शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर महापालिकेची अतिक्रमणे, हातगाड्यांवर कारवाई सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 17:26 IST

पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा, शाहगंजमध्ये ३५ पेक्षा अधिक लहान-मोठी अतिक्रमणे हटविली

ठळक मुद्देरस्त्यावर चालणे सुसह्य करण्यासाठी पोलीस आणि महापालिकेची संयुक्त कारवाई 

औरंगाबाद : शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्यास मंगळवारी महापालिकेने सुरुवात केली. सकाळी १२ वाजेपासून पैठणगेट येथून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे, हातगाड्या जप्तीचा सपाटाच महापालिकेने लावला. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली. हातगाडीचालक सैरावैरा गल्लीबोळांमध्ये पळत होते. अवघ्या दीड तासात महापालिकेने टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा येथे कारवाई केली. ३५ पेक्षा अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली.

अतिक्रमणांमुळे शहरात वाहनधारकांसह सर्वसामान्यांना पायी ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलीस, महापालिका निव्वळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे छायांकित वृत्त ‘लोकमत’ने १६ नोव्हेंबर रोजी प्रकाशित केले. याची दखल घेऊन पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत शनिवारी बैठक घेण्यात आली. बैठकीत अतिक्रमणे  हटविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे आश्वासन मनपातर्फे देण्यात आले होते. नियोजित कार्यक्रमानुसार मंगळवारपासून अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली. मोहिमेसाठी वाहतूक पोलीस, पोलीस कर्मचारी असा मोठा बंदोबस्त देण्यात आला होता.

पैठणगेट येथून कारवाईला सुरुवात करताच पुढील हातगाडीचालक, फेरीवाले गायब झाले. रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या काही हातगाड्या मनपा पथकाच्या हाती लागल्या. या हातगाड्या जप्त करण्यात आल्या. टिळकपथवरील बहुतांश हातगाडीचालक फरार झाले होते. लोखंडी टपऱ्या, व्यापाऱ्यांनी लावलेले बोर्ड आदी साहित्य जप्त करण्यात आले. गुलमंडी येथील परिसरही चकचकीत करण्यात आला. मात्र, महापौरांच्या आदेशानंतरही या भागातील पार्किंग सुरूच आहे.महापालिका आणि पोलिसांच्या या संयुक्त मोहीमेत पुढे बाराभाई ताजिया ते अंजली चित्रपटगृह या रस्त्यावर कारवाई सुरू करण्यात आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली छोटी-छोटी अतिक्रमणे काढण्यात आली. महात्मा फुले यांच्या पुतळ्यापर्यंत कारवाई सुरू असताना महापालिकेची सर्व वाहने साहित्याने खचाखच भरली. वाहनांमध्ये जप्त केलेले साहित्य ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. नागेश्वरवाडी पुलापर्यंत कशीबशी मोहीम राबविण्यात आली.

सायंकाळी ४.३० नंतर शाहगंज चमन भागात कारवाईला सुरुवात करण्यात आली. महापालिकेच्या पथकाला पाहून अनेक हातगाडीचालक, फेरीवाले पसार झाले होते. मोजकेच फेरीवाले मनपा पथकाच्या हाती लागले. चमन परिसरातील चारही बाजूचे रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आले. या कारवाईत पदनिर्देशित अधिकारी वामन कांबळे, संजय जक्कल, शिवदास राठोड, इमारत निरीक्षक जे. ई.जाधव, एल.एल.कुलकर्णी, पी.बी. गवळी, मझहर अली, सय्यद जमशीद, आर.एस. राचतवार आदींची उपस्थिती होती.

वाहतूक सुरळीत राहावी हीच प्रामाणिक इच्छाशहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलीस यंत्रणा १२ महिने प्रयत्नशील असते. दररोज ५०० पेक्षा अधिक वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. मागील चार महिन्यांमध्ये अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणे, फुटपाथवरील अतिक्रमणे काढणे हे महापालिकेचे काम आहे. त्यांना कधीही कोणतीही मदत लागत असल्यास आम्ही तत्पर असतो. मंगळवारपासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामुळे बराच फरक पडेल.- मीना मकवाना, पोलीस उपायुक्त

नियोजित कार्यक्रमानुसारच कारवाई शनिवारी महापालिका आणि पोलीस यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. बैठकीत अ‍ॅक्शन प्लान तयार करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार महापालिकेने पुढील काही दिवसांसाठी कार्यक्रम हाती घेतला आहे. नियोजित कार्यक्रमानुसार पुढेही कारवाई सुरू राहणार आहे. सकाळी कारवाई केल्यावरही सायंकाळी पथकाकडून पुन्हा पाहणी करण्यात येईल. भविष्यात पुन्हा अतिक्रमणे होणार नाहीत, यासाठी मनपा प्रयत्नशील आहे.- रवींद्र निकम, उपायुक्त, मनपा

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमणAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ