शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

निवडणुकीच्या धामधुमीत शेतकरी आत्महत्या सुरूच; सोयगावात ३ दिवसात ३ शेतकऱ्यांनी संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 19:10 IST

नापिकी आणि कर्जबाजारीपणातून शेतकरी आत्महत्या

सोयगाव : सोयगावसह तालुक्यात दुष्काळाच्या दाहकतेने खरीप उत्पादक शेतकऱ्यांनी नापिकीची धास्ती घेतली आहे. यातच डोक्यावर कर्ज असल्याने आलेल्या नैराश्यातून तीन दिवसात तालुक्यातील ३ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे उघडकीस आले आहे. तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून शेतकरी आणि मजुरांनी हातांना काम नसल्याने स्थलांतर सुरु केले आहे. तर दुसरीकडे निवडणुकीच्या प्रचारातून शेतकरी आत्महत्या या मुद्द्याच गायब झाल्याचे चित्र आहे.  

गुरुवारी पहाटे निंबायती येथील तरुण शेतकरी जगन सदू जाधव (३६  ) याने  पिकांची स्थिती पाहून आणि खासगी बँकांच्या वसुलीचा तगादा सहन न झाल्याने गळफास घेवून आत्महत्या केली. गेल्या चार दिवसापासून खासगी बँकेकडून त्याच्या मागे वसुलीचा तगादा लावल्याचे त्याच्या मुलीने सांगितले. गुरुवारी शेतात गेल्यावर कपाशी पिकांची गंभीर स्थिती पाहून बँकेकडून घेतलेले पिककर्ज व खासगी बँकाकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे याच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली. 

दरम्यान, दोन दिवसापूर्वी सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणामुळे पळसखेड येथील वैजिनाथ थोरात(३१) आणि पहुरी येथील २१ वर्षीय भगवान जाधव या दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले होते. ऐन निवडणुका आणि प्रकाशाचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळी सणाच्या तोंडावर सोयगाव तालुक्यात दुष्काळाच्या धास्तीने तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळ्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

निवडणुकांच्या कामाने पंचनामे रखडलेमहिनाभरापासून तलाठी व महसूल विभाग निवडणुकांच्या कामांमध्ये गुंतला आहे. यामुळे तिन्ही आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे रखडले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे अहवाल पाठविण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद