शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

शेतीच्या वादातून कुऱ्हाडीने घाव घालून शेतकऱ्याची हत्या; सात जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 12:22 IST

शेतीच्या जुन्या वादातून झाला घटना

हिंगोली : तालुक्यातील राहुली बु. येथे शेतीच्या वादातून एकाची संगनमत करून हत्या झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शंकर लक्ष्मण डोरले (३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून याप्रकरणी सात जणांविरोधात ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लक्ष्मण डोरले यांचे शेतीच्या प्रकरणात काही शेजाऱ्यांसोबत जुने वाद आहेत. यावरून तीन महिन्यांपूर्वी त्यांचे भांडणही झाले होते. मंगळवारी (दि. २१ ) सायंकाळी लक्ष्मण त्यांच्या शेतात एकटे असताना शेजाऱ्यांनी शेतीच्या वादातून परत वाद सुरु केला. यातून सहा ते सात जणांनी मिळून त्यांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्यांच्यावर कुर्‍हाडीने वार करत गंभीर जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी ए.जी. खान  यांनी घटनास्थळी भेट दिली.  याप्रकरणी लक्ष्मण गणपती डोरले यांच्या फिर्यादीवरून गणेश रामकिशन डोरले, अंबादास उर्फ  बाबुशा नामदेव घोंगडे, विठ्ठल नामदेव घोंगडे, ज्ञानेश्वर किशन बोरगड, मारुती विठ्ठल डोरले, रामकिशन पंडिता डोरले,  नामदेव तुकाराम घोंगडे ( सर्व राहणार राहुली बु. ) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि सुडके हे करीत आहेत. यातील चौघांना अटक करण्यात आली असून फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीPoliceपोलिसArrestअटक