शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

शेतकऱ्यांची चिंता वाढली; मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 12:29 IST

नोव्हेंबर २०१९ च्या पूर्वार्धापर्यंत पाऊस झाल्यामुळे रबी हंगामात पेरणीचे प्रमाण मोठे आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी पिकांसह आंब्याचे नुकसान झाले आहे. . एकूण बाधित पिकांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश

औरंगाबाद : मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोमवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत बीड, हिंगोली, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील बहुतांश महसूल मंडळांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला. नोव्हेंबर २०१९ च्या पूर्वार्धापर्यंत पाऊस झाल्यामुळे रबी हंगामात पेरणीचे प्रमाण मोठे आहे. खरिपातील नुकसानभरपाई रबीतून काढण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असून, त्यावरही गारपीट आणि अवकाळीचे संकट आले आहे.  

अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी पिकांसह आंब्याचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळपर्यंत वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सर्वाधिक फटका बीड तालुक्यातील राजुरी, पाली (२५ मि.मी.), लिंबा गणेश (८.७५ मि.मी.), पाटोदा तालुक्यातील पाटोदा (१३.७५ मि.मी.), दसखेड (८ मि.मी.), आष्टी तालुक्यातील थेरला (११ मि.मी.), दावलवडगाव (२४. ७६ मि.मी.) या मंडळांमधील गावांना फटका  बसला. 

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात पावसाची मोठी हजेरी होती. तालुक्यातील वाकोडी (१३.७५ मि.मी.), आखाडा (१९ मि.मी.), डोंगरकडा (१२.२५ मि.मी.), वारंगा (१३ मि.मी.) मंडळात जोरदार पाऊस झाला. 

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी (१४.७५ मि.मी.) व अंबड तालुक्यातील वडीगोद्री (९ मि.मी.) व सुखापुरी मंडळामध्ये ७.७५ मि.मी. पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील पिंपरखेड (१३.५० मि.मी.), लोहा (८.७५ मि.मी.), किनवट (९.५० मि.मी.), हिमायतनगर तालुक्यातील जावळगाव (११.२५ मि.मी.) असा मोठा पाऊस झाला. लातूर जिल्ह्यालाही अवकाळीने फटका दिला. जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा (१३ मि.मी.), उदगीरमधील नागलगाव (८.५० मि.मी.), मोहा (८ मि.मी.), रेणापूरमधील पेनगाव (१३.२५ मि.मी.), केरापूर (११.७५ मि.मी.) या मंडळांमध्ये मोठा पाऊस झाला. 

नुकसानीचे पंचनामे होणारराज्यासह औरंगाबाद विभागात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण बाधित पिकांच्या नुकसानीचे सविस्तर पंचनामे करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासनस्तरावरून देण्यात आले आहेत. शेती पिकांच्या नुकसानीचा हा प्राथमिक अंदाज असून, कृषी विभाग व महसूल विभाग यांच्याकडून संयुक्त पंचनामे झाल्यानंतर प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. आधीच दुष्काळी असलेल्या मराठवाड्याला काही वर्षांपासून गारपीट आणि अवकाळीचा फटका बसतो आहे. तीन महिन्यांपूर्वी अवकाळीने खरिपांची पिके हिरावून घेतली. आता रबी पिकांवर अवकाळीचे संकट आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

टॅग्स :RainपाऊसMarathwadaमराठवाडाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र