शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

शेतकऱ्यांनी वनौषधीच्या शेतीकडे वळावे; त्यांचे उत्पन्न चारपटीने वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 18:35 IST

शेतकऱ्यांनी औषधी वनस्पतीच्या शेतीकडे वळावे, याद्वारे त्यांचे उत्पन्न चारपटीने वाढेल, असे आवाहन केंद्रिय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक यांनी आज केले. 

औरंगाबाद : आयुर्वेद व आयुष पॅथीवर संंशोधन करण्यासाठी जगातील १२ देशाशी करार झाला आहे. यामुळे येत्या काळात वनौषधीला मोठी मागणी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी औषधी वनस्पतीच्या शेतीकडे वळावे, याद्वारे त्यांचे उत्पन्न चारपटीने वाढेल, असे आवाहन केंद्रिय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक यांनी आज केले. 

एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आज शहरात आले होते. नाईक यांनी पुढे सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्युएचओ) मध्ये गेल्या वर्षी भारताचा एक प्रतिनिधीचा समावेश झाला आहे. याद्वारे आयुर्वेद, आयुष व अन्य देशातील वैद्यकीय पॅथीचा संबंध यावर संशोधन करण्यात येणार आहे. यामुळे योगापाठोपाठ आयुर्वेद, आयुषला जागतिक मान्यता मिळत आहे. देशातीलच नव्हे तर विदेशी कंपन्यानकडूनही आयुर्वेदिक औषधाची मागणी वाढू लागली आहे.

मेडिसीन प्लँट बोर्ड सुरु

वनौषधीचे उत्पादन वाढावे यासाठी मंत्रालयाने मेडिसीन प्लँट बोर्ड सुरु केले असून त्याद्वारे वनौषधीची शेती करणाऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत, तसेच अर्थसाह्य केले जात आहे. यात खाजगी व स्वयंसेवी संस्था उतरल्या आहेत. विविध कंपन्यांशी करार करुन वनौषधीची शेती केली जात आहे. याचधर्तीवर पुण्याच्या आसपासच्या परिसरात अडीच हजार एकरवर वनौषधीची लागवड झाली आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक घेत असताना मधल्या ३ ते ६ महिन्याच्या काळात वनौषधीची शेती करावी, जेणे करुन उत्पन्नात वाढ होईल, असे त्यांनी नमूद केले. 

आयुर्वेदीक उपचार घेणाऱ्यांना सरकारी योजनाचा लाभ श्रीपाद नाईक यांनी सांगितले की, जसे अ‍ॅलोपॅथीचे उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी सरकारच्या विविध योजना, सवलती देण्यात येतात. त्याच पार्श्वभूमीवर आयुर्वेदीक उपचार घेणाऱ्यांसाठीही सरकारी योजनाचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न सुरु आहे. येत्या काळात याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोेषणाही त्यांनी केली. 

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रmedicineऔषधं