शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

निवडणुकीत सून जिंकल्यामुळे सासऱ्याची पपईची बाग केली उद्ध्वस्त

By राम शिनगारे | Updated: December 25, 2022 20:32 IST

साडेतीनशे झाडे अर्ध्यातूनच कापली, लाखोंचे नुकसान

औरंगाबाद: ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी सून निवडून आल्यामुळे सासऱ्याची साडेतीनशे पपईची झाडेच अज्ञातांनी रातोरात कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार करोडी शिवारात घडला आहे. यात शेतकऱ्याचे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

ग्रा.पं. निवडणुकांचे निकाल २० डिसेंबर रोजी लागल्यानंतर त्याचे पडसाद ग्रामीण भागात उमटण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहराजवळील करोडी गावातील शेतकरी रामभाऊ धोंडिबा दवंडे यांची गट क्र. ८५ मध्ये सात एकर शेती आहे. या शेतीत त्यांनी पपईच्या ७०० झाडांची लागवड केली हाेती. करोडी ग्रा.पं. निवडणुकीत त्यांची सून सोनाली दवंडे या जिंकल्या. निकालाच्या दुसऱ्याच रात्री रामभाऊ यांच्या शेतातील पपईची तब्बल ३५० पेक्षा अधिक झाडे अर्ध्यातून कापून टाकली. रामभाऊ यांनी दौलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद सलगरकर यांनी दिली.

दिवसरात्र करून पिकाला सांभाळले

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत इतर पिके गेली. दिवसरात्र करून पपईला जोपासले. ग्रामपंचायत निवडणूक आली. त्यात सूनबाई उभ्या राहिल्या. त्यांचा विजयही झाला. एक-दोन दिवसांनी पपई उतरवून बाजारात नेण्यात येणार होती. मात्र, विरोधकांच्या पचनी हे पडलेच नाही. रात्रीतून पपईची बागच उद्ध्वस्त केली असल्याचे सांगताना रामभाऊ यांना अश्रू आवरता आले नाहीत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीgram panchayatग्राम पंचायत