शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची चिंता वाढली; मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:29 IST

नोव्हेंबर २०१९ च्या पूर्वार्धापर्यंत पाऊस झाल्यामुळे रबी हंगामात पेरणीचे प्रमाण मोठे आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी पिकांसह आंब्याचे नुकसान झाले आहे. . एकूण बाधित पिकांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश

औरंगाबाद : मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत बीड, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील बहुतांश महसूल मंडळांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला. नोव्हेंबर २०१९ च्या पूर्वार्धापर्यंत पाऊस झाल्यामुळे रबी हंगामात पेरणीचे प्रमाण मोठे आहे. खरिपातील नुकसानभरपाई रबीतून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असून, त्यावरही गारपीट आणि अवकाळीचे संकट आले आहे.  

अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी पिकांसह आंब्याचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळपर्यंत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सर्वाधिक फटका बीड तालुक्यातील राजुरी, पाली (२५ मि.मी.), लिंबा गणेश (८.७५ मि.मी.), पाटोदा तालुक्यातील पाटोदा (१३.७५ मि.मी.), दसखेड (८ मि.मी.), आष्टी तालुक्यातील थेरला (११ मि.मी.), दावलवडगाव (२४. ७६ मि.मी.) या मंडळांमधील गावांना फटका  बसला. 

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात पावसाची मोठी हजेरी होती. तालुक्यातील वाकोडी (१३.७५ मि.मी.), आखाडा (१९ मि.मी.), डोंगरकडा (१२.२५ मि.मी.), वारंगा (१३ मि.मी.) मंडळात जोरदार पाऊस झाला. 

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी (१४.७५ मि.मी.) व अंबड तालुक्यातील वडीगोद्री (९ मि.मी.) व सुखापुरी मंडळामध्ये ७.७५ मि.मी. पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पिंपरखेड (१३.५० मि.मी.), लोहा (८.७५ मि.मी.), किनवट (९.५० मि.मी.), हिमायतनगर तालुक्यातील जावळगाव (११.२५ मि.मी.) असा मोठा पाऊस झाला. लातूर जिल्ह्यालाही अवकाळीने फटका दिला. जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा (१३ मि.मी.), उदगीरमधील नागलगाव (८.५० मि.मी.), मोहा (८ मि.मी.), रेणापूरमधील पेनगाव (१३.२५ मि.मी.), केरापूर (११.७५ मि.मी.) या मंडळांमध्ये मोठा पाऊस झाला. 

नुकसानीचे पंचनामे होणारराज्यासह औरंगाबाद विभागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण बाधित पिकांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासनस्तरावरून देण्यात आले आहेत. शेती पिकांच्या नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज असून, कृषी विभाग व महसूल विभाग यांच्याकडून संयुक्त पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. आधीच दुष्काळी असलेल्या मराठवाड्याला काही वर्षांपासून गारपीट आणि अवकाळीचा फटका बसतो आहे. तीन महिन्यांपूर्वी अवकाळीने खरिपांची पिके हिरावून घेतली. आता रबी पिकांवर अवकाळीचे संकट आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र