शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यात ‘अग्नि’परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 23:59 IST

कचराकोंडीला १०७ दिवस झाले तरी महापालिकेने कोणत्याच ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी महापालिकेचीही इच्छा नाही. मागील तीन महिन्यांपासून महापालिकाच कचºयाला ठिकठिकाणी ‘आग’ लावत होती.

ठळक मुद्देऔरंगाबाद महापालिका : पावसाला सुरुवात झाल्याने साथरोग पसरण्याची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचराकोंडीला १०७ दिवस झाले तरी महापालिकेने कोणत्याच ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा अशी महापालिकेचीही इच्छा नाही. मागील तीन महिन्यांपासून महापालिकाच कचºयाला ठिकठिकाणी ‘आग’ लावत होती. शहरात कचराच दिसू नये म्हणून ही नामी शक्कल लढविण्यात आली होती. मागील एक महिन्यापासून ठिकठिकाणी कचºयाचे ढीग साचले आहेत. शनिवारी सायंकाळी अचानक वादळी वाºयासह पावसाला सुरुवात झाली. आता महापालिकेला कचरा प्रश्नात ‘अग्नि’परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.१६ फेबु्रवारी ते आजपर्यंत उन्हाळा होता. महापालिकेने किमान ८० टक्के कचºयाला आग लावण्याचे काम केले. सकाळी आणि रात्री मनपाचे कर्मचारीच कचºयाला आग लावत होते. जुना मोंढा येथे तर कचºयामुळे एक दुकानही जळून खाक झाले होते.सीसीटीव्ही फुटेजमधील पुराव्यांवरून मनपाची चोरी चव्हाट्यावर आली. या घटनेतूनही महापालिकेने बोध घेतला नाही. उलट महापालिकेच्या विविध इमारती, चौकाचौकांतील कचºयाच्या ढिगाºयांना आग लावण्याचे काम सुरूच होते. आता पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. औरंगपुरा, जुनाबाजार, सिटीचौक, मसाप, पैठणगेट, क्रांतीचौक, रोशनगेट आदी अनेक वसाहतींमध्ये कचºयाचे डोंगर साचले आहेत. पावसामुळे कचरा पूर्णपणे ओला झाला आहे. महापालिकेला आता कचºयाला अजिबात आग लावता येणार नाही. आग लावली तरी कचरा अजिबात जळणार नाही, निव्वळ धूर होईल. घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार कचरा जाळता येत नाही. याच नियमांचे उल्लंघन मागील तीन महिन्यांपासून मनपाकडून करण्यात येत होते.प्रक्रिया करणेही अशक्यप्रायसिडको-हडकोसह शहरातील विविध वॉर्डांमध्ये ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यात येत आहे. आता पावसाळ्यात ही प्रक्रिया करणेही अवघड आहे.मनपाने ५ कोटी रुपये खर्च करून ठिकठिकाणी कंपोस्ट पीट तयार केले आहेत. या पीटचा वापर पावसाळ्यात अजिबात होणार नाही. एका पीटमध्ये २१ दिवस ओला कचरा साठवून त्यावर प्रक्रिया करावी लागते.अनेक आजार पसरणारज्याठिकाणी कचरा साचला आहे, तेथे पावसामुळे अनेक जीवजंतू जन्माला येतील. यातून साथरोग पसरण्याची दाट शक्यता आहे. कचºयात मेलेले उंदीर असल्यास त्याच्या पिसवांपासून सुरत शहरात यापूर्वी प्लेग पसरला होता. कचरा साठवून ठेवणे एवढे सोपे नाही, हे मनपाला माहीत असूनही नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नRainपाऊस