शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

नवीन रेल्वे सुरू करण्याऐवजी जनशताब्दी एक्स्प्रेसचा हिंगोलीपर्यंत विस्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 19:41 IST

Janshatabdi Express : या पूर्वी रेल्वेचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला, परंतु जालन्यातून औरंगाबादपर्यंत ही रेल्वे बहुतांशी रिकामीच धावते.

ठळक मुद्देप्रारंभी औरंगाबाद ते मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस मंजूर करण्यात आली होती.

औरंगाबाद : सकाळच्या वेळेत मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीची ठरणारी जनशताब्दी एक्स्प्रेस यापूर्वी जालन्यापर्यंत विस्तारित करण्यात आली. नवीन रेल्वे सुरू करण्याऐवजी उत्पन्न वाढीसाठी आता या रेल्वेचा विस्तार थेट हिंगोलीपर्यंत करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहेत. (Extension of Janshatabdi Express to Hingoli)

प्रारंभी औरंगाबाद ते मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस मंजूर करण्यात आली होती. औरंगाबादसह मराठवाड्यातील प्रवाशांना एका दिवसात मुंबईतील कामे आटोपून परत येण्याच्या दृष्टीने ही रेल्वे महत्त्वपूर्ण ठरते. सुरुवातीला ही रेल्वे औरंगाबाद ते सीएसएमटीपर्यंत धावत होती. मात्र, काही कालावधीनंतर ही रेल्वे दादरपर्यंतच धावू लागली. अशातच या रेल्वेचा विस्तार जालन्यापर्यंत करण्यात आला, परंतु जालन्यातून औरंगाबादपर्यंत ही रेल्वे बहुतांशी रिकामीच धावते. काही मोजक्या प्रवाशांसह या रेल्वेचा औरंगाबादपर्यंत प्रवास होतो. औरंगाबादहून या रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. ही रेल्वे पुन्हा एकदा सीएसएमटीपर्यंत धावत आहे. पूर्वी सकाळी ६ वाजता सुटणारी ही गाडी आता सकाळी साडेनऊ वाजता सुटते. या सगळ्यात आता या गाडीचा विस्तार हिंगोलीपर्यंत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रेल्वेकडून त्यास लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नवीन रेल्वे देता येईलहिंगोलीहून मुंबईसाठी नवीन रेल्वे सुरू करता येऊ शकते. त्याचा रेल्वे प्रशासनाने विचार केला पाहिजे. जनशताब्दी एक्स्प्रेसचा विस्तार हिंगोलीपर्यंत केला, तर त्याला कोणाचा विरोध राहणार नाही, असे वाटते. कारण विस्तार करताना या रेल्वेला बोगी वाढविण्यात येतील.- संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी सेना

टॅग्स :railwayरेल्वेAurangabadऔरंगाबादtourismपर्यटन