शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात रक्त संकटाची भीती,‘ब्लड ऑन कॉल’ योजना बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 17:25 IST

या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शासकीय रक्तकेंद्रामध्ये अत्यल्प वेतनावर प्रत्येकी रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आली होती.

औरंगाबाद : संपूर्ण राज्यातील शासकीय रक्त केंद्रांमध्ये २०१३ पासून सुरू असलेली रुग्णहिताची ‘ब्लड ऑन कॉल’ (जीवन अमृत सेवा) ही योजना १ एप्रिलपासून बंद केल्यामुळे संपूर्ण राज्यभरातील शासकीय रक्तकेंद्रात रक्ताचे मोठे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याबरोबर राज्यभरातील १०९ कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

शासकीय रक्त केंद्रांचे बळकटीकरण करण्यासाठी व गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, नातेवाईकांना रक्तासाठी धावपळ करण्याची गरज पडू नये, यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील शासकीय रक्तकेंद्रामध्ये ऑक्टोबर २०१३ मध्ये ब्लड ऑन कॉल (जीवन अमृत सेवा) योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शासकीय रक्तकेंद्रामध्ये अत्यल्प वेतनावर प्रत्येकी रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, तंत्रज्ञ यांची नियुक्ती करण्यात आलेली. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे रक्त संकलनात वाढ होण्यास मदत झाली. तसेच इतरही कामकाजात मोठी मदत मिळालेली होती. परंतु ही योजना ३१ मार्च रोजी कायमस्वरूपी बंद करण्यात आली. त्यामुळे आता या योजनेच्या अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक व तंत्रज्ञ यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे.

दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठाकर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीमुळे संपूर्ण राज्यातील शासकीय रक्तकेंद्रामध्ये रक्ताचे संकट निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेक रक्तकेंद्रांत सध्याच दोन ते तीन दिवस पुरेल, एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे, असे सेवासमाप्त कर्मचाऱ्यांनी सांगितले.

शासनाचा निर्णयहा शासनाचा निर्णय आहे. त्यामुळे योजनेतील कर्मचाऱ्यांची सेवाही संपुष्टात आली आहे. रक्तपेढीत नियमित कर्मचारी कार्यरत असतात.- डॉ. अरुण थोरात, सहसंचालक, राज्य रक्त संक्रमण परिषद

२४ तास सेवा दिलीगेल्या ८ वर्षांपासून औरंगाबादेतील विभागीय रक्तपेढीत वैद्यकीय समाजसेवक म्हणून काम केले. २४ तास सेवा दिली, पण आता काढून टाकले. राज्यभरातील १०९ कर्मचाऱ्यांवर अशीच वेळ आली आहे.- हनुमान रुळे

टॅग्स :Blood Bankरक्तपेढीAurangabadऔरंगाबाद