शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

कचऱ्यात ‘अग्नि’परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:59 IST

कचराकोंडीला १०७ दिवस झाले तरी महापालिकेने कोणत्याच ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी महापालिकेचीही इच्छा नाही. मागील तीन महिन्यांपासून महापालिकाच कचºयाला ठिकठिकाणी ‘आग’ लावत होती.

ठळक मुद्देऔरंगाबाद महापालिका : पावसाला सुरुवात झाल्याने साथरोग पसरण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचराकोंडीला १०७ दिवस झाले तरी महापालिकेने कोणत्याच ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी महापालिकेचीही इच्छा नाही. मागील तीन महिन्यांपासून महापालिकाच कचºयाला ठिकठिकाणी ‘आग’ लावत होती. शहरात कचराच दिसू नये म्हणून ही नामी शक्कल लढविण्यात आली होती. मागील एक महिन्यापासून ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. शनिवारी सायंकाळी अचानक वादळी वाºयासह पावसाला सुरुवात झाली. आता महापालिकेला कचरा प्रश्नात ‘अग्नि’परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.१६ फेबु्रवारी ते आजपर्यंत उन्हाळा होता. महापालिकेने किमान ८० टक्के कचºयाला आग लावण्याचे काम केले. सकाळी आणि रात्री मनपाचे कर्मचारीच कचºयाला आग लावत होते. जुना मोंढा येथे तर कचºयामुळे एक दुकानही जळून खाक झाले होते.सीसीटीव्ही फुटेजमधील पुराव्यांवरून मनपाची चोरी चव्हाट्यावर आली. या घटनेतूनही महापालिकेने बोध घेतला नाही. उलट महापालिकेच्या विविध इमारती, चौकाचौकांतील कचºयाच्या ढिगाºयांना आग लावण्याचे काम सुरूच होते. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. औरंगपुरा, जुनाबाजार, सिटीचौक, मसाप, पैठणगेट, क्रांतीचौक, रोशनगेट आदी अनेक वसाहतींमध्ये कचºयाचे डोंगर साचले आहेत. पावसामुळे कचरा पूर्णपणे ओला झाला आहे. महापालिकेला आता कचºयाला अजिबात आग लावता येणार नाही. आग लावली तरी कचरा अजिबात जळणार नाही, निव्वळ धूर होईल. घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार कचरा जाळता येत नाही. याच नियमांचे उल्लंघन मागील तीन महिन्यांपासून मनपाकडून करण्यात येत होते.प्रक्रिया करणेही अशक्यप्रायसिडको-हडकोसह शहरातील विविध वॉर्डांमध्ये ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यात येत आहे. आता पावसाळ्यात ही प्रक्रिया करणेही अवघड आहे.मनपाने ५ कोटी रुपये खर्च करून ठिकठिकाणी कंपोस्ट पीट तयार केले आहेत. या पीटचा वापर पावसाळ्यात अजिबात होणार नाही. एका पीटमध्ये २१ दिवस ओला कचरा साठवून त्यावर प्रक्रिया करावी लागते.अनेक आजार पसरणारज्याठिकाणी कचरा साचला आहे, तेथे पावसामुळे अनेक जीवजंतू जन्माला येतील. यातून साथरोग पसरण्याची दाट शक्यता आहे. कचºयात मेलेले उंदीर असल्यास त्याच्या पिसवांपासून सुरत शहरात यापूर्वी प्लेग पसरला होता. कचरा साठवून ठेवणे एवढे सोपे नाही, हे मनपाला माहीत असूनही नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नRainपाऊस