शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

जिल्ह्यातील ३२१ गावांतील शेतकऱ्यांना मिळणार २५ टक्के विम्याची रक्कम

By विकास राऊत | Updated: September 6, 2023 13:45 IST

पंतप्रधान पीकविमा योजना; अधिसूचना जारी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांत पावसाचा १६ ते ४० दिवसांचा खंड पडला आहे. २० महसूल मंडळांत सलग २१ हून अधिक दिवसांचा खंड पडला आहे. तेथील पिकांच्या उत्पादनात ५० टक्के घट येणार असल्याचा अंदाज तालुकास्तरीय समितीने व्यक्त केला आहे. त्यानुसार पीकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूलता या बाबीखाली शेतकऱ्यांना २५ टक्के भरपाई देण्याची अधिसूचना जारी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिले. यामुळे ३२१ गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, प्रभोदय मुळे, विमा कंपनी, स्कायमेट, शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील पेरणी व पावसाचा खंडपीकविमा योजना खरीप हंगाम-२०२३ च्या जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक मंगळवारी झाली. जिल्ह्याचे खरीप हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र ६ लाख ८४ हजार ७१६ हेक्टर इतके असून त्यापैकी ६ लाख ५८ हजार १२३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ऑगस्टअखेर ४३१ मिलिमीटर पर्जन्यमान अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ २७६ मिलिमीटर म्हणजेच ६४.१४ टक्के इतकेच पर्जन्यमान झाले आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांत १६ ते ४० दिवस पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांची अवस्था बिकट आहे.

कोणत्या तालुक्यात सर्वेक्षण?औरंगाबाद तालुक्यातील ४, फुलंब्री तालुका १, वैजापूर तालुका १० व गंगापूर तालुक्यातील ५ मंडळे आहेत. या मंडळाअंतर्गत ३२१ गावे असून त्यांचे सर्वेक्षण तालुकास्तरीय समितीमार्फत केले. अहवालानुसार मका, कापूस व सोयाबीन पिकांच्या उत्पादकतेत ५० टक्के घट शक्य आहे.

कृषी अधिकारी काय म्हणाले?औरंगाबाद तालुक्यातील ४ महसूल मंडळांतील ६८ गावे, फुलंब्री तालुक्यातील एका मंडळातील २४ गावे, वैजापूर तालुक्यातील १० मंडळांतील १३३ गावे, गंगापूर तालुक्यातील ५ मंडळांतील ९६ गावे अशा एकूण २० मंडळांतील ३२१ गावांमधील पीकविमा संरक्षित शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.-प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद