शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जिल्ह्यातील ३२१ गावांतील शेतकऱ्यांना मिळणार २५ टक्के विम्याची रक्कम

By विकास राऊत | Updated: September 6, 2023 13:45 IST

पंतप्रधान पीकविमा योजना; अधिसूचना जारी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांत पावसाचा १६ ते ४० दिवसांचा खंड पडला आहे. २० महसूल मंडळांत सलग २१ हून अधिक दिवसांचा खंड पडला आहे. तेथील पिकांच्या उत्पादनात ५० टक्के घट येणार असल्याचा अंदाज तालुकास्तरीय समितीने व्यक्त केला आहे. त्यानुसार पीकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूलता या बाबीखाली शेतकऱ्यांना २५ टक्के भरपाई देण्याची अधिसूचना जारी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिले. यामुळे ३२१ गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, प्रभोदय मुळे, विमा कंपनी, स्कायमेट, शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील पेरणी व पावसाचा खंडपीकविमा योजना खरीप हंगाम-२०२३ च्या जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक मंगळवारी झाली. जिल्ह्याचे खरीप हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र ६ लाख ८४ हजार ७१६ हेक्टर इतके असून त्यापैकी ६ लाख ५८ हजार १२३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ऑगस्टअखेर ४३१ मिलिमीटर पर्जन्यमान अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ २७६ मिलिमीटर म्हणजेच ६४.१४ टक्के इतकेच पर्जन्यमान झाले आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांत १६ ते ४० दिवस पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांची अवस्था बिकट आहे.

कोणत्या तालुक्यात सर्वेक्षण?औरंगाबाद तालुक्यातील ४, फुलंब्री तालुका १, वैजापूर तालुका १० व गंगापूर तालुक्यातील ५ मंडळे आहेत. या मंडळाअंतर्गत ३२१ गावे असून त्यांचे सर्वेक्षण तालुकास्तरीय समितीमार्फत केले. अहवालानुसार मका, कापूस व सोयाबीन पिकांच्या उत्पादकतेत ५० टक्के घट शक्य आहे.

कृषी अधिकारी काय म्हणाले?औरंगाबाद तालुक्यातील ४ महसूल मंडळांतील ६८ गावे, फुलंब्री तालुक्यातील एका मंडळातील २४ गावे, वैजापूर तालुक्यातील १० मंडळांतील १३३ गावे, गंगापूर तालुक्यातील ५ मंडळांतील ९६ गावे अशा एकूण २० मंडळांतील ३२१ गावांमधील पीकविमा संरक्षित शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.-प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद