शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
2
सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
3
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
4
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
5
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
6
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
7
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
8
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
9
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
10
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
11
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
12
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर
13
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
14
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
15
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
16
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
17
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
18
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
19
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
20
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले

औरंगाबाद मनपाकडे अग्निशमन विभागासाठीचा १ कोटी ७८ लाखाचा निधी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 12:16 IST

औरंगाबाद महापालिकेला २०११ मध्ये १ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी अग्निशमन केंद्र उभारणे, अद्ययावत वाहने खरेदी करण्यासाठी दिला होता. हा निधी आजही पडून आहे. 

ठळक मुद्दे राज्यातील ८ महापालिकांकडे ५४८ कोटी अखर्चित

औरंगाबाद : राज्यातील आठ महापालिकांना अग्निशमन सेवा बळकट करण्यासाठी राज्य शासनाने ७०२ कोटी ९५ लाख रुपये दिले. यातील १५४ कोटी ७१ लाख रुपये खर्च करण्यात आले. ५४८ कोटींचा निधी अखर्चित ठेवल्याची गंभीर बाब भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकांच्या (कॅग) अहवालात नमूद केली आहे. या अहवालाच्या अनुषंगाने नगरविकास विभागाने हा निधी त्वरित वापरण्याचे निर्देश आठ महापालिकांना दिले आहेत. औरंगाबाद महापालिकेला २०११ मध्ये १ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी अग्निशमन केंद्र उभारणे, अद्ययावत वाहने खरेदी करण्यासाठी दिला होता. हा निधी आजही पडून आहे. 

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, या आठ महापालिकांनी निधी खर्च केला नाही. २०१०-१५ या पाच वर्षांमध्ये निधी देण्यात आला होता. आगीचा प्रतिबंध आणि नियंत्रणाबाबतची लेखापरीक्षा कॅगकडून करण्यात आली. ७०२ कोटी ९५ लाख इतकी तरतूद अग्निशमन सेवेसाठी अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यापैकी केवळ १५४ कोटी ७१ लाख खर्च झाल्याचे व ५४८ कोटी २४ लाख इतका निधी अखर्चित असल्याचे लेखापरीक्षणात आढळून आले. 

अग्निसुरक्षा निधी स्थापन न करणे, वार्षिक शुल्क न आकारणे, राज्य शासनाकडून निधी प्राप्त होणाऱ्या योजनेची अंमलबजावणी न करणे, अग्निशमन केंद्राची अपर्याप्त संख्या, अग्निशमन केंद्रे सुसज्ज नसणे, मनुष्यबळाची कमतरता, अग्निसुरक्षा प्रमाणकांचे अनुपालन न करणे, क्षमता बांधणीतील तूट, प्रशिक्षणातील तूट, शारीरिक स्वास्थ्य शिबीर आयोजित करणे, आगीचा तपासणी अहवाल तयार करण्यात कुचराई यासह अन्य मुद्यांवर कॅगने ताशेरे ओढले. 

पाच अग्निशमन केंद्रराज्य शासनाने २०११ मध्ये औरंगाबाद महापालिकेला वाढत्या लोकसंख्येनुसार पाच नवीन अग्निशमन केंद्र उभी करावीत म्हणून १ कोटी ७८ लाख रुपये दिले होते. त्याचप्रमाणे अद्ययावत वाहनही खरेदी करावे, असे शासनाने नमूद केले होते. २०११ मधील दरसूची आणि आजच्या दरसूचीत बराच फरक आहे. या निधीतून दोन अग्निशमन केंद्रही मनपाला बांधणे अशक्य आहे. मागील सात वर्षांपासून महापालिका अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी निव्वळ जागेचा शोध घेत आहे.

महापालिकांना निर्देशआठही महापालिकांना ५४८ कोटी २४ लाख अनुदान त्वरित वापरण्याचे निर्देश दिले. कॅगच्या शिफारशीनुसारही कार्यवाही करण्यात येत आहे.- विवेक कुंभार, अवर सचिव, नगरविकास विभाग

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीfireआगState Governmentराज्य सरकार