शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
6
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
7
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
8
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
9
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
10
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
11
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
12
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
13
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
14
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
15
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
16
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
17
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
18
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
19
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
20
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!

दोन परीक्षांमध्ये अपयश अन् नंतर सलग ३ परीक्षांमध्ये यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 13:06 IST

जानेफळच्या शारदाची स्पर्धा परीक्षेत गगन भरारी

- विजय जाधव

शिऊर : केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये अपयश आल्यानंतर खचून न जाता अभ्यासात सातत्य ठेवून सलग ३ परीक्षांमध्ये यश संपादन करण्याची किमया वैजापूर तालुक्यातील जानेफळ येथील शारदा कैलास त्रिभुवन या तरुणीने साधली आहे.

जानेफळ येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या शारदा कैलास त्रिभुवन या तरुणीचे शालेय शिक्षण गावातच झाले. ११ वी आणि १२ वीचे शिक्षण वैजापूर येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात झाले. यासाठी ती शेतवस्तीपासून दररोज ३ किमी पायी चालत वैजापूरसाठी एसटी बस पकडत असत. १२ वी विज्ञान शाखेत चांगले गुण मिळाल्याने शारदाला परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात बीएस्सी ॲग्री प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळाला. तेथेच शारदाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परिक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चांगल्या गुणाने बीएस्सी ॲग्रीची पदवी मिळाल्यानंतर यूपीएससी आणि एमपीएससीची परीक्षा दिली; परंतु त्यात यश मिळाले नाही. त्यानंतरही खचून न जाता बॅंकिंग व अन्य स्पर्धा परीक्षेची घरातूनच तयारी सुरू ठेवली. बॅंकिंगच्या परीक्षेत दोन वेळा मुलाखतीपर्यंत जाऊन यश मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा जोमाने तयारी चालू ठेवली. अशात घरातील मंडळींनी तिच्यासाठी स्थळ सुचवायला सुरुवात केली. घरच्यांच्या मनाप्रमाणे स्थळ आले आणि त्यांनी शारदाचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. शारदानेही त्यास होकार दिला.

हळदीला पहिलाच निकाल, आनंदात भर...शारदाचे लग्न जमल्यानंतर हळदीच्या दिवशी २२ जानेवारी २०२४ रोजी तिचा तलाठी भरती परीक्षेचा पहिला निकाल जाहीर झाला. त्यात ती जिल्ह्यातून मुलींमध्ये प्रथम आली. त्यामुळे घरच्यांचा आनंद द्विगुणित झाला. त्यानंतर १६ मार्च रोजी कृषी सहायकपदी तिची निवड झाल्याची बातमी आली. त्यानंतर १ एप्रिल रोजी बॅंकिंगच्या आयबीपीएस परीक्षेतची ती उत्तीर्ण झाल्याचा निकाल आला. त्यामुळे शारदाची सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या कृषी क्षेत्र अधिकारीपदी निवड झाली. लागोपाठ तीन परीक्षांमध्ये शारदाने यश संपादन केल्याने कुटुंबीय, नातेवाईकांनी शारदाचे काैतुक केले. शिवाय गावातही शारदाच्या यशाचीच चर्चा सुरू झाली.

बालपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्नयाबाबत बोलताना शारदा म्हणाली, आईवडील, आजी-आजोबा यांच्या कष्टाची जाणीव होती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा मन लावून अभ्यास केला. अभ्यासात सातत्य ठेवले. बालपणापासूनच अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यामुळे अपयश आल्याने खचून न जाता परीक्षेची तयारी चालू ठेवली. त्यानंतर सलग तीन परीक्षांमध्ये यश मिळाले, याचे समाधान वाटते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMPSC examएमपीएससी परीक्षा