शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अखेर ४० व्या दिवशी बाळाला आईची कूस मिळाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 19:02 IST

समाजसेवा अधीक्षकांनी घडवली माता-पित्याची भेट

ठळक मुद्देघाटीत नवजात शिशू विभागाने केला सांभाळ  अखेर मुलाला आईने स्वीकारले

औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील कामागाराच्या गर्भवती पत्नीला कोरोनाची बाधा झाली. चाळीस दिवसांपूर्वी त्यांची प्रसूती घाटीत करण्यात आली. बाळ कमी वजनाचे असल्याने नवजात शिशू विभागात भरती करून उपचार सुरू झाले. त्या काळात बाळाची विचारपूस होत होती. महिला कोरोनामुक्त होऊन घरी परतल्यावर मात्र विचारपूस करायला पालक येत नव्हते. डॉक्टरांनाही प्रतिसाद देत नव्हते. अखेर बालकल्याण समिती व घाटीच्या समाजसेवा अधीक्षक, डॉक्टरांनी समुपदेशन केल्यावर ४० व्या दिवशी बाळाला आईची कूस मिळवून दिली. आई-वडिलांना मुलाला स्वीकारायला लावले.

घाटीच्या एनआयसीयूमध्ये कोरोनाबाधित महिलेच्या बालकावर उपचार सुरू झाले. उपचारकर्ते डॉ. अतुल लोंढे यांनी पालकांना संपर्क केला. मात्र, पालक येतच नव्हते. बाळाला डोळ्याचे व्यंग असल्याने पालकांकडून टाळाटाळ होत असल्याने वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांनी समाजसेवा अधीक्षक संतोष पवार यांना समन्वयाची जबाबदारी सोपवली. पवार यांनी पालकांना संपर्क केला. वेगवेगळी कारणे सांगून मुलाला नेण्याचे टाळण्यात येत होते. शेवटी बालकल्याण समितीच्या अ‍ॅड. ज्योती पत्की यांना या घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी पुढील हस्तांतरणाच्या नियमांची माहिती देत पालकांचे समुपदेशन केले. 

समाजसेवा अधीक्षक पवार यांनी सातत्याने पाठपुरावा करून बाळाचा स्वीकार करण्याची पालकांची मानसिकता तयार केली. अखेर ४० व्या दिवशी नवजात शिशू विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, उपअधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांच्या मार्गदर्शनात संतोष पवार, बालकल्याण समितीच्या मनीषा खंडागळे यांनी शनिवारी बाळाला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. 

यांनी केला सांभाळनवजात शिशू विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. अतुल लोंढे यांच्या मार्गदर्शनात डॉ. सोनाली, डॉ. शिल्पा, डॉ. अमित पाटील, परिसेविका टेरेसा कोर्टे, स्तवन इंगळे, प्रशांत भोसले, अनुजा लाडकत, सपना जाधव, आरती पठरे, दीपाली मुंडे, मनोरमा जाधव, शील भिवसने, पूजा गिरी आदींनी ४० दिवस बाळाचा सांभाळ केला. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीFamilyपरिवार