शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अखेर मराठवाड्याच्या राजधानीसाठी ५०० कोटींचा विकास निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 18:49 IST

सर्व स्तरातून मागणी झाल्यानंतर शासनाचा निर्णय

औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादला वित्त विभागाने ५०० कोटींचा निधी देण्याची तरतूद केली आहे, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी कळविली आहे.

राजधानीचे ठिकाण म्हणून जिल्ह्याला ५०० कोटींची तरतूद अर्थमंत्र्यांकडे करण्यात आली होती. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादसाठी किमान ५०० कोटींचा निधी मिळावा. यासाठी वित्त व नियोजन विभागाकडे मागणी करणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ३ जानेवारी रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र, त्यांच्या या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २१ जानेवारीच्या नियाेजन विभागाच्या बैठकीत ‘खो’ दिला होता. 

जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेत ३२५ कोटींच्या मर्यादेत पालकमंत्री देसाई यांच्या निर्देशानुसार जिल्हा नियोजन समितीच्या मान्यतेने ५०० कोटी रुपयांच्या १८४ कोटींच्या वाढीव मागणीसह प्रारूप आराखडा सादर केला होता. परंतु कोविड, महसुलात घट इत्यादीमुळे जिल्ह्याला ७० कोटी रुपये अधिक देत ३८५ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास अर्थमंत्र्यांनी मंजुरी दिली होती.

...यासाठी हवा होता वाढीव निधीऔरंगाबाद मराठवाड्याच्या राजधानीचे शहर आहे. या ठिकाणी मराठवाड्यासह लागून असलेल्या इतर विभागांच्या जिल्ह्यांतील रुग्णही घाटीत उपचारासाठी दाखल होतात. कोरोनासारख्या परिस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याशिवाय इतर विकासकामे करणे निधीअभावी शक्य होत नाही. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बंधारे वाहून गेले आहेत. त्यांची दुरुस्ती करणे आहे. तसेच रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. शहरी लोकसंख्या, पर्यटन सुविधा, अत्याधुनिक पोलीस वाहने, शाळा दुरुस्ती इ. बाबींच्या विकासासाठी निधी आवश्यक असल्याने वाढीव १८४ कोटी निधी मंजूर करावा, अशी मागणी अर्थमंत्र्यांकडे केली होती. त्यामुळे निधी वाढवून मिळाल्याचे पालकमंत्री देसाई यांनी कळविले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका