शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

निवडणुकीपुरती कारखानदारी ! ; औरंगाबाद जिल्ह्यात केवळ चार साखर कारखाने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 14:08 IST

यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांपैकी अवघ्या चार कारखान्यांत उसाचे गाळप सुरू असून, विशेष म्हणजे चारही कारखाने खाजगी आहेत. सहकारी तत्त्वावरील बंद कारखान्यांची कोट्यवधींची मालमत्ता व जमीन पडून आहे. आता हे कारखाने फक्त निवडणुकीपुरतेच शिल्लक असल्याची परिस्थिती आहे. 

ठळक मुद्दे यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांपैकी अवघ्या चार कारखान्यांत उसाचे गाळप सुरू विशेष म्हणजे चारही कारखाने खाजगी आहेत.

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांपैकी अवघ्या चार कारखान्यांत उसाचे गाळप सुरू असून, विशेष म्हणजे चारही कारखाने खाजगी आहेत. सहकारी तत्त्वावरील बंद कारखान्यांची कोट्यवधींची मालमत्ता व जमीन पडून आहे. आता हे कारखाने फक्त निवडणुकीपुरतेच शिल्लक असल्याची परिस्थिती आहे. 

जिल्ह्यात १० पैकी ६ सहकारी, तर ४ खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन एकूण १८७०० मेट्रिक टन गाळप क्षमता आहे. हे वाचून कोणालाही हा जिल्हा शेती व कारखानदारासाठी सधन असल्याचे जाणवेल; मात्र परिस्थिती खूप वेगळी आहे. आजघडीला यातील अवघ्या ३ कारखान्यांत उसाचे गाळप केले जात आहे.  एका खाजगी व पाच सहकारी कारखान्यांतील मशिनरीला गंज लागला आहे. सुरू असलेल्यांमध्ये कन्नड येखील बारामती अ‍ॅग्रो, औरंगाबाद तालुक्यातील संभाजीराजे खाजगी कारखाना, पैठण येथील संत एकनाथ कारखाना व गंगापूर तालुक्यातील मुक्तेश्वर शुगर्स यांचा समावेश आहे.

या कारखान्यांनी आजपर्यंत ४ लाख २८ हजार ९१५ मे. टन उसाचे गाळप केले असून, त्यापासून ३ लाख ५२ हजार ६५० मे.टन साखर तयार झाली आहे. सरासरी ८.२२ टक्के उतारा मिळत आहे. यात संत एकनाथ कारखान्याने केलेले गाळप व साखर उत्पादन याच्या आकडेवारीचा समावेश नाही. या कारखान्याने आजपर्यंत ६६ हजार मे. टन साखर उत्पादन केले आहे; मात्र साखर आयुक्तालयात याची नोंदच नाही. कारण, या कारखान्याला ऊस गाळप करण्याची परवानगी साखर आयुक्तालयाने दिली नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. उल्लेखनीय म्हणजे खुलताबाद परिसरातील घृष्णेश्वर साखर कारखाना उभारणीपासून आजपर्यंत बॉयलर पेटलेच नाही.

पैठण येथील शरद साखर कारखान्याचीही हीच परिस्थिती आहे; मात्र एकेकाळी साखर उत्पादनात गाजलेला गंगापूरचा  कारखाना असो वा सिल्लोडचा सिद्धेश्वर कारखाना किंवा फुलंब्रीचा देवगिरी कारखाना; मागील अनेक वर्षांपासून हे साखर कारखाने बंद आहेत. कर्जबाजारीपणा, राजकारण हीच या बंद कारखान्यांमागील ‘खेळी’ होय. जिल्ह्यातील २० हजार २६६ हेक्टरवर उसाची लागवड होत आहे. कारखाने बंद पडल्यामुळे लागवडीवरही परिणाम झाला आहे. 

साखर कारखाने बंद राहणे शेतकर्‍यांच्या हिताचे नाहीजिल्ह्यातील ६ कारखाने अनेक वर्षांपासून बंद आहेत. याचा अंतिम फटका ऊस उत्पादक, ऊसतोड कामगार, कारखान्यातील कामगारांना बसत आहे. यातून जिल्ह्यातील आर्थिक उलाढालीवर परिणाम होत आहे. यंदा उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. ऊस घेऊन जाण्यास कोणी तयार नाही. अशा वेळी बंद कारखाने सुरू झाल्यास त्याचा फायदा ऊस उत्पादकांना होईल. राज्य सरकारनेही याकडे सहकाराच्या भावनेने पाहिले पाहिजे. साखर कारखाने पुन्हा सुरू करून त्या तालुक्यातील अर्थचक्र गतिमान केले पाहिजे. यासाठी सरकारने साखर कारखान्यांना पाठबळ दिले पाहिजे व शेतकरी, ऊसतोड कामगारांना जगविले पाहिजे. - जगन्नाथ काळे, अध्यक्ष, देवगिरी सहकारी साखर कारखाना.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी