शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील शेतकरी सध्या संक्रमणातून जातोय : पी. साईनाथ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 19:15 IST

शेती आणि शेतकऱ्यांबाबत तातडीने निर्णय होत नसल्यामुळे सावकारांचे फावते

औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी सध्या संक्रमणातून जात आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी हा विभाग सध्या होरपळतो आहे. दरडोई पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशी व्यवस्था नाही. ४० टक्के ग्रामीण भाग पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे. शेती आणि शेतकऱ्यांबाबत तातडीने निर्णय होत नसल्यामुळे सावकारांचे फावत असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी मंगळवारी व्यक्त केले.

येथील बेट्रा संस्थेच्या सभागृहात पी. साईनाथ यांनी ‘नेशन फॉर फार्मस्’च्या अनुषंगाने शहरातील काही डॉक्टर, प्राध्यापक, वकील, चळवळीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी एमजीएमचे प्रतापराव बोराडे, एआयबीईएचे सरचिटणीस देवीदास तुळजापूरकर, प्रा.अजित दळवी, प्रा. विजय दिवाण आदींची उपस्थिती होती. 

पी.साईनाथ म्हणाले, २००४ मध्ये कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन आयोगाने शासनाकडे अहवाल दिला. त्यावर आजवर निर्णय झाला नाही. शेतकऱ्यांसाठी कायदा, आरोग्य, शिक्षण, महिला शेतकऱ्यांसाठी निर्णय होणे गरजेचे आहे. देशातील ६ टक्के शेतकऱ्यांकडे वीजजोडणी आहे. १९९८ पूर्वी भारतातील शेतकऱ्यांची काहीही मागणी नव्हती; परंतु नंतरच्या काळात शेतीवर आधारित अभियांत्रिकीमुळे शेती आणि शेतकऱ्यांची व्याख्या बदलली. शेतकरी आत्महत्येचे आकडे खोटे आहेत. कारण एनसीआरबी ही संस्थाच सरकारने अवसायनात काढली. शासनाने अनेक विभाग विलीनीकरण, केंद्रीकरण आणि पुन्हा विलीनीकरण केल्यामुळे कुणाचाही कुणाला मेळ राहिलेला नाही. शेतकरी आत्महत्यांबाबत असलेला डेटा चुकीचा असल्याचा आरोप त्यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना केला. देशात ८ टक्के महिलांच्या नावे सातबारा आहे, हे प्रमाण वाढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 

बोअरवेल्स, टँकरमध्ये मोठी उलाढाल हवामान खात्यांचा अंदाज चुकीचा ठरत असल्याचे सांगून पी. साईनाथ म्हणाले, बोअरवेल्स आणि टँकर पाणीपुरवठा हा कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा उद्योग झाला आहे. दिवसाकाठी ३ बोअरवेल्स खोदले जाण्याचे प्रमाण आहे. औरंगाबादमधील शेतकरी सध्या धोकादायक काळातून जात आहेत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरविना दुसरा पर्याय नाही. दुष्काळाचे मूल्यमापन करण्याचे नियम क्लिष्ट झाले आहेत. शेतकऱ्यांसाठी उपाययोजना, निर्णय घेण्यात १० ते २० दिवसांचा काळ जरी लोटला तरी शेतकऱ्यांना सावकारांच्या दाराशी जावे लागते. 

टॅग्स :Farmerशेतकरीdroughtदुष्काळfarmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेती