शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

निवडणुकीत सून जिंकल्यामुळे सासऱ्याची पपईची बाग केली उद्ध्वस्त

By राम शिनगारे | Updated: December 25, 2022 20:32 IST

साडेतीनशे झाडे अर्ध्यातूनच कापली, लाखोंचे नुकसान

औरंगाबाद: ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी सून निवडून आल्यामुळे सासऱ्याची साडेतीनशे पपईची झाडेच अज्ञातांनी रातोरात कापून टाकल्याचा धक्कादायक प्रकार करोडी शिवारात घडला आहे. यात शेतकऱ्याचे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

ग्रा.पं. निवडणुकांचे निकाल २० डिसेंबर रोजी लागल्यानंतर त्याचे पडसाद ग्रामीण भागात उमटण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद शहराजवळील करोडी गावातील शेतकरी रामभाऊ धोंडिबा दवंडे यांची गट क्र. ८५ मध्ये सात एकर शेती आहे. या शेतीत त्यांनी पपईच्या ७०० झाडांची लागवड केली हाेती. करोडी ग्रा.पं. निवडणुकीत त्यांची सून सोनाली दवंडे या जिंकल्या. निकालाच्या दुसऱ्याच रात्री रामभाऊ यांच्या शेतातील पपईची तब्बल ३५० पेक्षा अधिक झाडे अर्ध्यातून कापून टाकली. रामभाऊ यांनी दौलताबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद सलगरकर यांनी दिली.

दिवसरात्र करून पिकाला सांभाळले

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत इतर पिके गेली. दिवसरात्र करून पपईला जोपासले. ग्रामपंचायत निवडणूक आली. त्यात सूनबाई उभ्या राहिल्या. त्यांचा विजयही झाला. एक-दोन दिवसांनी पपई उतरवून बाजारात नेण्यात येणार होती. मात्र, विरोधकांच्या पचनी हे पडलेच नाही. रात्रीतून पपईची बागच उद्ध्वस्त केली असल्याचे सांगताना रामभाऊ यांना अश्रू आवरता आले नाहीत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीgram panchayatग्राम पंचायत