शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

अखेर महापालिकेची अतिक्रमणे, हातगाड्यांवर कारवाई सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 17:26 IST

पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा, शाहगंजमध्ये ३५ पेक्षा अधिक लहान-मोठी अतिक्रमणे हटविली

ठळक मुद्देरस्त्यावर चालणे सुसह्य करण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची संयुक्त कारवाई 

औरंगाबाद : शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यास मंगळवारी महापालिकेने सुरुवात केली. सकाळी १२ वाजेपासून पैठणगेट येथून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे, हातगाड्या जप्तीचा सपाटाच महापालिकेने लावला. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली. हातगाडीचालक सैरावैरा गल्लीबोळांमध्ये पळत होते. अवघ्या दीड तासात महापालिकेने टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा येथे कारवाई केली. ३५ पेक्षा अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली.

अतिक्रमणांमुळे शहरात वाहनधारकांसह सर्वसामान्यांना पायी ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलीस, महापालिका निव्वळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे छायांकित वृत्त ‘लोकमत’ने १६ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केले. याची दखल घेऊन पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत शनिवारी बैठक घेण्यात आली. बैठकीत अतिक्रमणे  हटविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे आश्वासन मनपातर्फे देण्यात आले होते. नियोजित कार्यक्रमानुसार मंगळवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मोहिमेसाठी वाहतूक पोलीस, पोलीस कर्मचारी असा मोठा बंदोबस्त देण्यात आला होता.

पैठणगेट येथून कारवाईला सुरुवात करताच पुढील हातगाडीचालक, फेरीवाले गायब झाले. रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या काही हातगाड्या मनपा पथकाच्या हाती लागल्या. या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. टिळकपथवरील बहुतांश हातगाडीचालक फरार झाले होते. लोखंडी टपऱ्या, व्यापाऱ्यांनी लावलेले बोर्ड आदी साहित्य जप्त करण्यात आले. गुलमंडी येथील परिसरही चकचकीत करण्यात आला. मात्र, महापौरांच्या आदेशानंतरही या भागातील पार्किंग सुरूच आहे.महापालिका आणि पोलिसांच्या या संयुक्त मोहीमेत पुढे बाराभाई ताजिया ते अंजली चित्रपटगृह या रस्त्यावर कारवाई सुरू करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली छोटी-छोटी अतिक्रमणे काढण्यात आली. महात्मा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत कारवाई सुरू असताना महापालिकेची सर्व वाहने साहित्याने खचाखच भरली. वाहनांमध्ये जप्त केलेले साहित्य ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. नागेश्वरवाडी पुलापर्यंत कशीबशी मोहीम राबविण्यात आली.

सायंकाळी ४.३० नंतर शाहगंज चमन भागात कारवाईला सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या पथकाला पाहून अनेक हातगाडीचालक, फेरीवाले पसार झाले होते. मोजकेच फेरीवाले मनपा पथकाच्या हाती लागले. चमन परिसरातील चारही बाजूचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले. या कारवाईत पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, संजय जक्कल, शिवदास राठोड, इमारत निरीक्षक जे. ई.जाधव, एल.एल.कुलकर्णी, पी.बी. गवळी, मझहर अली, सय्यद जमशीद, आर.एस. राचतवार आदींची उपस्थिती होती.

वाहतूक सुरळीत राहावी हीच प्रामाणिक इच्छाशहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस यंत्रणा १२ महिने प्रयत्नशील असते. दररोज ५०० पेक्षा अधिक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मागील चार महिन्यांमध्ये अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे, फुटपाथवरील अतिक्रमणे काढणे हे महापालिकेचे काम आहे. त्यांना कधीही कोणतीही मदत लागत असल्यास आम्ही तत्पर असतो. मंगळवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामुळे बराच फरक पडेल.- मीना मकवाना, पोलीस उपायुक्त

नियोजित कार्यक्रमानुसारच कारवाई शनिवारी महापालिका आणि पोलीस यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीत अ‍ॅक्शन प्लान तयार करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार महापालिकेने पुढील काही दिवसांसाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. नियोजित कार्यक्रमानुसार पुढेही कारवाई सुरू राहणार आहे. सकाळी कारवाई केल्यावरही सायंकाळी पथकाकडून पुन्हा पाहणी करण्यात येईल. भविष्यात पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, यासाठी मनपा प्रयत्नशील आहे.- रवींद्र निकम, उपायुक्त, मनपा

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमणAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ