शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मुंबईतील ताज हॉटेल आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक
2
इस्रायलच्या कंपनीचा लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप, ChatGPT बनवणाऱ्या कंपनीचा मोठा दावा...
3
मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
बीडमध्ये पुन्हा एसीबीचा ट्रॅप; केजच्या तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात
5
जीवघेणी गरमी; इलेक्शन ड्युटीवर गेलेल्या 22 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक....
6
हजारो वारकऱ्यांना CM एकनाथ शिंदेंचा एक कॉल; "पांडुरंगाचा सेवक म्हणून सेवा करणार"
7
नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?
8
'आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्या...'; मोदींच्या ध्यान-धारणेवरून निवडणूक आयोगाचा PMO ला सल्ला
9
पुढचे ४ आठवडे पाकिस्तानी खेळाडूंवर टीका नको; PCB अध्यक्षांची कळकळीची विनंती
10
ऐतिहासिक पंढरपूरच्या विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील तळघरात आतापर्यंत काय काय सापडलं?
11
Paris Olympics 2024 : निशांतची ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री! असं करणारा ठरला पहिला भारतीय पुरूष बॉक्सर
12
एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
13
Mr. & Mrs. Mahi Movie Review : राजकुमार राव-जान्हवी कपूरच्या अभिनयाचा 'षटकार'
14
मराठवाड्यात महायुतीला मिळणार भोपळा?; मुंडे, दानवेही पडणार, चंद्रकांत खैरेंचा दावा
15
कोकण पदवीधरमधून मनसे उमेदवारी मागे घेणार का? अभिजीत पानसेंनी सगळंच सांगितलं
16
मुंबईत उद्या ‘जम्बो’ हाल होणार; ५३४ लोकल फेऱ्या रद्द!
17
भुजबळांनी पुन्हा दाखवले 'बळ'! समज देण्याची मागणी करणाऱ्यांचा खरपूस शब्दांत समाचार
18
"बोलायला नाही, कर्तृत्त्व दाखवायला हिंमत लागते", परकीय गुंतवणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला!
19
मुंबई महानगरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या तब्बल १५४ इमारती, २०३० पर्यंत ३६१ होणार!
20
"तो निर्णय संघ व्यवस्थापनाचा होता, यात विशेष काही नाही", जितेश शर्माच्या मनाचा मोठेपणा 

खरीप हंगामात शेतकऱ्यांचे ‘थांबा व वाट पाहा’ धोरण;बियाणांची फक्त ३ टक्केच विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 5:49 PM

बी-बियाणे खरेदीसाठी धजेना शेतकरी  

ठळक मुद्देखरीप हंगामाला ७ जूनपासून सुरुवात होते. ३ ते ४ इंच पाऊस पडल्यावरच पेरणी करा 

औरंगाबाद :  खरीप हंगामाला येत्या दोन दिवसांत सुरुवात होत आहे. यंदा मान्सूनचे उशिरा आगमन होणार असे संकेत हवामान विभागाने दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांनीही ‘थांबा व वाट पाहा’ असे धोरण अवलंबले आहेत. यामुळे आजमितीपर्यंत जिल्ह्यात अवघे ३ टक्केच बियाणे विक्री झाले आहेत. यात मक्याचा समावेश अधिक आहे. 

खरीप हंगामाला ७ जूनपासून सुरुवात होते. औरंगाबादेत कपाशी व मका हे दोन पिके खरीप हंगामात महत्त्वाची मानली जातात. बोंडअळीपासून संरक्षणासाठी यंदा ७ जूननंतरच बीटी बियाणे खरेदी करा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. त्याचा प्रचार व प्रसारही मोठ्या प्रमाणात झाला. त्यात यंदा मराठवाड्यात मान्सून उशिरा सुरूहोणार आहे, असे हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. यामुळे शेतकरी अजून बियाणे दुकानात खरेदीसाठी आले नाहीत. मात्र, जिल्ह्यात होलसेल विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांकडे बियाणांचा पुरवठा होत असून, कपाशीच्या ६० ते ६५ टक्के बियाणे व मक्याचे ७० ते ८० टक्के बियाणे किरकोळ विक्रेत्यांकडे पोहोचले आहे.

यासंदर्भात जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, कपाशीच्या किमतीत यंदा पाकीटमागे १० रुपये कमी होऊन ७३० रुपयास (४५० ग्रॅम) विकण्यात येणार आहे, तर मका बियाणाचे भाव मागील वर्षीप्रमाणे ८०० ते १३०० रुपये प्रति ४ किलो बॅग) विकण्यात येत आहे. जिल्ह्यात फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव व कन्नड या तालुक्यांत कपाशी व मका पीक जास्त क्षेत्रावर घेतले जाते. सिल्लोडमध्ये सोयाबीनचाही पेरा होतो. औरंगाबाद तालुका तसेच गंगापूर, वैजापूर, पैठण तालुक्यात जास्त क्षेत्रावर कपाशी व मका तर तुरळक क्षेत्रावर बाजरीची पेरणी केली जाते. गंगापूर, वैजापूर व पैठण येथील नदी काठावर उसाची लागवड केली जात असते. मात्र, पाण्याअभावी यंदा उसाचे क्षेत्र कमी करून त्याऐवजी कपाशी घ्यावी, असा विचार तेथील शेतकरी करीत आहे. यामुळे कपाशीच्या क्षेत्रात वाढीची शक्यता वाटत आहे. जिल्ह्यात १५ जूनपर्यंतच शेतकरी मूग व उडीदची पेरणी करतात, असा दरवर्षीचा अनुभव आहे. यंदा मान्सून उशिरा सक्रिय होणार असल्याने मूग, उडीदची पेरणी किती होते हे सांगणे सध्या कठीण असल्याचेही काळे यांनी नमूद केले.

मागील वर्षी उत्पादन कमी झाल्याचा फटका मागील वर्षी कपाशीला सुरुवातीला ५००० रुपये क्विंटल भाव मिळाला होता. नंतर वाढ होऊन ६३०० रुपयांपर्यंत भाव येऊन ठेपला आहे. तसेच सुरुवातीला १४०० रुपये क्विंटलने विक्री झालेल्या मक्याला सध्या २१०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. जेव्हा भाव चांगला मिळू लागला तेव्हा शेतकऱ्यांकडे कपाशी व मका शिल्लक नव्हता. 

३ ते ४ इंच पाऊस पडल्यावरच पेरणी करा राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार यांनी सांगितले की, यंदा मान्सून मराठवाड्यात उशिरा दाखल होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मि.मी. (३ ते ४ इंच) पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबादRainपाऊस