शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

दोन परीक्षांमध्ये अपयश अन् नंतर सलग ३ परीक्षांमध्ये यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 13:06 IST

जानेफळच्या शारदाची स्पर्धा परीक्षेत गगन भरारी

- विजय जाधव

शिऊर : केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये अपयश आल्यानंतर खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवून सलग ३ परीक्षांमध्ये यश संपादन करण्याची किमया वैजापूर तालुक्यातील जानेफळ येथील शारदा कैलास त्रिभुवन या तरुणीने साधली आहे.

जानेफळ येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या शारदा कैलास त्रिभुवन या तरुणीचे शालेय शिक्षण गावातच झाले. ११ वी आणि १२ वीचे शिक्षण वैजापूर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात झाले. यासाठी ती शेतवस्तीपासून दररोज ३ किमी पायी चालत वैजापूरसाठी एसटी बस पकडत असत. १२ वी विज्ञान शाखेत चांगले गुण मिळाल्याने शारदाला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात बीएस्सी ॲग्री प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळाला. तेथेच शारदाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परिक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चांगल्या गुणाने बीएस्सी ॲग्रीची पदवी मिळाल्यानंतर यूपीएससी आणि एमपीएससीची परीक्षा दिली; परंतु त्यात यश मिळाले नाही. त्यानंतरही खचून न जाता बॅंकिंग व अन्य स्पर्धा परीक्षेची घरातूनच तयारी सुरू ठेवली. बॅंकिंगच्या परीक्षेत दोन वेळा मुलाखतीपर्यंत जाऊन यश मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा जोमाने तयारी चालू ठेवली. अशात घरातील मंडळींनी तिच्यासाठी स्थळ सुचवायला सुरुवात केली. घरच्यांच्या मनाप्रमाणे स्थळ आले आणि त्यांनी शारदाचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. शारदानेही त्यास होकार दिला.

हळदीला पहिलाच निकाल, आनंदात भर...शारदाचे लग्न जमल्यानंतर हळदीच्या दिवशी २२ जानेवारी २०२४ रोजी तिचा तलाठी भरती परीक्षेचा पहिला निकाल जाहीर झाला. त्यात ती जिल्ह्यातून मुलींमध्ये प्रथम आली. त्यामुळे घरच्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यानंतर १६ मार्च रोजी कृषी सहायकपदी तिची निवड झाल्याची बातमी आली. त्यानंतर १ एप्रिल रोजी बॅंकिंगच्या आयबीपीएस परीक्षेतची ती उत्तीर्ण झाल्याचा निकाल आला. त्यामुळे शारदाची सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कृषी क्षेत्र अधिकारीपदी निवड झाली. लागोपाठ तीन परीक्षांमध्ये शारदाने यश संपादन केल्याने कुटुंबीय, नातेवाईकांनी शारदाचे काैतुक केले. शिवाय गावातही शारदाच्या यशाचीच चर्चा सुरू झाली.

बालपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्नयाबाबत बोलताना शारदा म्हणाली, आईवडील, आजी-आजोबा यांच्या कष्टाची जाणीव होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा मन लावून अभ्यास केला. अभ्यासात सातत्य ठेवले. बालपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे अपयश आल्याने खचून न जाता परीक्षेची तयारी चालू ठेवली. त्यानंतर सलग तीन परीक्षांमध्ये यश मिळाले, याचे समाधान वाटते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMPSC examएमपीएससी परीक्षा