शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडी धरणातून बेकायदा पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 19:33 IST

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देजलसंपदा विभागाच्या पाणी परवाण्याविना पाणी उपसा

पैठण : पाणी परवाना नसताना जायकवाडी धरणातून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या  १६ शेतकऱ्यावर  पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जायकवाडीचे सहाय्यक अभियंता बुध्दभूषण दाभाडे यांनी आज पैठण पोलीस ठाण्यात या बाबत फिर्याद दिली आहे.या बाबत दाखल याचिकेत न्यायालयाने जायकवाडी प्रशासनास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

आज जायकवाडीचे सहाय्यक अभियंता बुध्दभुषण सुखदेव दाभाडे यांनी पैठण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, दि ५ फेब्रुवारी रोजी जायकवाडी, पोलीस व महावितरणच्या संयुक्त पथकातील रोहीत तायडे सहाय्यक अभियंता महावितरण , एस टी घुसर मोजणीदार जायकवाडी जलफुगवटा शाखा,  अभिजीत कुलकर्णी व राजू तुसांबड कालवा निरिक्षक, आय डी भागवत वरिष्ठ तंत्रज्ञ महावितरण, पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिंदे व गणेश कुलट यांनी जायकवाडी धरणाच्या उजवा कालव्याच्या मुखाशी केलेल्या कारवाईत अनधिकृतपणे जलसंपदा विभागाच्या पाणी परवाण्याविना पाणी उपसा सुरू असल्याचे दिसून आले.

हा पाणी उपसा  नामदेव किसण रायकर रा महंमदपुर. बाळु भगवान गिरजे रा . घारी. जितेंद्र नामदेव पाबळे रा . महमदपुर.  हरिभाऊ अनंतराव चेवुलवार रा . महंमदपुर. गोपाळ प्रभाकर काळे रा सोनवाडी ( खु ).  वैजनाथ एकनाथ काळे रा सोनवाडी ( खु ). अनिल रावसाहेब खेडकर रा महंमदपुर. सुनिल रावसाहेब खेडकर रा महमदपुर हे आठ शेतकरी करत होते; तर अज्ञात आठ शेतकऱ्यांचे नावे समजू न शकल्याने त्यांच्या विद्युत पंपाचे स्टार्टर जप्त करण्यात आले आहे.अनधिकृतपणे जायकवाडी धरणातून पाणी उपसा करणाऱ्या सोळा शेतकऱ्यावर   कलम  430 भादवी सह कलम 92 , ( ज ) महाराष्ट्र पाटबंधारे अधीनियम 1976 प्रमाणे  कारवाई करावी  असे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून  पैठण पोलीस ठाण्यात  १६ शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शेतकऱ्यांवरील गुन्हे रद्द कराविद्युत पंपाद्वारे पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने आज शेतकऱ्यात मोठा रोष निर्माण झाला. पाणी परवाना संपलेल्या शेतकऱ्यांना जायकवाडी प्रशासनाने दंड आकारून परत पाणी परवाना द्यावा. शेतकरी पाणी चोरून विकत नाही शेतीलाच वापरतात याचे भान जायकवाडी प्रशासनाने ठेवावे. गुन्हा दाखल करण्यापेक्षा शेतकऱ्यांना पाणीपरवाना देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यावर दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यात यावे यासाठी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांची आपण भेट घेणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र काळे यांनी सांगितले.- रविंद्र काळे, प्रदेश सरचिटणीस कॉंग्रेस

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस