शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

निवडणुकीपुरती कारखानदारी ! ; औरंगाबाद जिल्ह्यात केवळ चार साखर कारखाने सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 14:08 IST

यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांपैकी अवघ्या चार कारखान्यांत उसाचे गाळप सुरू असून, विशेष म्हणजे चारही कारखाने खाजगी आहेत. सहकारी तत्त्वावरील बंद कारखान्यांची कोट्यवधींची मालमत्ता व जमीन पडून आहे. आता हे कारखाने फक्त निवडणुकीपुरतेच शिल्लक असल्याची परिस्थिती आहे. 

ठळक मुद्दे यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांपैकी अवघ्या चार कारखान्यांत उसाचे गाळप सुरू विशेष म्हणजे चारही कारखाने खाजगी आहेत.

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील १० साखर कारखान्यांपैकी अवघ्या चार कारखान्यांत उसाचे गाळप सुरू असून, विशेष म्हणजे चारही कारखाने खाजगी आहेत. सहकारी तत्त्वावरील बंद कारखान्यांची कोट्यवधींची मालमत्ता व जमीन पडून आहे. आता हे कारखाने फक्त निवडणुकीपुरतेच शिल्लक असल्याची परिस्थिती आहे. 

जिल्ह्यात १० पैकी ६ सहकारी, तर ४ खाजगी कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांची दैनंदिन एकूण १८७०० मेट्रिक टन गाळप क्षमता आहे. हे वाचून कोणालाही हा जिल्हा शेती व कारखानदारासाठी सधन असल्याचे जाणवेल; मात्र परिस्थिती खूप वेगळी आहे. आजघडीला यातील अवघ्या ३ कारखान्यांत उसाचे गाळप केले जात आहे.  एका खाजगी व पाच सहकारी कारखान्यांतील मशिनरीला गंज लागला आहे. सुरू असलेल्यांमध्ये कन्नड येखील बारामती अ‍ॅग्रो, औरंगाबाद तालुक्यातील संभाजीराजे खाजगी कारखाना, पैठण येथील संत एकनाथ कारखाना व गंगापूर तालुक्यातील मुक्तेश्वर शुगर्स यांचा समावेश आहे.

या कारखान्यांनी आजपर्यंत ४ लाख २८ हजार ९१५ मे. टन उसाचे गाळप केले असून, त्यापासून ३ लाख ५२ हजार ६५० मे.टन साखर तयार झाली आहे. सरासरी ८.२२ टक्के उतारा मिळत आहे. यात संत एकनाथ कारखान्याने केलेले गाळप व साखर उत्पादन याच्या आकडेवारीचा समावेश नाही. या कारखान्याने आजपर्यंत ६६ हजार मे. टन साखर उत्पादन केले आहे; मात्र साखर आयुक्तालयात याची नोंदच नाही. कारण, या कारखान्याला ऊस गाळप करण्याची परवानगी साखर आयुक्तालयाने दिली नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. उल्लेखनीय म्हणजे खुलताबाद परिसरातील घृष्णेश्वर साखर कारखाना उभारणीपासून आजपर्यंत बॉयलर पेटलेच नाही.

पैठण येथील शरद साखर कारखान्याचीही हीच परिस्थिती आहे; मात्र एकेकाळी साखर उत्पादनात गाजलेला गंगापूरचा  कारखाना असो वा सिल्लोडचा सिद्धेश्वर कारखाना किंवा फुलंब्रीचा देवगिरी कारखाना; मागील अनेक वर्षांपासून हे साखर कारखाने बंद आहेत. कर्जबाजारीपणा, राजकारण हीच या बंद कारखान्यांमागील ‘खेळी’ होय. जिल्ह्यातील २० हजार २६६ हेक्टरवर उसाची लागवड होत आहे. कारखाने बंद पडल्यामुळे लागवडीवरही परिणाम झाला आहे. 

साखर कारखाने बंद राहणे शेतकर्‍यांच्या हिताचे नाहीजिल्ह्यातील ६ कारखाने अनेक वर्षांपासून बंद आहेत. याचा अंतिम फटका ऊस उत्पादक, ऊसतोड कामगार, कारखान्यातील कामगारांना बसत आहे. यातून जिल्ह्यातील आर्थिक उलाढालीवर परिणाम होत आहे. यंदा उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. ऊस घेऊन जाण्यास कोणी तयार नाही. अशा वेळी बंद कारखाने सुरू झाल्यास त्याचा फायदा ऊस उत्पादकांना होईल. राज्य सरकारनेही याकडे सहकाराच्या भावनेने पाहिले पाहिजे. साखर कारखाने पुन्हा सुरू करून त्या तालुक्यातील अर्थचक्र गतिमान केले पाहिजे. यासाठी सरकारने साखर कारखान्यांना पाठबळ दिले पाहिजे व शेतकरी, ऊसतोड कामगारांना जगविले पाहिजे. - जगन्नाथ काळे, अध्यक्ष, देवगिरी सहकारी साखर कारखाना.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAurangabadऔरंगाबादFarmerशेतकरी