शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

अखेर ब्रम्हगव्हाण योजनेतील ५४ कोटींची निविदा रद्द; मंत्र्यांच्या नातेवाईकासाठी केलेली उठाठेव भोवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:42 IST

राजकीय दबाव वापरून सर्व काही सुरळीत होईल, या ईर्षेपोटी आठ महिन्यांपासून या योजनेचे काम बंद ठेवले.

ठळक मुद्देआता सर्व प्रक्रिया होणार नव्याने आठ महिने टाईमपास का केला

- विकास राऊत

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन या महत्त्वाकांक्षी योजनेच्या टप्पा क्रमांक - २मध्ये हेराफेरी करून अनेक धुरिणांची ‘महत्त्वाकांक्षा’ फळाला येण्याची चिन्हे निर्माण होत असतानाच शासन नियुक्त चौकशी समितीने सगळ्यांच्या खाबुगिरीवर पाणी फेरले. जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या नातेवाईकांसाठी केलेली ही उठाठेव सगळ्यांना भोवली असून, योजनेचे कंत्राट सबलेट करून देण्याऐवजी आता नव्याने निविदा काढाव्या लागणार आहेत. पाच अभियंत्यांच्या चौकशी समितीने याप्रकरणात अहवाल दिला असून, ५४ कोटींची निविदा रद्द करून खाबुगिरी करणाऱ्यांना हाबाडा दिला आहे. आजच्या बाजारभावानुसार १०० कोटींच्या घरात हे काम गेले असते.

पूर्ण योजना १ हजार कोटींच्या घरात गेली असून, त्यातील एक निविदा रद्द करण्यात आली आहे. राजकीय दबाव वापरून सर्व काही सुरळीत होईल, या ईर्षेपोटी आठ महिन्यांपासून या योजनेचे काम बंद ठेवले. त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. ‘लोकमत’ने ऑक्टोबर - नोव्हेंबर २०२० मध्ये याप्रकरणी वृत्तमालिका प्रकाशित करून जलसंपदा विभागाचे लक्ष वेधले होते. सन २०१०मध्ये योजनेच्या टप्पा क्रमांक २ चे काम रेंगाळत ठेवल्याप्रकरणी अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीला लावण्यात आलेला सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा दंड माफ करण्याच्या हालचाली गेल्यावर्षी सुरू होत्या. जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका मंत्र्याच्या नातेवाईकासाठी ही उठाठेव करण्यात आली. योजनेचे कंत्राट नातेवाईकाला सबलेट करून घेण्यात आले आहे. त्या मोबदल्यात दंड माफ करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. शासनाचा दंड न भरताच ऑगस्ट महिन्यात अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनी, रवीकिरण कन्स्ट्रक्शनकडे असलेले योजनेचे काम स्वप्नील गोरे यांच्या साहस इंजिनिअर्स अ‍ॅण्ड कॉन्ट्रक्टर्स प्रा. लि.कडे सबलेट केले.

सन २०१०मध्ये अंबडरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीला योजनेचे काम ५५ कोटींत देण्यात आले होते. २० टक्के जादा दराने हे काम देण्यात आले होते. वाढीव किमतीनुसार सध्या हे काम ११० कोटींच्या आसपास गेले. यातील १८ कोटी रुपयांची रक्कम अंबरवाडीकर अ‍ॅण्ड कंपनीला अदा करण्यात आली आहे. २०११ साली रवीकिरण कन्स्ट्रक्शनला ३० टक्के रकमेत हे कंत्राट सबलेट करण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये याच योजनेतील काम साहस इंजिनिअर्स या कंपनीला (शिवसेना मंत्र्यांच्या नातेवाईकांची कंपनी) २९ टक्के रकमेत सबलेट केले. ही सगळी प्रक्रिया होत असताना २०१७ सालापासून योजनेचे काम ठप्प पडल्यामुळे दररोज २५ हजार रुपयांचा दंड अंबरवाडीकर कन्स्ट्रक्शनला लावण्यात आला होता. तो दंडदेखील वसूल करण्याचे चौकशी समितीने सुचविले आहे.

जबाबदार कंत्राटदाराकडून दंड वसूल कराया योजनेचे मूळ कंत्राट रद्द करण्यासाठी स्थानिक पातळीवर राजकीय, बिगर राजकीय संघटनांकडून मोठ्या प्रमाणात मागण्या आणि तक्रारी झाल्या. त्यानुसार लघु पाटबंधारे क्रमांक १च्या तत्कालीन अभियंत्यांनीदेखील शहानिशा करून चौकशी अहवाल तयार केला. त्यानंतर पुन्हा पाच अभियंत्यांची एक चौकशी समिती नेमली होती. त्या समितीने ५४ कोटींची निविदा रद्द करण्याचा निष्कर्ष काढला. तसेच कामास विलंब केल्यामुळे संबंधित जबाबदार कंत्राटदारांकडून दंड वसूल करण्याचेही सुचविले आहे. याप्रकरणी मुख्य अभियंता अशोक आव्हाड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे यांनीदेखील याप्रकरणात अद्याप काही माहिती नसल्याचे सांगितले.

आठ महिने टाईमपास का केलानिधी असताना आठ महिन्यांपासून योजनेचे काम बंद आहे. आठ महिन्यांचा मोठा काळ हातून गेला. याला जबाबदार कोण, याचे उत्तर देण्यास कुणीही समोर येत नसून सगळे हात वर करीत आहेत. आता या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार आहे. मान्यता मिळण्यास उशीर झाल्यास योजनेचे काम आणखी लांबणीवर जाईल. १० वर्षांपासून शेतकरी या योजनेतून शेतीला पाणी मिळेल, या अपेक्षेवर आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादfundsनिधीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प