शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

इथं दहा मिनिटांच्या अंतरावर एक्स्प्रेस थांबेना, पीटलाइन कशी देणार ? रेल्वे संघटनांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 19:07 IST

औरंगाबादच्या पीटलाइनला पहिला प्राधान्यक्रम देण्याची मागणी

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : औरंगाबादच्या मुख्य रेल्वेस्टेशनवरूनरेल्वेने मुकुंदवाडी स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी १० मिनिटे लागतात. १० मिनिटे अंतरावरील स्टेशनवर एक्स्प्रेस रोखता येत नसल्याचे रेल्वेकडून सांगितले जाते. मग औरंगाबादेतील चिकलठाणा येथे पीटलाइन मंजूर असताना जवळपास ६५ कि.मी. अंतरावरील जालना येथेही पीटलाइन कशी मिळू शकते, असा सवाल प्रवासी आणि रेल्वे संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या विविध विभागांमध्ये ३७ पेक्षा अधिक ठिकाणी पीटलाइन आहेत. औरंगाबादेत २००८ पासून पीटलाइनची मागणी केली जात आहे. त्यास रेल्वेने ग्रीन सिग्नल दिला. कधी नांदेड, पूर्णा येथे पीटलाइन आहे, त्यामुळे औरंगाबादेत गरज नाही, असे कारण पुढे केले, तर कधी जागेची अडचण दाखवून मागणी प्रलंबित ठेवण्यात आली. अखेरीस चिकलठाण्यात पीटलाइन करण्यावर शिक्कामोर्तब झाला; पण जालन्यात पीटलाइनच्या घोषणेने चिकलठाण्यातील पीटलाइन संकटात आली. मात्र, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या दोन्ही जिल्ह्यांत पीटलाइन होईल, असे उद्योजकांच्या शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले. मात्र, मराठवाड्यातील अनेक रेल्वे प्रकल्पांना निधीसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते, अशा परिस्थितीत दोन्ही ठिकाणी पीटलाइन खरेच होईल का, त्यासाठी नियम नाही का, असा प्रश्न रेल्वे संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.

व्यवहार्य आहे का?औरंगाबाद रेल्वे स्टेशनहून साधारणत: १५ किलोमीटर अंतरावर मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनवर सध्या मराठवाडा एक्स्प्रेस ही एकमेव एक्स्प्रेस आणि इतर पॅसेंजर रेल्वे थांबविल्या जातात. मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर तपोवन, जनशताब्दी आणि नंदीग्राम एक्स्प्रेसला येथे थांबा देणे हे व्यावसायिकदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे थांबा देणे व्यवहार्य नसल्याची माहिती ‘दमरे’च्या अधिकाऱ्यांनी दिली. मग दोन पीटलाइन देणे व्यवहार्य आहे का, असा सवाल केला जात आहे.

दीडशे कोटींचा खर्च अपेक्षितदोन्ही जिल्ह्यात पीटलाइन करण्यासाठी किमान दीडशे कोटी रुपयांचा खर्च येईल. इतका खर्च रेल्वे खरेच करणार आहे का? की केवळ निवडणुकीच्या दृष्टीने हे राजकारण आहे, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मुकुंदवाडीला एक्स्प्रेस थांबवत नाही. त्यामुळे पीटलाइनचे काय होईल, हेही सांगता येत नाही.- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

२००८ पासून मागणीआमचे दोन्ही ठिकाणी पीटलाइन करण्यास स्वागतच असेल; पण औरंगाबादेत चिकलठाण्यात मंजूर झालेल्या पीटलाइनला प्राधान्य पाहिजे. औरंगाबादच्या पीटलाइनचा मुद्दा हा २००८ पासून चालत आलेला आहे. त्यामुळे याच ठिकाणी पीटलाइन पहिली झाली पाहिजे.- अमोल कोरडे, चिकलठाणा संघर्ष समिती

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेraosaheb danveरावसाहेब दानवे