शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
2
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
3
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
4
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
5
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
6
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
7
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
8
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
9
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
10
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
11
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
12
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
13
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
14
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
15
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
16
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
17
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
18
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
19
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
20
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला

४० वर्षांच्या लढ्यानंतर शेतकऱ्यांना मिळतेय विक्री स्वातंत्र्य; तीन कृषी कायद्यांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2021 19:06 IST

शेतकरी संघटना न्यास, शेतकरी संघटना उच्चाधिकार समिती आणि मर्यादित कार्यकारिणी यांची संयुक्त बैठक रविवारी कार्याध्यक्ष गोविंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे भाव पिकाच्या पेरणीपूर्वी संरक्षित करून घेणे शक्य होणार आहे. एमएसपीऐवजी शेतीमालाला जास्तीत जास्त भाव मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटना करत आली आहे.

औरंगाबाद : बाजार समितीबाहेर खुल्या बाजारपेठेत शेतमाल विक्रीला परवानगी देणाऱ्या कृषी कायद्यांना शेतकरी संघटनेने पाठिंबा दर्शविला आहे. ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीचे स्वातंत्र्य मिळाले आहे. शेतमाल सुधारणा व खुलीकरणाच्या दिशेने केंद्र सरकारने हे पहिले पाऊल टाकले असून, या सुधारणेसाठी आमचा पाठिंबा असल्याचे शेतकरी संघटना न्यासचे कार्याध्यक्ष गोविंद जोशी यांनी येथे जाहीर केले.

शेतकरी संघटना न्यास, शेतकरी संघटना उच्चाधिकार समिती आणि मर्यादित कार्यकारिणी यांची संयुक्त बैठक रविवारी कार्याध्यक्ष गोविंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी किसान समन्वय समितीचे सचिव गुणवंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांचे सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीवर निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी ललित पाटील बहाळे यांची निवड करण्यात आली. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत जोशी यांनी पंजाब, हरियाणातील शेतकरी तिन्ही कृषी कायदे रद्द करा, असे म्हणत दिल्लीत आंदोलन करत आहेत, त्याला आमच्या संघटनेचा विरोध असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने पारित केलेल्या ३ कृषी कायद्यांमुळे सरकारचा बाजार समित्यांमधील व जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या माध्यमातून होणार हस्तक्षेप मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे भाव पिकाच्या पेरणीपूर्वी संरक्षित करून घेणे शक्य होणार आहे. बाजार खुला केल्यामुळे अनेक स्पर्धक खरेदीदार, प्रक्रिया उद्योग या व्यवहारात येणार असल्याने शेतीमाल खरेदीसाठी मोठी स्पर्धा निर्माण होईल. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, भाव वाढवून मिळेल, असेही जोशी यांनी नमूद केले. नवनिर्वाचित कार्याध्यक्ष ललित पाटील बहाळे यांनी सांगितले की, एमएसपीऐवजी शेतीमालाला जास्तीत जास्त भाव मिळावा, अशी मागणी शेतकरी संघटना करत आली आहे. स्वस्त धान्य विक्री व्यवस्था जोपर्यंत बंद होत नाही, शेतीमाल व्यवहारात सरकारचा हस्तक्षेप कमी होत नाही तोपर्यंत शेतीमालाला जास्तीत जास्त भाव मिळू शकत नाही, असे नमूद केले. यावेळी गुणवंत पाटील हंगरगेकर, दिनेश शर्मा, गीता खांडेभराड, जयश्री पाटील, कैलास तवार, अनंत देशपांडे, ज्ञानेश्वर शेलार, श्रीकांत उमरीकर आदी उपस्थित होते.

कृषी कायद्यांवर चर्चा होऊ शकतेप्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचा शेतकरी संघटनेने निषेध केला. कृषी कायद्याचे फायदे-तोटे यावर चर्चा होऊ शकते, त्यात आणखी सुधारणा करता येतील. मात्र, सर्व कायदे रद्द करा, ही काही संघटनांची मागणी तर्कशुद्ध नाही, असेही गोविंद जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीAurangabadऔरंगाबाद