शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

एक मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 22:37 IST

पाणी टंचाईचा विचार करून जिल्हा परिषदेच्या शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी शिक्षक समितीने केली

औरंगाबाद : जिल्ह्यातील भिषण दुष्काळाची स्थिती, पाणी टंचाईचा विचार करून जिल्हा परिषदेच्या शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी शिक्षक समितीने केली असून यासंबंधीचे निवेदन समितीच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर व शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांना सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या थंडीच्या दिवसांतच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. दुसरीकडे, अधून- मधून उष्णतेची तीव्रता वाढत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील जि.प. शाळा १ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात. शिक्षणाचा अधिकार या कायद्यानुसार २०० दिवस एवढे शालेय कामकाज अपेक्षित आहे.

दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षात शालेय कामकाज हे २३५ दिवस होत आहे. त्यामुळे १ मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा सुरू करण्यात याव्यात. विद्यार्थ्यांंचा विचार करून याबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा. निवेदनावर शिक्षक समितीचे राज्य सहसचिव नितिन नवले, मराठवाडा सरचिटणीस शाम राजपूत, शालीकराम खिस्ते, गुलाब चव्हाण, विष्णू भंडारे, के.के. जंगले, रऊफ पठाण, लक्ष्मीकांत धाडबळे, मोहम्मद गौस, सतीश कोळी, मंगला मदने, शिला बहादुरे, वनिता घेर, प्रतिभा राणे, औरंगाबाद तालुका उपाध्यक्ष बबन चव्हाण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :Educationशिक्षणAurangabadऔरंगाबाद