शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

शेतकऱ्यांची चिंता वाढली; मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:29 IST

नोव्हेंबर २०१९ च्या पूर्वार्धापर्यंत पाऊस झाल्यामुळे रबी हंगामात पेरणीचे प्रमाण मोठे आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी पिकांसह आंब्याचे नुकसान झाले आहे. . एकूण बाधित पिकांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश

औरंगाबाद : मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत बीड, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील बहुतांश महसूल मंडळांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला. नोव्हेंबर २०१९ च्या पूर्वार्धापर्यंत पाऊस झाल्यामुळे रबी हंगामात पेरणीचे प्रमाण मोठे आहे. खरिपातील नुकसानभरपाई रबीतून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असून, त्यावरही गारपीट आणि अवकाळीचे संकट आले आहे.  

अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी पिकांसह आंब्याचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळपर्यंत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सर्वाधिक फटका बीड तालुक्यातील राजुरी, पाली (२५ मि.मी.), लिंबा गणेश (८.७५ मि.मी.), पाटोदा तालुक्यातील पाटोदा (१३.७५ मि.मी.), दसखेड (८ मि.मी.), आष्टी तालुक्यातील थेरला (११ मि.मी.), दावलवडगाव (२४. ७६ मि.मी.) या मंडळांमधील गावांना फटका  बसला. 

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात पावसाची मोठी हजेरी होती. तालुक्यातील वाकोडी (१३.७५ मि.मी.), आखाडा (१९ मि.मी.), डोंगरकडा (१२.२५ मि.मी.), वारंगा (१३ मि.मी.) मंडळात जोरदार पाऊस झाला. 

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी (१४.७५ मि.मी.) व अंबड तालुक्यातील वडीगोद्री (९ मि.मी.) व सुखापुरी मंडळामध्ये ७.७५ मि.मी. पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पिंपरखेड (१३.५० मि.मी.), लोहा (८.७५ मि.मी.), किनवट (९.५० मि.मी.), हिमायतनगर तालुक्यातील जावळगाव (११.२५ मि.मी.) असा मोठा पाऊस झाला. लातूर जिल्ह्यालाही अवकाळीने फटका दिला. जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा (१३ मि.मी.), उदगीरमधील नागलगाव (८.५० मि.मी.), मोहा (८ मि.मी.), रेणापूरमधील पेनगाव (१३.२५ मि.मी.), केरापूर (११.७५ मि.मी.) या मंडळांमध्ये मोठा पाऊस झाला. 

नुकसानीचे पंचनामे होणारराज्यासह औरंगाबाद विभागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण बाधित पिकांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासनस्तरावरून देण्यात आले आहेत. शेती पिकांच्या नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज असून, कृषी विभाग व महसूल विभाग यांच्याकडून संयुक्त पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. आधीच दुष्काळी असलेल्या मराठवाड्याला काही वर्षांपासून गारपीट आणि अवकाळीचा फटका बसतो आहे. तीन महिन्यांपूर्वी अवकाळीने खरिपांची पिके हिरावून घेतली. आता रबी पिकांवर अवकाळीचे संकट आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र