध्ये २१ दिवस ओला कचरा साठवून त्यावर प्रक्रिया करावी लागते.अनेक आजार पसरणारज्याठिकाणी कचरा साचला आहे, तेथे पावसामुळे अनेक जीवजंतू जन्माला येतील. यातून साथरोग पसरण्याची दाट शक्यता आहे. कचºयात मेलेले उंदीर असल्यास त्याच्या पिसवांपासून सुरत शहरात यापूर्वी प्लेग पसरला होता. कचरा साठवून ठेवणे एवढे सोपे नाही, हे मनपाला माहीत असूनही नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नRainपाऊस