शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अतिघाई जीवघेणी! एकाच बाईकवर जाणाऱ्या चार भावंडांचा भीषण अपघात;दोघे भाऊ ठार,२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 13:21 IST

नियंत्रण सुटले अन बाईक रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकखाली गेली

पिंप्री राजा (औरंगाबाद ) : प्रवासात अतिघाई जीवघेणी ठरल्याची अनेक उदाहरणे आहेत. याचीच प्रचीती सोमवारी आडगाव येथे आली. लग्न समारंभासाठी एकाच गाडीवर जाणाऱ्या ४ भावंडाचा अपघात आडगावकडून पिंप्री राजाकडे येणाऱ्या रोडवर झाला. अनियंत्रित बाईक रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रक ट्रेलरला धडकल्याने दोघे जण ठार, तर दोघे जखमी झाल्याने ठोंबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अर्जुन बबन ठोंबरे व पवन राजेंद्र ठोंबरे अशी मृतांची नावे आहेत. कृष्णा गोविंद ठोंबरे व आशुतोष अर्जुन ठोंबरे हे दोन तरुण जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आडगाव येथील ठोंबरे कुटुंबातील चार युवक सोमवारी सायंकाळी एकाच बाईकवरून ( एमएच १९ एजे ६८६२ ) विवाह समारंभासाठी जात होते. गावापासून थोड्या अंतरावर पिंप्री राजा रोडवर एक ट्रक ट्रेलर (एमएच ०४ ईवाय २३०७) रस्त्याच्या कडेला उभा होता. दरम्यान, चालकाचा ताबा सुटल्याने बाईक थेट ट्रकच्या पाठीमागील भागात घुसली. या भीषण अपघातात बाईकवरील  चारही जणांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने घटनास्थळी विदारक चित्र होते. 

अपघातग्रस्त वाहन पाहताच ग्रामस्थांनी लागलीच मदतकार्य केले. गंभीर जखमी चौघांना लागलीच रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून अर्जुन व पवन यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी कृष्णा व आशुतोष यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांवर मंगळवारी गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन तरुण मुलांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली होती. दरम्यान, रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूAurangabadऔरंगाबादAccidentअपघात