शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

सहा गावातील शेतकरी अनुदानापासून वंचित

By admin | Updated: June 24, 2014 00:27 IST

ईट : गारपीटग्रस्तांना शासनाने आचारसंहितेच्या कालावधीत नुकसानभरपाई जाहीर केली़

ईट : गारपीटग्रस्तांना शासनाने आचारसंहितेच्या कालावधीत नुकसानभरपाई जाहीर केली़ डीसीसी बँकेत याद्यानिहाय लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केलेली असतानाही अद्यापपर्यंत ईट (ता़भूम) परिसरातील सहा गावातील शेतकऱ्यांना मदतीचा छदाम न मिळाल्याने संताप व्यक्त होत आहे़ डीसीसीचे अधिकारी कर्मचारी कमी असल्याचा कांगावा करीत असून, या सुलतानी संकटामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे़रबी हंगामामध्ये पिके हातातोंडाशी आलेली असताना अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले़ महसूल विभागाच्या वतीने पंचनामे झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असूनही विशेष बाब म्हणून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे जाहीर करण्यात आले. सर्व शेतकऱ्यांना नुकसानीच्या पटीत रबी हंगामातील पीक पाहणीनुसार रक्कमही तहसील कार्यालयामार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वर्ग करण्यात आली.ईट शाखेंतर्गत असलेल्या गावांपैकी पांढरेवाडी, पखरुड, नागेवाडी, निपाणी, माळेवाडी, लांजेश्वर या सहा गावच्या शेतकऱ्यांना गारपिटीने झालेल्या नुकसानीचे अद्याप वाटप झाले नाही. याबाबत शाखाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, सरसकट अनुदानाचे वाटप सुरु आहे. काही गावच्या गारपिटीच्या रक्कमेचेही वाटप झाले आहे. मोठी सभासद संख्या, कमी कर्मचारी वर्ग व आॅनलाईन पद्धत असल्याने व त्याचा स्पीड कमी असल्याने या वाटपास उशीर होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.दरम्यान, रबी हंगामातील पिकाचे गारपिटीने झालेले नुकसानभरपाई तात्काळ वाटप केल्यानंतर खरीप हंगामातील पेरणीस याचा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे़ त्यामुळे बँकेने तात्काळ मदतीच्या निधीचे वाटप करावे, अशी मागणी उमाचीवाडी येथील उपसरपंच सुभाष शेळके यांनी केली आहे.