शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

नवीन रेल्वे सुरू करण्याऐवजी जनशताब्दी एक्स्प्रेसचा हिंगोलीपर्यंत विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 19:41 IST

Janshatabdi Express : या पूर्वी रेल्वेचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला, परंतु जालन्यातून औरंगाबादपर्यंत ही रेल्वे बहुतांशी रिकामीच धावते.

ठळक मुद्देप्रारंभी औरंगाबाद ते मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस मंजूर करण्यात आली होती.

औरंगाबाद : सकाळच्या वेळेत मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची ठरणारी जनशताब्दी एक्स्प्रेस यापूर्वी जालन्यापर्यंत विस्तारित करण्यात आली. नवीन रेल्वे सुरू करण्याऐवजी उत्पन्न वाढीसाठी आता या रेल्वेचा विस्तार थेट हिंगोलीपर्यंत करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहेत. (Extension of Janshatabdi Express to Hingoli)

प्रारंभी औरंगाबाद ते मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस मंजूर करण्यात आली होती. औरंगाबादसह मराठवाड्यातील प्रवाशांना एका दिवसात मुंबईतील कामे आटोपून परत येण्याच्या दृष्टीने ही रेल्वे महत्त्वपूर्ण ठरते. सुरुवातीला ही रेल्वे औरंगाबाद ते सीएसएमटीपर्यंत धावत होती. मात्र, काही कालावधीनंतर ही रेल्वे दादरपर्यंतच धावू लागली. अशातच या रेल्वेचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला, परंतु जालन्यातून औरंगाबादपर्यंत ही रेल्वे बहुतांशी रिकामीच धावते. काही मोजक्या प्रवाशांसह या रेल्वेचा औरंगाबादपर्यंत प्रवास होतो. औरंगाबादहून या रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. ही रेल्वे पुन्हा एकदा सीएसएमटीपर्यंत धावत आहे. पूर्वी सकाळी ६ वाजता सुटणारी ही गाडी आता सकाळी साडेनऊ वाजता सुटते. या सगळ्यात आता या गाडीचा विस्तार हिंगोलीपर्यंत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रेल्वेकडून त्यास लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवीन रेल्वे देता येईलहिंगोलीहून मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू करता येऊ शकते. त्याचा रेल्वे प्रशासनाने विचार केला पाहिजे. जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार हिंगोलीपर्यंत केला, तर त्याला कोणाचा विरोध राहणार नाही, असे वाटते. कारण विस्तार करताना या रेल्वेला बोगी वाढविण्यात येतील.- संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन