शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

निवडणूक प्रचारावर पितृपक्षाची छाया

By admin | Updated: September 11, 2014 01:25 IST

औरंगाबाद : सर्वसाधारणपणे पितृपक्षामध्ये शुभ किंवा नव्या कामाची सुरुवात केली जात नाही, असे आपल्याकडील वातावरण आहे.

औरंगाबाद : सर्वसाधारणपणे पितृपक्षामध्ये शुभ किंवा नव्या कामाची सुरुवात केली जात नाही, असे आपल्याकडील वातावरण आहे. राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टीने पितृ पंधरवडा म्हणजे तर निवांत राहण्याचेच दिवस. असे असले तरी यंदा निवडणूक आयोगाकडून राज्य विधानसभेच्या निवडणुका ह्या पितृपक्षामध्येच घोषित होणार असल्याने पितृपक्षाचे सावट असले तरी ‘इलेक्शन फिवर’ही पाहायला मिळणार आहे.पितृपक्ष पंधरवडा २४ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. पितृपक्षात राजकीय नेतेमंडळी कोणत्याच नव्या गोष्टीला हात घालत नाहीत. काही राज्यांत पितृपक्षाच्या काळात उमेदवारांनी अर्ज भरण्याचे टाळल्याची यापूर्वीची उदाहरणे आहेत. इतकेच काय मंत्रिमंडळ विस्तार, महत्त्वाचे शासकीय निर्णय किंवा राजकीय दौरे हेदेखील या काळात टाळले जातात. अशा वेळी यंदा पितृपक्षातच राज्य विधानसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होणार हे जवळपास निश्चित आहे. निवडणुकांची घोषणा शुक्रवारी (१२ सप्टेंबर) रोजी होईल असे दिसते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची धावपळ आणखी वाढणार आहे. शुक्रवारी तारखा जाहीर झाल्यास आॅक्टोबर महिन्याच्या मध्यास किंवा अखेरीस निवडणूक होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे उमेदवारांची नावे जाहीर होण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर न झाल्याने प्रचाराने अद्याप वेग घेतलेला नाही. मात्र, प्रचारासाठी मिळणारा कालावधी लक्षात घेता प्रत्येक इच्छुक किंवा नाव घोषित झालेला उमेदवार पितृपक्ष असला तरी दिवस वाया घालवणार नाही. यामुळे वैयक्तिक भेटीगाठी किंवा सभा- संमेलने या माध्यमातून प्रचार चालूच राहणार आहे. पितृपक्षाशी संबंध न येणाऱ्या समाजघटकातील उमेदवारांचाही संपर्क आणि प्रचार चालू राहणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २६ आॅगस्टदरम्यान लागू होणार असल्याची चर्चा होती. त्यावेळी काही पक्षांनी उमेदवारांची किमान पहिली यादी पितृपक्ष सुरू होण्याच्या आधी जाहीर करण्याची तयारी चालविली होती. मात्र, राज्यात युती आणि आघाडीच्या घोळामध्ये जागा वाटपाचाच तिढा न सुटल्याने अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरी पितृपक्ष संपल्यानंतरच विविध पक्षांचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतील असे चित्र आहे.