शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

शेतकरी झाला हवालदिल

By admin | Updated: June 25, 2014 00:35 IST

परभणी : यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाने हजेरी न लावल्याने खरिपाची पेरणी खोळंबली आहे़ या निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत

परभणी : यंदा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाने हजेरी न लावल्याने खरिपाची पेरणी खोळंबली आहे़ या निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने जिल्ह्यातील खरिपाची पेरणी खोळंबली आहे़ तसेच शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घेऊन ठेवले बी-बियाणे घरात पडून आहेत़ पाऊस पडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे़ जिल्ह्याचे खरीप हंगामाचे क्षेत्र ५ लाख २९ हजार २१० हेक्टर एवढे आहे़ आतापर्यंत केवळ ३ टक्के म्हणजे ९ हजार हेक्टरवर बागायती कपाशीची लागवड करण्यात आली आहे़ ज्या शेतकऱ्यांकडे पैसा आहे त्या शेतकऱ्यांनी गत आठवड्यात खत, बी-बियाणे खरेदी करून ठेवली आहेत़ अद्यापपर्यंत बाजारातील ५० टक्के बी-बियाणे व खताची विक्री झाली आहे़ ज्या बागायतदार शेतकऱ्यांनी कपाशी व सोयाबीनची लागवड केली आहे, त्या शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीची वेळ येते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे़ येत्या चार-पाच दिवसात पाऊस न पडल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे़ गत आठवड्यात वादळी वाऱ्यासह अभाळ आल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ परंतु, पावसाचा शिडकावाच झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उदासिनता आहे़ (प्रतिनिधी)व्यापारीे हतबलपरभणी येथील नवा मोंढा येथील दुकानांत दोन दिवसांपासून शेतकरी बी-बियाणे खरेदीसाठी फिरकनासे झाले आहेत़ त्यामुळे कृषी दुकानदारांना शेतकऱ्यांची वाट पाहताच दुकानांमध्ये बसावे लागत आहे़ अशी प्रतिक्रिया येथील कृषी दुकानदार सोपान शिंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली़शेतकारी संकटातगतवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकरी देशोधडीला गेला़ यंदा मात्र पाऊसच पडत नसल्याने शेतकरी चारही बाजुंनी संकटात सापडला आहे़ जून महिना संपत आला तरीही पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांनी आता कसे जगावे, असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे़ शासनस्तरावरून उपाययोजना करणे गरजेचे आहे़ आश्रोबा कवडे- पांढरगळा, ता़ जिंतूरपशूपक्षी हवालदिलपाऊस नसल्यामुळे शेतकरी तर सोडाच परंतु, पशूपक्षी देखील हवालदिल झाले आहेत़ सर्वत्र सन्नाटा पसरला असून, गावात, शेतात कुठेही मन लागत नाही़ उन्हाळ्यासारखी अवस्था पावसाळ्यात झाली आहे़ चार-आठ दिवसात पाऊस न पडल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे़ आत्माराम कुटेवडी, ता़ पाथरीनिसर्गाचा प्रकोपमृग नक्षत्र संपले असून, पाऊस नसल्याने पेरणी झालेली नाही़ महागामोलाचे बियाणे घरात पडून आहेत़ शेतात पाय ठेवण्याचीही इच्छा होत नाही़ गतवर्षी पावसाने तर यावर्षी पावसाविना शेतकरी त्रस्त झाला आहे़ निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे़सखाराम रासे, कोठा, ता़ जिंतूर