शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

राज्यात रक्त संकटाची भीती,‘ब्लड ऑन कॉल’ योजना बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 17:25 IST

या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शासकीय रक्तकेंद्रामध्ये अत्यल्प वेतनावर प्रत्येकी रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली होती.

औरंगाबाद : संपूर्ण राज्यातील शासकीय रक्त केंद्रांमध्ये २०१३ पासून सुरू असलेली रुग्णहिताची ‘ब्लड ऑन कॉल’ (जीवन अमृत सेवा) ही योजना १ एप्रिलपासून बंद केल्यामुळे संपूर्ण राज्यभरातील शासकीय रक्तकेंद्रात रक्ताचे मोठे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याबरोबर राज्यभरातील १०९ कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

शासकीय रक्त केंद्रांचे बळकटीकरण करण्यासाठी व गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, नातेवाईकांना रक्तासाठी धावपळ करण्याची गरज पडू नये, यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील शासकीय रक्तकेंद्रामध्ये ऑक्टोबर २०१३ मध्ये ब्लड ऑन कॉल (जीवन अमृत सेवा) योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शासकीय रक्तकेंद्रामध्ये अत्यल्प वेतनावर प्रत्येकी रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आलेली. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे रक्त संकलनात वाढ होण्यास मदत झाली. तसेच इतरही कामकाजात मोठी मदत मिळालेली होती. परंतु ही योजना ३१ मार्च रोजी कायमस्वरूपी बंद करण्यात आली. त्यामुळे आता या योजनेच्या अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक व तंत्रज्ञ यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठाकर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीमुळे संपूर्ण राज्यातील शासकीय रक्तकेंद्रामध्ये रक्ताचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेक रक्तकेंद्रांत सध्याच दोन ते तीन दिवस पुरेल, एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे, असे सेवासमाप्त कर्मचाऱ्यांनी सांगितले.

शासनाचा निर्णयहा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे योजनेतील कर्मचाऱ्यांची सेवाही संपुष्टात आली आहे. रक्तपेढीत नियमित कर्मचारी कार्यरत असतात.- डॉ. अरुण थोरात, सहसंचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद

२४ तास सेवा दिलीगेल्या ८ वर्षांपासून औरंगाबादेतील विभागीय रक्तपेढीत वैद्यकीय समाजसेवक म्हणून काम केले. २४ तास सेवा दिली, पण आता काढून टाकले. राज्यभरातील १०९ कर्मचाऱ्यांवर अशीच वेळ आली आहे.- हनुमान रुळे

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीAurangabadऔरंगाबाद