शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

शेतकऱ्यांनी वनौषधीच्या शेतीकडे वळावे; त्यांचे उत्पन्न चारपटीने वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 18:35 IST

शेतकऱ्यांनी औषधी वनस्पतीच्या शेतीकडे वळावे, याद्वारे त्यांचे उत्पन्न चारपटीने वाढेल, असे आवाहन केंद्रिय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक यांनी आज केले. 

औरंगाबाद : आयुर्वेद व आयुष पॅथीवर संंशोधन करण्यासाठी जगातील १२ देशाशी करार झाला आहे. यामुळे येत्या काळात वनौषधीला मोठी मागणी वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर आता शेतकऱ्यांनी औषधी वनस्पतीच्या शेतीकडे वळावे, याद्वारे त्यांचे उत्पन्न चारपटीने वाढेल, असे आवाहन केंद्रिय राज्यमंत्री (आयुष) श्रीपाद नाईक यांनी आज केले. 

एका खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने ते आज शहरात आले होते. नाईक यांनी पुढे सांगितले की, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्युएचओ) मध्ये गेल्या वर्षी भारताचा एक प्रतिनिधीचा समावेश झाला आहे. याद्वारे आयुर्वेद, आयुष व अन्य देशातील वैद्यकीय पॅथीचा संबंध यावर संशोधन करण्यात येणार आहे. यामुळे योगापाठोपाठ आयुर्वेद, आयुषला जागतिक मान्यता मिळत आहे. देशातीलच नव्हे तर विदेशी कंपन्यानकडूनही आयुर्वेदिक औषधाची मागणी वाढू लागली आहे.

मेडिसीन प्लँट बोर्ड सुरु

वनौषधीचे उत्पादन वाढावे यासाठी मंत्रालयाने मेडिसीन प्लँट बोर्ड सुरु केले असून त्याद्वारे वनौषधीची शेती करणाऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत, तसेच अर्थसाह्य केले जात आहे. यात खाजगी व स्वयंसेवी संस्था उतरल्या आहेत. विविध कंपन्यांशी करार करुन वनौषधीची शेती केली जात आहे. याचधर्तीवर पुण्याच्या आसपासच्या परिसरात अडीच हजार एकरवर वनौषधीची लागवड झाली आहे. शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक घेत असताना मधल्या ३ ते ६ महिन्याच्या काळात वनौषधीची शेती करावी, जेणे करुन उत्पन्नात वाढ होईल, असे त्यांनी नमूद केले. 

आयुर्वेदीक उपचार घेणाऱ्यांना सरकारी योजनाचा लाभ श्रीपाद नाईक यांनी सांगितले की, जसे अ‍ॅलोपॅथीचे उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी सरकारच्या विविध योजना, सवलती देण्यात येतात. त्याच पार्श्वभूमीवर आयुर्वेदीक उपचार घेणाऱ्यांसाठीही सरकारी योजनाचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न सुरु आहे. येत्या काळात याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येईल, अशी घोेषणाही त्यांनी केली. 

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रmedicineऔषधं