शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

जिल्ह्यातील ३२१ गावांतील शेतकऱ्यांना मिळणार २५ टक्के विम्याची रक्कम

By विकास राऊत | Updated: September 6, 2023 13:45 IST

पंतप्रधान पीकविमा योजना; अधिसूचना जारी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांत पावसाचा १६ ते ४० दिवसांचा खंड पडला आहे. २० महसूल मंडळांत सलग २१ हून अधिक दिवसांचा खंड पडला आहे. तेथील पिकांच्या उत्पादनात ५० टक्के घट येणार असल्याचा अंदाज तालुकास्तरीय समितीने व्यक्त केला आहे. त्यानुसार पीकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूलता या बाबीखाली शेतकऱ्यांना २५ टक्के भरपाई देण्याची अधिसूचना जारी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दिले. यामुळे ३२१ गावांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, प्रभोदय मुळे, विमा कंपनी, स्कायमेट, शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील पेरणी व पावसाचा खंडपीकविमा योजना खरीप हंगाम-२०२३ च्या जिल्हास्तरीय संयुक्त समितीची बैठक मंगळवारी झाली. जिल्ह्याचे खरीप हंगामातील सरासरी पेरणी क्षेत्र ६ लाख ८४ हजार ७१६ हेक्टर इतके असून त्यापैकी ६ लाख ५८ हजार १२३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. ऑगस्टअखेर ४३१ मिलिमीटर पर्जन्यमान अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ २७६ मिलिमीटर म्हणजेच ६४.१४ टक्के इतकेच पर्जन्यमान झाले आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांत १६ ते ४० दिवस पावसाचा खंड पडल्याने खरीप पिकांची अवस्था बिकट आहे.

कोणत्या तालुक्यात सर्वेक्षण?औरंगाबाद तालुक्यातील ४, फुलंब्री तालुका १, वैजापूर तालुका १० व गंगापूर तालुक्यातील ५ मंडळे आहेत. या मंडळाअंतर्गत ३२१ गावे असून त्यांचे सर्वेक्षण तालुकास्तरीय समितीमार्फत केले. अहवालानुसार मका, कापूस व सोयाबीन पिकांच्या उत्पादकतेत ५० टक्के घट शक्य आहे.

कृषी अधिकारी काय म्हणाले?औरंगाबाद तालुक्यातील ४ महसूल मंडळांतील ६८ गावे, फुलंब्री तालुक्यातील एका मंडळातील २४ गावे, वैजापूर तालुक्यातील १० मंडळांतील १३३ गावे, गंगापूर तालुक्यातील ५ मंडळांतील ९६ गावे अशा एकूण २० मंडळांतील ३२१ गावांमधील पीकविमा संरक्षित शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.-प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद