शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

शेतकऱ्यांचा फायदा; ‘पिकेल तेथे विकेल’; अन्न सुरक्षा आयोगाकडून अभ्यास समितीची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 10:17 IST

‘पिकेल तेथे विकेल’ या तत्त्वावर त्या-त्या भागातील शेतकऱ्यांचा उत्पादित शेतीमाल खरेदी करावा.

छत्रपती संभाजीनगर :  ‘पिकेल तेथे विकेल’ या तत्त्वावर त्या-त्या भागातील शेतकऱ्यांचा उत्पादित शेतीमाल खरेदी करावा. तसेच, पाच शासकीय योजनांमार्फत जे धान्य वाटप होते, त्या योजनांर्तगत लाभार्थींना वाटप करावे, या याचिकेची दखल घेत अन्नसुरक्षा आयोगाने  त्यासंदर्भात सखोल अभ्यास करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश शुक्रवारी दिले. 

 यासंदर्भात भारतीय किसानसंघाने  अन्नसुरक्षा कायदा १६(६) (ग) नुसार अन्नसुरक्षा आयोगाकडे याचिका दाखल केली होती. आयोगाने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी लागणारे अन्नधान्य खरेदी ही त्या-त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी करावी, म्हणजे ‘पिकेल तेथे विकेल’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात येईल, यासाठी अधिक अभ्यासासाठी शासकीय व अशासकीय सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली. आयोगाच्या निर्णयामुळे किसान संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष बळीराम सोळके यांनी स्वागत केले. 

संघाच्या वतीने ॲड. अजय तल्हार व शिल्पा तल्हार यांनी युक्तिवाद केला. किसानसंघाचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री  किशोर देशपांडे यांनी ही याचिका दाखल केली होती. 

काय होतील फायदे?   

वाहतूक व साठवणूक यावर खर्च होणारा फार मोठा निधी वाचेल. यासाठी कोणत्याही नवीन निधीची आवश्यकता पडणार नाही. स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल. हमीभावाने शेतीमालाची खरेदी होईल. अत्यल्प भूधारक, अल्पभूधारक शेतकरी, शेतकरी गट, यांचे सक्षमीकरण होईल.  लाभार्थींना चांगले व सकस अन्नधान्य मिळेल. 

अभ्यास समितीत कोणाचा समावेश?

आनंद खंडागळे (बालविकास प्रकल्प अधिकारी, तुर्भे पनवेल)संजय बागुल (जिल्हा कार्यक्रम अधिकारी, ठाणे)मदन देशपांडे (अशासकीय सदस्य)महेश लोंढे (अशासकीय सदस्य)  अनिल घनवट (अशासकीय सदस्य)सचिन धांडे (अशासकीय सदस्य)

समितीला एका महिन्यात द्यावा लागेल अहवाल 

‘पिकेल तेथे विकेल’ या योजनेचा शेतकऱ्यांना किती लाभ होईल, प्रत्येक जिल्ह्यात ही संकल्पना लागू होऊ शकते का, इत्यादींचा अभ्यास या समितीला करावा लागणार आहे. संपूर्ण अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याची मुदत आयोगाने दिली आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आयोग सरकारला सूचना करेल की, समितीने दिलेला अहवाल कशा प्रकारे आणला जाऊ शकतो, त्याची पुढील कार्यवाही सरकारने करावी.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद