शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

वाळूज एमआयडीसीतील वाहनांचे स्पेअर पार्टस् बनविणारी कंपनी आगीत भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 07:55 IST

कंपनीत दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी लागणारे  प्लास्टिक स्पेअर पार्ट्सचे उत्पादन करण्यात येते.

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील ध्रुवतारा बायाटेक प्रा. लि. या कंपनीला बुधवारी (दि.३ ) पहाटे ३ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. कंपनीची संपूर्ण तीन मजली इमारत आगीच्या घेऱ्यात येऊन जवळपास ५ कोटींचे नुकसान झाले आहे. आगीत तयार स्पेअर पार्टस व रॉ-मटेरियल्स जवळून भस्मसात झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून  नाईटशिफ्टमधील सर्व २५ कामगार सुरक्षित आहेत.चार

अशोक बलभीम थोरात (रा. श्रेयनगर, औरंगाबाद) यांच्या दर्शन ग्रुपची वाळूज एमआयडीसीतील (प्लॉट क्रमांक डब्ल्यु ९७) येथे ध्रुवतारा बायोटेक प्रा. लि. या नावाची कंपनी आहे. या कंपनीत दुचाकी व तीनचाकी वाहनासाठी लागणारे विविध प्रकारच्या प्लॉस्टिक साहित्याचे उत्पादन करुन नामांकित कंपन्याला पुरविण्यात येते. बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास या कंपनीत अचानक आग लागली. नाईटशिफ्टमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी वाळूज अग्नीशमन व एमआयडीसी वाळूज पोलिसांना माहिती देऊन आग विझविण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र कंपनीतील प्लॉस्टिकचे तयार पार्टस व रॉ-मटेरियलने यांनी लागलीच पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. कंपनीतून उठणारे धुराचे लोळ व आगीच्या ज्वालामुळे लगतच्या कंपनीतील कामगार, उद्योजक यांनीही घटनास्थळ गाठून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. प्रथमदर्शनी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज कंपनी मालक अशोक थोरात यांनी वर्तविला आहे. आगीमुळे जवळपास ५ कोटी रुपयांची हानी झाल्याचे उद्योजक थोरात यांनी सांगितले.

बंबाच्या सहाय्याने ५ तासानंतर आगीवर नियंत्रणसुरवातीला गरवारे कंपनीच्या अग्नीशमन विभागाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आग आोटक्यात येत नसल्याने यानंतर वाळूज, बजाज व मनपा अग्नीशमन दलाने एकत्रित प्रयत्न सुरु केले. यासोबतच आग विझविण्यासाठी जवळपास ३० खाजगी टँकर सुद्धा कमी आले. सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास आग विझविण्यात अग्नीशमन दलाला यश आले.

कामगारांना अश्रू अनावर नाईटशिफ्टमध्ये २५ कामगार कंपनीत कामासाठी आले होते. आग लागल्यानंतर कामगारांनी आग विझविण्यास मदत केली. मात्र, आगीने रौद्ररुप धारण केल्यानंतर ते वेळीच बाहेर पडले. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, डोळ्यादेखत कंपनी जळत आहे आणि आपण हतबल आहोत या भावनेने कामगारांना अश्रू अनावर झाले होते.

टॅग्स :fireआगAurangabadऔरंगाबादWaluj MIDCवाळूज एमआयडीसी