शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
5
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
6
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
7
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
8
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
9
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
10
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
11
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
12
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
13
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
14
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
15
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार
16
आमिर-जुनैदनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील आयकॉनिक सीन, पाहा मजेशीर VIDEO
17
आज शितला सप्तमीच्या मुहूर्तावर सुरु करा रोज ५ मिनिटं शेगडी पूजन; अन्नपूर्णा होईल प्रसन्न!
18
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
19
Video: विचित्र घटना; 'मौत का कुआं'मध्ये तरुण कोसळला; बाईक रायडरशिवाय तासभर धावत राहिली
20
चमत्कार! "मी वर तरंगत होते अन् माझं शरीर..."; १७ मिनिटांचा 'मृत्यू', महिलेसोबत काय घडलं?

शेतकऱ्यांनो, उसाचे पाचट, गव्हाचे धसकट जाळू नका; शेतातच सडू द्या, जमिनीचा पोत सुधारतो

By बापू सोळुंके | Updated: December 22, 2023 12:10 IST

लवकरात लवकर जमिनीत कुजावे यासाठी त्यावर बाजारात मिळणाऱ्या औषधाची फवारणी करावी.

छत्रपती संभाजीनगर : उसाचे, गव्हाचे पीक घेतल्यानंतर पाचट-धसकट शेतकरी जाळून टाकतात. याचा जमिनीला आणि वातावरणाला तोटाच होतो. शेतीतज्ज्ञाच्या मते, गव्हाचे धसकट असो किंवा उसाचे पाचट जमिनीतच सडू दिले तर शेतजमिनीतीला सेंद्रिय कर्ब सुधारतो. परिणामी पिकाला पोषक तत्त्व मिळतात आणि उत्पादन वाढते.

उसाचे पाचट जाळू नका दरवर्षी शेतकरी उसाची तोडणी झाल्यानंतर उसाचे पाचट जाळून टाकतात. उसाचे पाचट जाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड मेहनत करावी लागते. मात्र, कृषीतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार उसाचे पाचट हे जमिनीचा पोत सुधारण्यासाठी एक उत्तम असा सेंद्रिय पदार्थ आहे. हे पाचट शेतातच सडू द्यायला हवे.

मका, गव्हाच्या काड्या, धसकट जाळू नकागहू पिकाची कापणी झाल्यानंतर अथवा हार्वेस्टरने गव्हाची काढणी केल्यावर शेतात गव्हाच्या काड्या आणि धसकट उभे असते. खरीप हंगामासाठी शेत तयार करण्यासाठी शेतकरी सर्वप्रथम गव्हाच्या काड्या आणि धसकट जाळून टाकतात. मात्र, या काड्या आणि धसकट जाळून न टाकता. शेतकऱ्यांनी त्यावर नांगरणी करावी. जेणे करून हे धसकट जमिनीत सडून त्याचे खत होईल. हे खत पुढील पिकासाठी उत्तम असे टॉनिक असते.

प्रदूषण वाढले, जमिनीसाठीही धोकादायकदरवर्षी शेतकरी खरीप आणि रब्बी हंगामपूर्वी शेतीतील गहू, मका, ज्वारी, बाजरीच्या पिकाचे धसकट, काडी, कचरा,उसाचे पाचट, कापसाच्या पराट्या जाळून टाकतात. यामुळे हवेतील प्रदूषणाचा स्तर वाढतो. वाढलेले प्रदूषण मानवासाठी आणि जमिनीसाठी धोकादायक ठरते, म्हणून शेतातील पिकांचा कचरा जाळू नका, असे आवाहन अभ्यासक करतात.

जमिनीत गाडणे लाभदायक गहू, मका, ज्वारी, बाजरी पिकाची काढणी झाल्यानंतर उरलेले धसकट, काडी, कचरा, उसाचे पाचट, कापसाच्या पराट्या न जाळता त्यावर रोटाव्हेटर फिरवून अथवा नांगर फिरवून जमिनीत गाडावे. लवकरात लवकर हे जमिनीत कुजावे यासाठी त्यावर बाजारात मिळणाऱ्या औषधाची फवारणी करावी. असे केल्यास जमिनीचा पोत सुधारतो.-सुरेश बेडवाल, विना मशागत शेतीचे पुरस्कर्ते.

जमिनीची सुपिकता वाढतेशेतातील कोणत्याही पिकाचा पाला, पाचोळा अथवा गव्हाच्या काड्या, उसाचे पाचट शेतात सडू दिल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो. परिणामी जमिनीची सुपीकता चांगली होते आणि पुढील पिकाचे उत्पादन वाढते. उसाचे पाचट असो किंवा अन्य पिकाचा काडी, कचरा जाळल्यास हवेतील प्रदूषणच वाढते.-प्रकाश देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक

 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रAurangabadऔरंगाबाद