शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ब्रम्हगव्हाण योजनेतील ५४ कोटींची निविदा रद्द; मंत्र्यांच्या नातेवाईकासाठी केलेली उठाठेव भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:42 IST

राजकीय दबाव वापरून सर्व काही सुरळीत होईल, या ईर्षेपोटी आठ महिन्यांपासून या योजनेचे काम बंद ठेवले.

ठळक मुद्देआता सर्व प्रक्रिया होणार नव्याने आठ महिने टाईमपास का केला

- विकास राऊत

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन या महत्त्वाकांक्षी योजनेच्या टप्पा क्रमांक - २मध्ये हेराफेरी करून अनेक धुरिणांची ‘महत्त्वाकांक्षा’ फळाला येण्याची चिन्हे निर्माण होत असतानाच शासन नियुक्त चौकशी समितीने सगळ्यांच्या खाबुगिरीवर पाणी फेरले. जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या नातेवाईकांसाठी केलेली ही उठाठेव सगळ्यांना भोवली असून, योजनेचे कंत्राट सबलेट करून देण्याऐवजी आता नव्याने निविदा काढाव्या लागणार आहेत. पाच अभियंत्यांच्या चौकशी समितीने याप्रकरणात अहवाल दिला असून, ५४ कोटींची निविदा रद्द करून खाबुगिरी करणाऱ्यांना हाबाडा दिला आहे. आजच्या बाजारभावानुसार १०० कोटींच्या घरात हे काम गेले असते.

पूर्ण योजना १ हजार कोटींच्या घरात गेली असून, त्यातील एक निविदा रद्द करण्यात आली आहे. राजकीय दबाव वापरून सर्व काही सुरळीत होईल, या ईर्षेपोटी आठ महिन्यांपासून या योजनेचे काम बंद ठेवले. त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. ‘लोकमत’ने ऑक्टोबर - नोव्हेंबर २०२० मध्ये याप्रकरणी वृत्तमालिका प्रकाशित करून जलसंपदा विभागाचे लक्ष वेधले होते. सन २०१०मध्ये योजनेच्या टप्पा क्रमांक २ चे काम रेंगाळत ठेवल्याप्रकरणी अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीला लावण्यात आलेला सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा दंड माफ करण्याच्या हालचाली गेल्यावर्षी सुरू होत्या. जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या नातेवाईकासाठी ही उठाठेव करण्यात आली. योजनेचे कंत्राट नातेवाईकाला सबलेट करून घेण्यात आले आहे. त्या मोबदल्यात दंड माफ करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. शासनाचा दंड न भरताच ऑगस्ट महिन्यात अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनी, रवीकिरण कन्स्ट्रक्शनकडे असलेले योजनेचे काम स्वप्नील गोरे यांच्या साहस इंजिनिअर्स अ‍ॅण्ड कॉन्ट्रक्टर्स प्रा. लि.कडे सबलेट केले.

सन २०१०मध्ये अंबडरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीला योजनेचे काम ५५ कोटींत देण्यात आले होते. २० टक्के जादा दराने हे काम देण्यात आले होते. वाढीव किमतीनुसार सध्या हे काम ११० कोटींच्या आसपास गेले. यातील १८ कोटी रुपयांची रक्कम अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीला अदा करण्यात आली आहे. २०११ साली रवीकिरण कन्स्ट्रक्शनला ३० टक्के रकमेत हे कंत्राट सबलेट करण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये याच योजनेतील काम साहस इंजिनिअर्स या कंपनीला (शिवसेना मंत्र्यांच्या नातेवाईकांची कंपनी) २९ टक्के रकमेत सबलेट केले. ही सगळी प्रक्रिया होत असताना २०१७ सालापासून योजनेचे काम ठप्प पडल्यामुळे दररोज २५ हजार रुपयांचा दंड अंबरवाडीकर कन्स्ट्रक्शनला लावण्यात आला होता. तो दंडदेखील वसूल करण्याचे चौकशी समितीने सुचविले आहे.

जबाबदार कंत्राटदाराकडून दंड वसूल कराया योजनेचे मूळ कंत्राट रद्द करण्यासाठी स्थानिक पातळीवर राजकीय, बिगर राजकीय संघटनांकडून मोठ्या प्रमाणात मागण्या आणि तक्रारी झाल्या. त्यानुसार लघु पाटबंधारे क्रमांक १च्या तत्कालीन अभियंत्यांनीदेखील शहानिशा करून चौकशी अहवाल तयार केला. त्यानंतर पुन्हा पाच अभियंत्यांची एक चौकशी समिती नेमली होती. त्या समितीने ५४ कोटींची निविदा रद्द करण्याचा निष्कर्ष काढला. तसेच कामास विलंब केल्यामुळे संबंधित जबाबदार कंत्राटदारांकडून दंड वसूल करण्याचेही सुचविले आहे. याप्रकरणी मुख्य अभियंता अशोक आव्हाड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनीदेखील याप्रकरणात अद्याप काही माहिती नसल्याचे सांगितले.

आठ महिने टाईमपास का केलानिधी असताना आठ महिन्यांपासून योजनेचे काम बंद आहे. आठ महिन्यांचा मोठा काळ हातून गेला. याला जबाबदार कोण, याचे उत्तर देण्यास कुणीही समोर येत नसून सगळे हात वर करीत आहेत. आता या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार आहे. मान्यता मिळण्यास उशीर झाल्यास योजनेचे काम आणखी लांबणीवर जाईल. १० वर्षांपासून शेतकरी या योजनेतून शेतीला पाणी मिळेल, या अपेक्षेवर आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादfundsनिधीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प