शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

फडणवीस तर दोन वर्षांपूर्वीच 'मियाँ देवेंद्र' झालेत; शिवसेनेचा 'जनाब' विधानावरून प्रतिहल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 18:18 IST

जनतेने शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी देखील त्यांच्या हिंदुत्व विचारांचे अनुकरण केले.

औरंगाबाद : राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब ही उपाधी देऊन त्यांचा अवमान केला आहे. त्यांचे हे वक्तव्य अक्षम्य असून फडणवीस हे मियाँ देवेंद्र असल्याची टीका करीत शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्ला चढविला.

फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांचे इफ्तार पार्टीमधील फोटो दाखवित फडणवीस हे दोन वर्षांपूर्वीच मियाँ झाले आहेत, असा टोला लगावत एमआयएम आणि महाविकास आघाडी एकत्रित येण्याचे ‘पिल्लू’ भाजपनेच सोडल्याचा आरोपही त्यांनी केला.खा. राऊत हे शिवसंपर्क अभियानासाठी मंगळवारी औरंगाबादेत असताना त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपचा खरपूस समाचार घेतला. यावेळी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, उपनेते लक्ष्मणराव वडले, जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले उपस्थित होते.

जनतेने शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी देखील त्यांच्या हिंदुत्व विचारांचे अनुकरण केले. मात्र फडणवीसांनी त्यांना जनाब असा उल्लेख करून अक्षम्य पाप केले आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही, मात्र फडणवीसांसह भाजपाने मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे. असा आरोप खा.राऊत यांनी केला. निधी वाटपावरून शिवसेनेचे खा. गजानन कीर्तिकर, खा. श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. याबाबत खा. राऊतांनी सर्वांना समसमान निधी वाटप करण्यात आला आहे. आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्ट केले.

एमआयएमशी जवळीक नाहीमहाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत चलबिचल वाढावी, यासाठी एमआयएमसोबत आघाडी होईल, असे ‘पिल्लू’ भाजपने सोडण्याचे षडयंत्र रचले. मात्र शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. एमआयएमला शिवसेना कधीही जवळ करणार नाही, त्या पक्षाने भाजपचे बटीक रहावे. खा.इम्तियाज जलील नाटक करीत असल्याचा टोला खा.राऊत यांनी लगावला.

शेंडी, जाणव्यातील आमचे हिंदुत्व नाहीशिवसेनेचे हिंदुत्व हे शेंडी, जाणव्यातील नसून ते व्यापक आहे. असे स्पष्ट करीत खा. राऊत म्हणाले, मुस्लिमांच्या मतांसाठी भाजपने हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे. यापुढे भाजपसोबत शिवसेनेची युती कधीही होणार नाही. यापुढे महाविकास आघाडीचे सरकार असेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना