शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

फडणवीस तर दोन वर्षांपूर्वीच 'मियाँ देवेंद्र' झालेत; शिवसेनेचा 'जनाब' विधानावरून प्रतिहल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 18:18 IST

जनतेने शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी देखील त्यांच्या हिंदुत्व विचारांचे अनुकरण केले.

औरंगाबाद : राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जनाब ही उपाधी देऊन त्यांचा अवमान केला आहे. त्यांचे हे वक्तव्य अक्षम्य असून फडणवीस हे मियाँ देवेंद्र असल्याची टीका करीत शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत भाजपवर हल्ला चढविला.

फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांचे इफ्तार पार्टीमधील फोटो दाखवित फडणवीस हे दोन वर्षांपूर्वीच मियाँ झाले आहेत, असा टोला लगावत एमआयएम आणि महाविकास आघाडी एकत्रित येण्याचे ‘पिल्लू’ भाजपनेच सोडल्याचा आरोपही त्यांनी केला.खा. राऊत हे शिवसंपर्क अभियानासाठी मंगळवारी औरंगाबादेत असताना त्यांनी पत्रकार परिषदेत भाजपचा खरपूस समाचार घेतला. यावेळी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, उपनेते लक्ष्मणराव वडले, जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले उपस्थित होते.

जनतेने शिवसेनाप्रमुख ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी दिली आहे. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी देखील त्यांच्या हिंदुत्व विचारांचे अनुकरण केले. मात्र फडणवीसांनी त्यांना जनाब असा उल्लेख करून अक्षम्य पाप केले आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही, मात्र फडणवीसांसह भाजपाने मुस्लिमांच्या मतांसाठी हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे. असा आरोप खा.राऊत यांनी केला. निधी वाटपावरून शिवसेनेचे खा. गजानन कीर्तिकर, खा. श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. याबाबत खा. राऊतांनी सर्वांना समसमान निधी वाटप करण्यात आला आहे. आघाडीत सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्ट केले.

एमआयएमशी जवळीक नाहीमहाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांत चलबिचल वाढावी, यासाठी एमआयएमसोबत आघाडी होईल, असे ‘पिल्लू’ भाजपने सोडण्याचे षडयंत्र रचले. मात्र शिवसेना हिंदुत्वाशी तडजोड करणार नाही. एमआयएमला शिवसेना कधीही जवळ करणार नाही, त्या पक्षाने भाजपचे बटीक रहावे. खा.इम्तियाज जलील नाटक करीत असल्याचा टोला खा.राऊत यांनी लगावला.

शेंडी, जाणव्यातील आमचे हिंदुत्व नाहीशिवसेनेचे हिंदुत्व हे शेंडी, जाणव्यातील नसून ते व्यापक आहे. असे स्पष्ट करीत खा. राऊत म्हणाले, मुस्लिमांच्या मतांसाठी भाजपने हिंदुत्व गुंडाळून ठेवले आहे. यापुढे भाजपसोबत शिवसेनेची युती कधीही होणार नाही. यापुढे महाविकास आघाडीचे सरकार असेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAurangabadऔरंगाबादBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना