शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक प्रचारावर पितृपक्षाची छाया

By admin | Updated: September 11, 2014 01:25 IST

औरंगाबाद : सर्वसाधारणपणे पितृपक्षामध्ये शुभ किंवा नव्या कामाची सुरुवात केली जात नाही, असे आपल्याकडील वातावरण आहे.

औरंगाबाद : सर्वसाधारणपणे पितृपक्षामध्ये शुभ किंवा नव्या कामाची सुरुवात केली जात नाही, असे आपल्याकडील वातावरण आहे. राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांच्या दृष्टीने पितृ पंधरवडा म्हणजे तर निवांत राहण्याचेच दिवस. असे असले तरी यंदा निवडणूक आयोगाकडून राज्य विधानसभेच्या निवडणुका ह्या पितृपक्षामध्येच घोषित होणार असल्याने पितृपक्षाचे सावट असले तरी ‘इलेक्शन फिवर’ही पाहायला मिळणार आहे.पितृपक्ष पंधरवडा २४ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. पितृपक्षात राजकीय नेतेमंडळी कोणत्याच नव्या गोष्टीला हात घालत नाहीत. काही राज्यांत पितृपक्षाच्या काळात उमेदवारांनी अर्ज भरण्याचे टाळल्याची यापूर्वीची उदाहरणे आहेत. इतकेच काय मंत्रिमंडळ विस्तार, महत्त्वाचे शासकीय निर्णय किंवा राजकीय दौरे हेदेखील या काळात टाळले जातात. अशा वेळी यंदा पितृपक्षातच राज्य विधानसभेच्या निवडणुकांची तारीख जाहीर होणार हे जवळपास निश्चित आहे. निवडणुकांची घोषणा शुक्रवारी (१२ सप्टेंबर) रोजी होईल असे दिसते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची धावपळ आणखी वाढणार आहे. शुक्रवारी तारखा जाहीर झाल्यास आॅक्टोबर महिन्याच्या मध्यास किंवा अखेरीस निवडणूक होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे उमेदवारांची नावे जाहीर होण्याच्या प्रक्रियेला गती मिळेल. विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर न झाल्याने प्रचाराने अद्याप वेग घेतलेला नाही. मात्र, प्रचारासाठी मिळणारा कालावधी लक्षात घेता प्रत्येक इच्छुक किंवा नाव घोषित झालेला उमेदवार पितृपक्ष असला तरी दिवस वाया घालवणार नाही. यामुळे वैयक्तिक भेटीगाठी किंवा सभा- संमेलने या माध्यमातून प्रचार चालूच राहणार आहे. पितृपक्षाशी संबंध न येणाऱ्या समाजघटकातील उमेदवारांचाही संपर्क आणि प्रचार चालू राहणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २६ आॅगस्टदरम्यान लागू होणार असल्याची चर्चा होती. त्यावेळी काही पक्षांनी उमेदवारांची किमान पहिली यादी पितृपक्ष सुरू होण्याच्या आधी जाहीर करण्याची तयारी चालविली होती. मात्र, राज्यात युती आणि आघाडीच्या घोळामध्ये जागा वाटपाचाच तिढा न सुटल्याने अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आता निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या तरी पितृपक्ष संपल्यानंतरच विविध पक्षांचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतील असे चित्र आहे.